मोहरली लेखणी साहित्य समूह
आनंद कंद वृत्तात
विषय दु:ख
सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे.
नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे
संतोषिला मनाने,वाटे न खेद त्याला
दु:खात मोद शोधी, भासे सुखी जगाला.
मिळताच मोद जीवा, येतेच. सूख घराला
राही सदा खुषीने , आनंदिला क्षणाला.
दाटून कंठ येतो, वाटे नकोच जगणे
डोळ्यात अश्रु धारा,नित्याच झाल मरणे.
ठेवून शांत जीवा, जाईल दु:ख सारे
शमतील दु:ख आता, वाहेल सुखद वारे
वाचून संत वाणी, माझे मला कळाले
नाही जगी सुखी तो ,भय दु:ख ते पळाले.
आनंद कंद वृत्तात
दुनिया
आहेच हे खरे की, दुनियेत रीत न्यारी
जावे कुठे तरी ती, सोपी नसेच सारी
दुनियेत लोक नाना, सारे कसे शहाणे
वेडेपणाच दावी , होऊन ते दिवाणे
कोणास वेड भारी,कोणात ती धडाडी
काही उगाच भित्रे, काही करी लबाडी
होते असे कधी ते, सोडून चोरट्याला
शिक्षेस योग्य मानी , निष्कारणी जनाला
चाले असा निरंतर, दुनियेत खेळ सारा
वाटे मनी कधी हा , होईल नीट न्यारा.
वैशाली वर्तक
