गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

सहाक्षरी ...काय म्हणू सांगा

साहित्य दर्पण कला मंच नागपूर 
आयोजित उपक्रम 
दि ५\९\२४
विषय.. काय म्हणू सांगा 

सारे जन झाले 
  मोबाईल वेडे
होताची सकाळ 
 तया विणा अडे

स्मरण देवाचे 
 विसरून जाती 
कर न जोडता 
 फोन घेती हाती 
 
घरात असून 
संवाद संपला
 हर एक जण
स्वतःत गुंतला


काय म्हणू याला
विज्ञान प्रगती
कोणत्या शब्दात 
वर्णावी महती

एकत्रित होणे
बसून बोलणे
होत नाही आता 
विचार सांगणे

फायदे आहेत 
गुगल  हा गुरू 
 हजर क्षणात 
ज्ञान धडे सुरू 


फायदे तोट्याचा 
करूया विचार 
होण्यास  आनंदी 
जीवन साकार 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...