शनिवार, ५ जून, २०२१
हिराव्या हिरव्या पाती वरती. पानावरचा बिंदू
शुक्रवार, ४ जून, २०२१
रोही पंचाक्षरी पर्यावरण
बुधवार, २ जून, २०२१
पावसाची सर
महाराष्ट्र साहित्य सुगंध
उपक्रमासाठी
विषय - पावसाची सर
कृष्ण मेघांचे आभाळ
वारा वाहतो जोरात
उडे पाने चोहीकडे
मेघ गर्जती नभात
मोर नृत्य मनोहर
पक्षी झेलती थेंबांना
धारा पडता अंगणी
हर्ष होई बालकांना
सर पावसाची येता
मृदगंध पसरला
तृप्त जाहली अवनी
मोद भरूनी उरला
लता वृक्ष तरारल्या
दारी पागोळ्या पडती
मुले ओंजळ भरुनी
मोदे पाण्यात खेळती
जो तो जाई भारावूनी
मजा पावसाची वेगळी
मन होई उल्हासित
चव भज्यांची आगळी.
राहे स्मरणी पाऊस
आठवांना येई पूर
घडो जरी गतकाळी
येतो भरुनिया ऊर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मंगळवार, १ जून, २०२१
करु सुखाची कल्पना
करु सुखाची कल्पना
मनी सुखाची कल्पना
असे सर्वांच्या मनात
येतो सहज विचार
सदासाठी विचारात
कल्पनेत रमण्यात
मिळे वैचारिक सुख
दोन मिनीटे आनंद
देत करी, दूर दुःख
पहा संपले अरिष्ट
समृद्धीचे वाहे वारे
सुरु झाल्या भेटी गाठी
आनंदेल जग सारे
करु सुखाच्या कल्पना
देती मनास उभारी
येता आनंदी विचार
मनी लाभे सुख भारी
वैशाली वर्तक
अष्टाक्षरी आहिल्याबाई होळकर
: सुख आले माझ्या दारी
[3/10/2020, 8:20 pm] Vaishali Vartak: सुख आले माझ्या दारी
सुख वसे मनातच
सांगे साधु संत जना
नका शोधु तया जगी
आहे ते आपुल्या मना
हेच भाव मी माझ्या
राखियले मी संसारी
भासे मजला सदाची
सुख आले माझ्या दारी
कृपा दृष्टी ही देवाची
मजवरी सदासाठी
नाही भासली उणीव
हरी उभा माझ्या पाठी
भाग्यवान मी मानीते
वाहे आनंद सरिता
सौख्य लाभेले मजला
सांगे ही मम कविता
वैशाली वर्तक
[3/10/2020, 9:04 pm] Vaishali Vartak: होता मी पाहिला स्वप्नात
माझ्या मनाचा राजकुमार
जसा हवा तसाची दिसला
आनंदाला न राहिला पारावार
उंच पुरा राजबिंडा
हसत मुख मन मिळावू
पाहताच मनी भरला
वाटले जाऊनी तया खुणावू
स्वप्नातील संवादात
विद्याधर आहे कळले
मनीचे स्वप्न माझे
हळु हळु छान वाटले
भेटलाच अवचित
केले संवाद भाषण
दिली मनाची संमती
वाढले ते आकर्षण
स्वप्नात मी रंगले
पाहिला तो सोहळा
वाटले हवा तसा साथी
जमला होता गोतावळा
सकाळच्या पूजेची घंटा
ऐकू येताच कानी
जागी झाले स्वप्नातूनी
स्मरते अजूनी हृदयी
ऊब तुझ्या मिठीची
ज्याची कधी तुलना नाही
सर नाही तयात कशाची
मृदगंध
विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अष्टाक्षरी काव्यलेखन विषय मृदगंध किती वसुने साहिल्या तप्त उन्हाच्या झळा काया तिची भेगाळली भासे ज...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...
