शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

एक प्रवास आयुष्याच्या आयुष्याची रंगीत पाने

 काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 

नवाक्षरी कविता 

 विषय..एक प्रवास आयुष्याच्या 

*आयुष्याची रंगीत पाने 


पाने चाळली आयुष्याची

पान  प्रत्येकच सुंदर 

निहाळली सरलेली ती

होती सारीची मनोहर 


बालपणाचे निरागस 

होतेची पान आनंदित

नव्हते त्यात हेवेदावे

चिंता  व क्लेश विरहीत


यौवनाचे  तर गुलाबी

रंगविलेली स्वप्ने मनी

 कधी किनारी उपवनी

ताज्या झाल्या की आठवणी 


  कर्तव्याचे अन् कर्तृत्वाचे 

 नजरेत येताच  पान

 चढले स्फुरण मनात 

 मिळविलेला जगी मान


आयु करण्या  सप्तरंगी

केली उधळण रंगाची

जगले सदा स्वच्छंदाने

गीत गाणी आनंदाची


रंगची देती मोद जीवा

पहाताची मन झाले दंग

किती मोहक भासले ते

एकाहून एक सुंदर  रंग


मिळाला जन्म मानवाचा

करावे सोने  आयुष्याचे

नको खंत निराशा मनीं

रंग उधळू आनंदाचे


शिकवण माता पित्याची

 संस्काराची सदैव गाठी 

सुख लाभणार संसारी

 विश्वेश्वर सदेव पाठी


 रमले सुखाच्या जीवनी

पान समोर समाधानाचे. 

दिले सारेची विधात्याने

ऋण मानीते  विधात्याचे



वैशाली वर्तक 

अहमदाबाद 







रविवार, २६ जानेवारी, २०२५

सुजाण नागरिक सावध ऐका पुढल्या हाका


सारस्वतांची मांदियाळी (R)

समूह आयोजित उपक्रम क्रमांक 11

विषय...सुजाण नागरिक 

          *विश्वात महान*


आपण नागरिक भारतभूचे

मनी असावा देशाभिमान 

तशीच हवीच देशभक्ती 

देश शोभण्या *विश्वात महान*


पाळू  नियमाची चौकट

राखू स्वच्छ सुंदर भारत

 होऊन सुजाण नागरिक 

देश प्रगती साठी  करू मेहनत


आपण सुजाण नागरिक 

ऐकू  येता मदतीच्या हाका

जाऊ धावून देश रक्षणा

येता कधी प्रसंग बाका.


लावूया झाडे ,वाढवू वनश्री 

जतन करू पर्यावरण 

असता आपण सुजाण नागरिक 

कच-याचे करु नीट नियंत्रण.


गिरवू  पाठ शिस्तीचे. 

करूया संस्कृतीचे  जतन

भाव मनी विश्व बंधुत्वाचा

 समानतेचे  राखू. मनी धोरण



  फिरवा नजर इतिहासात

 नव्या पीढीला करा जागृत

  समजवा यातना पारतंत्र्याच्या

  उमजता होतील  स्वीकृत


 सरकार, *आपणच,आपलेच,आपल्यासाठी*,

 हा मंत्र ठेवू. सदैव ध्यानी 

 चला तयारी करू उन्नतीची

 एकत्र मिळून सुजाण नागरिकांनी 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

26/1/25


काव्य निनाद साहित्य मंच पुणे 

आयोजित उपक्रम 

दि 3/4/25

विषय ...सावध ऐका पुढल्या हाका

  शीर्षक...सुजाण नागरिक 


आपण नागरिक भारतभूचे

मनी असावा देशाभिमान 

तशीच हवीच देशभक्ती 

देश शोभण्या *विश्वात महान*


पाळू  नियमाची चौकट

राखू स्वच्छ सुंदर भारत

 होऊन सुजाण नागरिक 

देश प्रगती साठी  करू मेहनत


आहोत सारे कर्तव्यदक्ष 

ऐकू  येता मदतीच्या हाका

जाऊ धावून देश रक्षणा

येता कधी प्रसंग बाका.



लावूया झाडे ,वाढवू वनश्री 

जतन करूया पर्यावरण 

 बनवु सुंदर स्वच्छ भारत

कच-याचे करु नीट नियंत्रण.


गिरवू  पाठ शिस्तीचे. 

करूया संस्कृतीचे  जतन हे

भाव मनी विश्व बंधुत्वाचा

समानतेचे  राखू. मनी धोरण


  फिरवून नजर इतिहासात

 नव्या पीढीला करा जागृत

  समजवा यातना पारतंत्र्याच्या

 उमजता तेही होतील,   स्वीकृत




 सरकार, *आपणच,आपलेच,आपल्यासाठी*,

 हा मंत्र ठेवू. सदैव ध्यानी 

 चला तयारी करू उन्नतीची

 एकत्र मिळून सुजाण नागरिकांनी 




वैशाली वर्तक 

अहमदाबाद


वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...