बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

विधीलिखीत


विषय - विधिलिखित           13/7/2020


सामान्यतः असे  वदती जन
जे होते ते असते विधी लिखीत
मग कशाला करायचे प्रयत्न 
व्हायचे ते होणार हे...  खचित

कधी कोणास मिळते चिमूटभर 
तर कोणास मिळते ओंजळभर
ते तर असते विधीलिखीत फळ
तयासाठी लागते सत्कर्माचे बळ

म्हणती वृषभ रास असे भाग्यवान
चुकले का तयांना दुःखाचे पहाड
देवत्व पावूनी पण, कृष्ण अन् रामाला
सुटली नाही  दुःखाच्या नशिबाची पाठ

नैसर्गिक  आपत्तीत दगावतात माणसे
देवाच्या कृपेने तरली जाती लहान अर्भके
तिथे म्हणावे खेळ  विधी लिखीताचा
न करिता सायास जीव वाचविण्याचा

घडायचे ते घडणार ते नाही चुकणार
विश्वास हवा बाहुवर नको हस्त रेखांवर
अन् ठेवावी सदा दृढ श्रध्दा देवावर
मग विधी लिखीताची होते कृपा दृष्टी  आपणावर



वैशाली वर्तक
नोंदणी क्रमांक 189
अहमदाबाद 
गुजरात  स्टेट
8141427330

संयम. गुण स्वभावाचा

कमलविश्व राज्यस्तरिय स्पर्धा साहित्य समूह
आयोजित
मासिक भव्य राज्यस्तरिय काव्य स्पर्धा
विषय     संयम
      *गुण स्वभावाचा*

  संयम  हवा जीवनी
वागण्यात बोलण्यात
आणावा तो अंमलात
सुखी होतो जीवनात

रोजच्या जीवनाला
लावा वळण संयमाचे
म्हणजे जगण होते 
सदोदित नियोजनाचे 


नदीला असतो काठ
सागरास  असे किनारा
त्यामुळे वसतात नगर
  अन  मानवास निवारा

मर्यादा दिसे निसर्गात 
म्हणूनच चाले ऋतुचक्र
जरा होता असमतोल
होते निसर्गाची  दृष्टी वक्र


 ताबा हवा मनावर
 त्यालाच  संयम म्हणती
असे  तोची महत्वाचा 
सुखी होण्या जगती
  

वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

असाच यावा पहाट वारा \उनाड वारा शब्दचित्र लेखन\! गार वारा कविता पिसाट वारा

कल्पतरू जागतिक साहित्य मंच
आयोजित
दशपदी काव्य
विषय - असाच यावा पहाट वारा

सोनसळी किरणांची उषा
देते मनास नवीन आशा

थंड वा-याची मंद झुळुक.                            
करी सदैव मना उत्सुक



पक्षी करीती किलबिलाट
करी प्रसन्नतेची पहाट

मंद स्वरात ऐकू भुपाळी
मंगलमय मन सकाळी

असाच यावा पहाट वारा
मरगळीस नसेची थारा

अनुभवावी अशी पहाट
पहावा तिचा अनोखा थाट


वैशाली वर्तक

शेतकरी साहित्य मंच
आयोजित उपक्रम क्रमांक ६८
४\१\२३.                                             वर्ल्ड व्हिजन टाईम्स मधे



                                                 

विषय ..उनाड वारा
  
फिरत होते रानमाळी
करी उल्हासित थंड वारा
देई स्फुर्ती तना मनाला
आनंददायी  निसर्ग सारा 

डुलत होती रोपे ,तरु
वा-याच्या लयीत तालात
भासे पर्णे वाजवी टाळ्या
मन गुंतले  रम्य निसर्गात

क्षणात आला *उनाड वारा* 
पहाता पहाता सुसाट झाला
खट्याळ दावी खट्याळपणा
कशी सावरू मी पदराला

मन पडले विचारात
थंड मंद झुळूक कशी
वाटे सदा हवी हवीशी
कानी कुजबुजते जशी

फिरत राहिले रानमाळ
रान फुले फुललेली मोहक
हसून जणु खुणावी डोलत
  रंगी विविध चित्त वेधक


 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

####################################################
विश्व लेखकांचे 
शब्द चित्र लेखन 
विषय ... खिडकीतून येणारा वारा

    श्रावण महिन्याचे दिवस होते. रजेचा दिवस त्यामुळे सारे कसं निवांत चाललं होते.
सकाळ चा चहाचा कप घेऊन बसले.  अलवार रेशीम पावसाच्या सरी पडत होत्या.
मी समोरच्या खिडकीतून येणारी थंड झुळूक अनुभवत व चहाचा मधे घोट घेत होते.
वा-याची थंड मंद झुळूक मनाला प्रसन्नता देत होती. 
     थंड वा-या सोबत खिडकीतून हळुच डोकावणारी जुईची फांदी जणू वा-यास आत ये  असे खुणेने सांगत होती. व  नाजूक पांढऱ्या फूलांचा सुगंध दरवळत होता. किती सुरेख. निसर्ग रम्य वातावरण चा अनुभव येत होता. 
    खिडकीतून पहाता छोटी रोपे वा-याच्या तालावर डुलत होती. जणु काही घरात लावलेल्या गाण्याचा  संगीताचा ताल साधत होती. रोपांची पाने आनंदाने टाळ्या वाजवित होती. 
  खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे निसर्ग निर्मित वातावरण झाले होते. मी पण या वा-यावर जाम खुश झाले. पण मधूनच वारा त्याचा खट्याळ पणा दाखवित होता.  खोडकर वारा पुन्हा पुन्हा माझा पदर सावरण्यात त्रस्त करत होता. आणि भाळीच्या लाडिक बटांना पुन्हा पुन्हा सावरण्यात माझा चहा थंड होत होता.
     तेवढ्यात जोराची पावसाची सर आली . व मला खिडकी बंद करावी लागली . वारा खिडकीवर थाप देत राहिला.
     

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

[20/12/2021, 8:16 pm] Vaishali Vartak: कल्याण डोंबिवली महानगर समूह2
आयोजित 
उपक्रम
काव्य लेखन 
विषय - गार वारा


 तप्त ग्रीष्मात हवासा वाटे
 थंड   गार गार वारा
स्पर्शता सुख अनुभवे
झुळुक रूपात न्यारा

  गार वारा  सोसायट्याचा
वाहे येता वर्षाधारा
मुजोर वारा छळे ललनास
पदर सावरता उठे शहारा

थंड गार वारा शरदातला
झोंबता अंगास भासे थंडी
सहज करी आठवण 
घाला गरम कपडे बंडी

   समुद्र किनारी  गार वारा
वहात येई लाटांवरी
 करीता गुजगोष्टी लाटांशी
  प्रसन्नता देई किना-यावरी


ऊन्हाच्या झळा साहूनी
 शीत वा-याचा घेण्या सहारा
सुसह्य करण्या   भासे गरज
वातानुकुलचा थंड वारा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित 
उपक्रम अष्टाक्षरी काव्य लेखन 
विषय ..आला अवखळ वारा 
 शीर्षक   *पिसाट वारा*


 होते बसले अंगणी
आली झुळूक वा-याची
किती पहा अलवार 
भासे मना उल्हासाची

मन पहा हर्षे  कैसे 
संतोषिले क्षणभर
तप्त जीवाला भासले
दिला मोद खरोखर .

क्षणी  बदलले रूप
वारा जाहला पिसाट
तरू  भासती  हासरी
 हास्य  ते खळखळाट 

खाली पडलेली पाने
फेर धरूनी नाचती
वाहे अवखळ वारा 
लोट धुळीचे उडती

त्रस्त करीता जिवाला
जीव नकोसा जाहला
वाटे कसे मी सावरू
माझ्या साडी पदराला.

वैशाली वर्तक 




पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...