मोहरली लेखणी साहित्य समूह
आनंद कंद वृत्तात
विषय दु:ख
सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे.
नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे
संतोषिला मनाने,वाटे न खेद त्याला
दु:खात मोद शोधी, भासे सुखी जगाला.
मिळताच मोद जीवा, येताच सुख घराला
राही सदा खुषीने , आनंदिला क्षणाला.
दाटून कंठ येतो, वाटे नकोच जगणे
डोळ्यात अश्रु धारा,नित्याच झाल मरणे.
ठेवून शांत जीवा, जाईल दु:ख सारे
शमतील दु:ख आता, वाहेल सुखद वारे
वाचून संत वाणी, माझे मला कळाले
नाही जगी सुखी तो ,भय दु:ख ते पळाले.
