सिध्द साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम
अभंग लेखन
विषय. ...जीवन
जन्म अन् मृत्यू. | यातील काळास|
जीवन प्रवास | वदताती ||
रम्यची तो काळ |. बालपणी असे. |
चिंता कधी नसे. | बालपणी. ||
पुढचा तो काळ | येतो प्रौढत्वाचा |.
दावी कर्तृत्वाचा | याच काळी. ||
संस्कार मिळाले | कर्म हाची देव |
तीच मोठी ठेव. |. जीवनाची ||
जोडीदार सह | आनंदी जीवन |
लाभे मनोमन | जीवनाते ||
वृत्ती समाधानी. | हवी तडजोड. |
संसार तो गोड | होत असे. ||
संसारिक सुख |. लाभे प्रपंचाला |.
आनंद मनाला.|मिळतसे. ||
जीवन जगणे | असे कला छान |
जीवनाची शान | वाढवावी ||
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अक्षरछंद उपक्रम २
मोठा अभंग
विषय. संसार
दि १६\८\२५
फुलावे संसारी |सुखाचे चांदणे |
देवाशी मागणे |सर्वांसाठी. || १
संसार म्हणजे | सुख दुःख खेळ |
जमवावा मेळ | आनंदाने || २
मातेचे संस्कार | रहा समाधानी |
नको अभिमानी | संसारात. || ३
करण्या सुखाचा | प्रेमाचा संसार |
ऐका गीता सार | नित्य नेमे. || ४
संसाराची चिंता |असता नवीन |
संसार कठीण. | वाटतसे || ५
विण ती प्रेमाची | जरी दोन मने |
भासते न उणे. |एकमेका. ||६
सदा ठेवा ध्यानी | नको कुरघोडी |.
टिकवण्या गोडी |संसारात ||७
मिळे सुख सदा | हवी वाणी गोड |
करा तडजोड. | संध्याकाळ || ८
माझिया संसारी |सुखाचे चांदण |
वंदिते चरण | ईश्वराचे || ९
वैशाली वर्तक,
अहमदाबाद

