शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६

गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत 




माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान
प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान


भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक
नसे भेद- भाव जना ,असा देश जगी एक
काय असे किती वर्णू , भारताचे गुणगान 
प्राणाहून असे  प्रिय , तयाच्या  गौरवात शान


पहा किती एकात्मता, होती संस्थाने अनेक
मान ठेवून शब्दांचा  ,अखंडित  झाली  एक
वल्लभभाईंच्या शब्दांचा,  दिधला जगी  मान
प्राणाहून असे  प्रिय  तयाच्या गौरवात शान


देश हा आत्म निर्भर, येता प्रसंग तो बाका
स्वावलंबी होती जन, येता मदतीच्या हाका
विश्वात शोभून दिसता, उंचावते अभिमाने मान
प्राणाहून असे  प्रिय तयाच्या  गौरवात शान

माझ्या भारत देशाचा मला  सदा अभिमान
प्राणाहून असे  प्रिय तयाच्या  गौरवात शान

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

गीत. देव नाही देवळात

 काव्य स्पंदन 02 राज्य स्तर 

काव्य प्रकार भावगीत
विषय -- नाही देव देवळात


आहे तोच  अंतरात, नाही देव  देवळात 
नका शोधू देवा-ह्यात  ,वसला चरा चरात

कळी पहा उमलली   सुगंधाने गंधाळली
वा- यासंगे डौलताना उषा हसत लाजली   
सारी देवाची  करणी  घडवितो दिनरात
 नका शोधू देवा-हात  वसला  चरा चरात        1

देता गरीबास अन्न , दोन आपुले कवळ   
तृप्त होऊनी हसला  आला असता जवळ
ओळखला नाही पण, तोची जेवला सुखात
नका शोधू देवा-हात  वसला चरा चरात             2

पहा देवास कर्मात ,  कर्म  घडवी देवत्व
सदा करिता सत्कर्म, मिळे  आपणा महत्त्व 
 नको पूजा जप ताप ,देव वसे आपल्यात 
  नका शोधू देवा-हात  वसला चरा चरात          3

वैशाली वर्तक
अहमदाबाद







स्वप्न नव भारताचे

स्वप्न नव भारताचे     

काल पाहिले सुंदर स्वप्न  
मन माझे  आनंदले
केले वंदन देवाला 
अन् काव्यातून रेखाटले.

        
 स्वप्नी होता  सुंदर स्वच्छ भारत
 विश्वात शोभणारा महान 
 समानतेचा नांदतोय भाव
 नाही कोणीच  उच्च वा लहान
 
 
नव्हते कोणीच उपाशी
सर्व जनांना आहे निवारा
समजून  उमजून राही जन
घरांना कुलुपाचा न , पहारा

आत्मनिर्भर होऊनी सारे
वाढविण्या जगती देशाची शान 
माणुसकी हाच धर्म खरा.      
याची नागरिकात दिसली जाण.

कळ्यां कधी न खुडता
हाती तयांच्या लेखणी
होण्या  मुलगी  साक्षर
सावित्री  रूपे देखणी.


रोज येती सांजवेळी
ऐकायला  पसायदान
देई  संदेश जगाला
विश्व शांती  योग्य दान


वैशाली वर्तक
अहमदाबाद 
8141427430.


गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित 
अष्टाक्षरी काव्यलेखन 
विषय    मृदगंध


किती  वसुने साहिल्या
तप्त  उन्हाच्या झळा 
 काया तिची भेगाळली
 भासे जणू अवकळा

झाली मृग बरसात
तृप्त अवनी जाहली
गंध मातीचा  पसरे  
काळी माती गंधाळली.

घेता शोषून जलाला
. वा-यासंगे वाहे गंध 
सारे आसमंती आता
 भरे एकच मृद्गंध 

  
अत्तराचा फिका वाटे
गंध आवडे जनाला
वारा  वाहे आसमंती
  देण्या आनंद क्षणाला.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

राबत गेले \ गेलो

 मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 

काव्यलेखन 

विषय. राबत  गेले


सध्याच्या जीवनशैलीशी

   तुलना  करिता मनात 

वाटते कधीतरी तेव्हा

 किती राबलो  बालपणात 


पायी चालणे  शाळेला

किती  जायचो सहज

कधी वाटली नाही तेव्हा

टोपी वा छत्रीची गरज


 तूप गुळ पोळी ,भाजी

 नाही केली हॉटेलची मौज 

जुनी पुस्तकं वापरून 

भागविली नवीनची हौस


उधळपटी केली नाही 

 जीवनात केली काटकसर

 आहे त्यात  गोड मानले

 म्हणून सुख मिळाले जीवनभर.


नोकर नव्हते  घरात

  घरकामात केली मदत

स्वतः चे काम केले स्वतः 

   आनंदे होतों राबत


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२६

गीत. तुझी वाट पहाते रे

तुझी वाट  पहाते रे


कधी येशील.     गगनी अधीरता मनी दाटे.   
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पहाते         


 आशा रुपी  कळ्यांची फुले  फुलती सकाळी.  
किलबील  ती खगांची  गोड भासते भुपाळी         
होता तुझेची आगमन  आनंद मनास वाटे 
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पहाते   

तुझ्या येण्याने वहाती,नव चैतन्याचे वारे
सडे केशराचे नभी,   मंदावती नभी तारे        
मंद झुळुक वा-याची  मनास सुखावते                            
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पाहते       


तुज अर्ध्य देण्या उभे  जन सारेची कधीचे
तुझ्या येण्याने जाईल  सारे  नैराश्य मनीचे         
फाकलेल्या शलाकात प्रसन्नता लाभते
 तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पहाते   


स्वर्ण रंगात  येताची मिळे जीवन जनांना
 प्रफुल्लित मने जन वदे "प्रभात "त्या क्षणांना      
झाली उष:काल नव आशांची मनी भासते
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पाहते       

वैशालीवर्तक

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

पक्ष्यांची भरली शाळा

शीर्षक...पक्ष्यांची भरली शाळा


होता झुंजुमुंज पहा
सुरु होतो किलबिलाट 
कोण सांगते तयांना
उठा झालीय  पहाट

होते बसले अंगणी
 लक्ष गेले झाडाकडे
चिवचिवाट करती पक्षी 
कोणाचे ऐकावे गडे

चिवचिव चिमण्यांची
चालू होती अविरत
त्यात पोपट मैनाची
साद आली दबकत

कावळा ओरडे कर्कश्श
गेला उडून क्षणात
म्हणणे त्याचे न कोणी ऐकी
राग आला त्याच्या मनात


करत होते किलबिलाट
रंगी बेरंगी लहान पक्षी
मधेच उडून जाती तेव्हा
नभात दिसे छान नक्षी

पक्ष्यांना एकच होता प्रश्न
थांबव ना. मानवा वृक्ष तोड
 पक्ष्यांनी  कुठे रहावे ?
करा काही तडजोड

वैशाली वर्तक
अहमदाबाद

शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

सकाळ विषयक. हसरी सकाळ स्वाक्षरी सोनेरी पहाट उध्दव वृत्त

विषय.  हसरी सकाळ 


ऐकू आली किलबिल
भासे झालीय सकाळ 
रवी राजे येता नभी
झाली पहा  उष:काळ

प्राची हळु उजळली
रवी   किरणे फाकली
सडे केशराचे नभी
उषा लाजत हासली.

 थंड मंद पवनाने 
दिशा जाहल्या गंधित 
फुले फुलली मोहक 
मन जाहले मोहित

 केली दूर मरगळ
उषा देते मना आशा 
उठ मानवा प्रभाती 
दूर सारूनी निराशा

मंद स्वर कानी आले
गोड ऐकता भुपाळी 
मंगल मय नाव मुखी
 भासे सुखद सकाळी 

रोज. येऊनी गगनी
दिनकर करी उषा
करी  हसरी प्रभात
उजळती दशदिशा

 वैशाली वर्तक 
 अहमदाबाद


*षडाक्षरी काव्य लेखन*
विषय .. सोनेरी पहाट 


शशी मावळला
मंदावले तारे
थंड  ती लहर
झोंबे अंगा वारे


झाली झुंज मुंज 
 प्राची उजळली
रवीची किरणे 
नभी पसरली

केशराचे सडे
सोनेरी पहाट
पक्षी करितात
तो  किलबिलाट 


दरवळे गंध
सुमने फुलली
सोनेरी पहाट 
मंडळी जाहली.

वैशाली वर्तक 


वृत्तबद्ध उध्दव 
विषय... पहाट 

तम निशेचा पहा सरता
खग नभात उडती  सारी   
किलबिलाट भासे सुंदर 
उठ ,प्रातः झाली न्यारी

पूर्व दिशा पहा उजळली
शीत मंद वाहे वारा
सुमनांचा गंध दरवळे
शुभ भासे परिसर  सारा

घर रांगोळीने सजले
स्वर भुपाळीचे कानी
प्रातः वेळी ऐकू  येते.   
सुमधुर स्वरांची गाणी

आशा रुपी कळ्या फुलती
होता रवीचे आगमन
दूर दूर होई   मरगळ
मनाने आनंदती जन

क्षण आनंदाचे भासे
नव आशा येती ध्यानी 
रामाचा गजर अंतरी
 भजन धून येते कानी              

वैशाली वर्तक

गुरुवार, ३० जुलै, २०२६

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

सिद्ध साहित्य‌‌‌क समूह आयोजित 
पत्र लेखन स्वरुपात कविता 
विषय ...या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे 



पत्राद्वारे तुजला पुसते
का मनात उगाच निराशा
बघ आला सूर्य नभात 
घेऊन सर्वांसाठी नव आशा

  शुक्र तारा घन घोर तिमीरी
तेजाळे पहा सदेव कसा
फुल कोमेजता फळ डोलते
मधुर स्वाद मिळतो असा

 सुंदर  आहेची  हे जीवन
देवे दिधलेल्या या जन्मावर 
सहर्ष करिता स्वागत
 लाव सार्थकी तू  जन्मभर 


आजचा सारा हा खटाटोप 
  मी केला.हेच सांगण्या
प्राप्त काळ असे मनोहर
कर मन आनंदी जगण्या

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, २७ जुलै, २०२६

झाले गेले विसरून जावे

जगाचा पोशिंदा साहित्य समूह आयोजित 
काव्यलेखन उपक्रम 
दि २७\७\२६
विषय ...झाले गेले विसरून जावे
शीर्षक..


झाले गेले होऊन गेले
नको मनी तयांच्या साठवणी
जगुया  दिन आजचा आनंदाने 
कालच्या दुःखाची नको उजळणी.

करा मनाची स्वच्छ पाटी
जाणा मोठ्या मनाची महती,
कोणी दिले  , कोणी नाही 
याची विसरा आता गणती.

नका करु मन संकुचित 
मिळता कधी चिमूटभर ,
मन हवे सदा समाधानी
मिळेल उद्याला मुठभर

कालची गोष्ट आज विसरा
नव्याने उजळली, ऊषा आता
दावील ती नव्या दिशा
कशास हव्या कालच्या बाता.

झाले गेले गंगेला मिळाले 
असे वदती वडील धारी 
आहे तेची खरे जीवनी
सुबोध त्यांचा असेची  भारी

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद 
८१४१४२७४३०


.

रविवार, २६ जुलै, २०२६

आठोळी रचना. लक्षवेधी

काही असतात लक्षवेधी 
स्वतःचे अस्तित्व दाखविण्या
दाखवितात चुणुक बुद्धीची
लक्ष आपल्या कडे वेधण्या

अर्जून होताच लक्षवेधी
परिक्षेत दिधले उत्तर 
दिसे मजला फक्त डोळाच
द्रोणाचार्य जाहले निरुत्तर

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

जुगलबंदी

काव्य निनाद  राष्ट्रीय साहित्य मंच पुणे 
काव्यलेखन उपक्रम 
विषय .. जुगलबंदी 
शीर्षक.... सादरीकरण 

वदता शब्द जुगलबंदी 
येई विचार मनात 
चाले  ही क्षणा क्षणाला 
रोजच्या जीवनात 

दुजा अर्थ असे स्पर्धा 
दिसते ती ,हर क्षेत्रात 
 खेळ,गायन, वादन, वा 
 साहित्याच्या लेखनात 

संभाषण राही, सुसंवाद 
भासे  सुरळीत   सदा
स्वतःचा प्रस्ताव  पटविण्या. 
शाब्दिक जुगलबंदी होते कदा

  गायनात दिसे जुगलबंदी 
दोन वाद्य कलाकारांची
श्रोते गण होती खुश 
मिळे थाप कौतुकाची

  जुगलबंदी दावी चुळुक
  आत्मसात केलेल्या गुणांची 
  जीवनात हवी हवीशी वाटे
   स्फुर्तीने  लहर  येते आनंदाची

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, २२ जुलै, २०२६

कसे जमते तुज सारे

काव्य निनाद राष्ट्रीय साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम 
दि 22/7/26
विषय .. कसे जमते तुला
शीर्षक.. हिशोबनीश

कसे तुजला जमते रे
तु‌च आम्हाला आधार
सारी सृष्टी  विसंबित तुजवरी
 संभाळीतो जगताचा भार


तुझ्या अस्तित्वाचा खेळ
आहे या जगी न्यारा
तूची घडविशी तोडीशी
जगातील पसारा सारा



तूची दिले सुंदर  आकाश
निर्मीले सूर्य चंद्र तारे
तव कृपा प्रसादे घडती ऋतु
तुझ्या विना कुठले आनंद वारे  


कसे राहे आठवणीत तव
संचित कर्म मानवाचे
घडविशी अमुचे  आयुष्य 
दावीत  दिन सुख दुःखाचे

घडविशी रोज सकाळ 
कालचक्र उषा अन् निशा
चाले खेळ सुख दुःखाचा
रोज नव्याने देतो दिशा


अंत समयी येती शब्द 
तुची खरा हिशोबनीश
जाणती तव अस्तित्व 
म्हणती तुजला जगदीश

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

सोमवार, २० जुलै, २०२६

रिकाम्या हाताची श्रीमंती

 रिकाम्या हाताची श्रीमंती 

20/7/26


आपण रिक्तची हस्ते
जाणार ही रिकाम्या हाती
कमवावी मनाची श्रीमंती
सुबोध  हा संतची. सांगताती

हात दिधले सत्कर्म कराया
नाही फक्त  शोभवाया आभुषणे
दान धर्मे दीन पतिता उठवावे
हेच बिंबवावे सदा मने

यातच दडलेली असे

रिकाम्या हाताची  श्रीमंती
हाच मंत्र ठेवा ध्यानी
हीच शिकवण  देते  आपली संस्कृती 

रविवार, १९ जुलै, २०२६

किंवा किंव्हा अथवा

किंवा \ किंव्हा

 किंवा शब्दच असा की
 देतो आपणा पर्याय
 आवडीचे ते घेण्यास
 सांगे सहज  उपाय.

सुरू काळ शिक्षणाचा
परीक्षेच्या पेपरात
देती विकल्प प्रश्नास
किंवा दिसे प्रामुख्यात

छंद असती अनेक 
निवडती आवडीने
तेथे पर्याय असती
 स्विकारण्या  ते स्वेच्छेने 

किंवा,  वा , अथवा , आहे
शब्द सारेची   आगळे
कोणताही उचलावा
नाही अर्थात  वेगळे .

जिंकू वा मरू पर्याय 
असे सदा सैनिकांना
स्वदेशाच्या रक्षणार्थ 
उभा रही बलिदाना

 घडविता भवितव्य
 तया  महत्व  जीवनाते
 पडे प्रश्नची मनास
 कठीण निवडण्याते.

वैशाली वर्तक

गुरुवार, १६ जुलै, २०२६

म्हणी वरून. गरज सरो वैद्य मरो

माझी लेखणी
दिलेल्या मुद्यावर लेखन
 गरज सरो वैद्य  मरो

*स्वार्थी  स्वभाव*

मानवाच्या स्वभावात
ळ काही  असती स्वार्थी ळ
  स्वभावास नाही औषध
तर काहीअसती निस्वार्थी

रोज होणा-या वर्तनात
कळु लागतो स्वभाव
हळु  हळु टाळतो तया
वाटे नको त्याचा सहवास

काही जन बोलती गोड
काढून घेती आपले काम
काम होता जाती विसरून
कोण कुठले ,[कुठले धाम

अशा  जनांची वृत्ती असे 
गरज सरो वैद्य  मरो
काम आपले होता साध्य
तुमची किंमत  भले शुन्य  ठरो

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १३ जुलै, २०२६

माया.

काव्य स्पंदन राज्यस्तरीय स्पर्धा 02
काव्यलेखन स्पर्धा 
प्रकार अष्टाक्षरी 
विषय माया

शीर्षक... मायेची पखरण


माया असते आईची
कधी न होता आबाळ
अहोरात्र तिज चिंता 
सुखी राहो तिचा बाळ.

आभाळाची विशालता
कशी करावी मोजणी
भाव मातेचे मायेचे
 नसे शब्दात मांडणी


माता   पशू  वा पक्ष्यांची
माया ती आभाळभर
जरी ,गगनी  भरारी
 लक्ष मायेचे पिलावर


गुरू शिष्याची माया ही
असतेच मनी खास 
   शिष्य पार्थास.   कृष्णाने
विश्वरूप दावी खास!.


माया अगाघ देवाची
किती वर्णावी  महती
    काळ संपे जीवनाचा
शब्द    तोकडे भासती.


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, ५ जुलै, २०२६

पाटाचे पाणी

काव्य स्पंदन राज्यस्तरीय 2
आयोजित झटपट काव्य लेखन स्पर्धा 2

विषय   पाटाचे पाणी
शीर्षक  शिवारी स्थान निवांताचे


देश आपला कृषी प्रधान 
करावी लागते सोय  जलाची
कृषिवलाच्या जीवनात गरज
सदैव पाटाच्या पाण्याची .

शिवारातून वहात असते 
झुळूझुळू पाटाचे पाणी
त्याचा आवाज भासे
जणु गोड मंजुळ गाणी 


  वहात्या  पाण्याचा बांध 
जणु ठिकाण निवांताचे
घास भरवी  प्रेमभावे
घरच्या भाकर तुकड्याचे

 पाटावर विसावला बळी 
तृप्त मने खाता भाकर
होई मनी समाधानी 
 नाही आपण कुणाचे चाकर
 
 थंड मंद वाहे पाणी
 पक्षी पण घेती आनंद 
सकाळी  पाण्यासाठी येता
खेळ त्याचा पहाण्याचा लागे छंद.

पाटाच्या पाण्यावर पहा
किती मन रमते
पाणी देते मना ऊर्जा 
 वहाते  पाणी पहाणे गमते


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शनिवार, ४ जुलै, २०२६

हसरी सकाळ

विश्व लेखकां


विश्व लेखकांचे 
आयोजित काव्यलेखन 
दिलेल्या विषया वर 
विषय.  हसरी सकाळ 


ऐकू आली किलबिल
भासे झालीय सकाळ 
रवी राजे येता नभी
झाली पहा  उष:काळ

प्राची हळु उजळली
रवी   किरणे फाकली
सडे केशराचे नभी
उषा लाजत हासली.

 थंड मंद पवनाने 
दिशा जाहल्या गंधित 
फुले फुलली मोहक 
मन जाहले मोहित

 केली दूर मरगळ
उषा देते मना आशा 
उठ मानवा प्रभाती 
दूर सारूनी निराशा

मंद स्वर कानी आले
गोड ऐकता भुपाळी 
मंगल मय नाव मुखी
 भासे सुखद सकाळी 

रोज. येऊनी गगनी
दिनकर करी उषा
करी  हसरी प्रभात
उजळती दशदिशा

 वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

सोमवार, २९ जून, २०२६

उखडलेली मुळे

काय पण योगायोग पहा आजच हा विषय दिला आणि..
आजच माझ्या दातांची  implant treatment सुरू झाली. आधी माप घेणे झाले. आणि मग आजच्याच
दिवशीत treatment  दातांचे काम सुरू झाले.
जुने अर्धे तुटके ..काही खराब दात  उखडण्याची प्रकिया  इंजेक्शन देऊन  तेवढा भाग डॉक्टरांनी बधिर करण्याचे
काम सुरू केलं...
बधिर केल्याने. दुखत नव्हते पण कुठे तरी मधून कळ वा झिणझिण्या येत होत्या ."आलिया भोगासी असावे सादर" तसे मनात म्हणत. देवाचे मनात नामस्मरण करत.  दातांची प्रक्रिया सहन होते.
   अरे हो सांगायचे की मला गार्डनीगचा खूप छंद आहे रोज सकाळ चा १ तास त्यात जातो. .प्रेमाने रोपांना कुरवाळत
त्याची निगा घेते.    पण  त्याच बरोबर.  लाॅनवर उगवलेले फालतु गवत. तसेच. फालतु वा  अगांतुक
रोपे.. वाफ्यातील कित्येकदा उखडत असते .  त्या आजवर उखडलेल्या.     मुळापासून  वा मुळासकट उपटून काढलेल्या मुळांना पण झालेले खंत. मी  मनातल्या मनात  देवाला व्यक्त केले व मनात त्या रोपांना  sorry म्हटले. त्या मुळांना पण झालेली व्यथा ही मनोमन जाणली   . वाईट वाटले.
      असं आहे तर... आपल्याला त्रास झाला तर मला मुळांची खंत जाणवली.
    


गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...