शनिवार, २० जून, २०२६

ओळखीचा

ओळखीचे तर असतातच आधार देण्यासाठी.तयात नवल नाही. पण जो जाणतो नाही. अपरिचित आहे असा आधारास उभा रहातो तेव्हां त्यांचे जास्त कौतुक वाटते.
पण सध्याचे जीवन वा सर्व चे वातावरण जरा कलुषित झालेले आहे. त्या मुळे अनोळखी जरा मदतीस उभा राहिला तरी मन आपले साशंक होते आपण लगेच त्याचा अधार घेऊ इच्छित नाही.
कारण काळच बदलला आहे. त्यामुळे पटकन त्याच्या आधार आपण  नकोम्हणतो वा  टाळतो.
       आपल्या बालपणी शेजार पातजारांवर, आपले पालक मुले ,घर सोपवून जात. अजून ही ती संस्कृती flat मधे आहे. नाही असे नाही.  पण तेव्हाही आपल्याला अनोळखी माणसाने काही दिले वा. काही माहिती विचारली तर देऊ नको ही शिकवण तेव्हाही होती आज ही आहे.
    कारण लबाडी. फसवणूक हे दिवसैदिवस वाढत आहे. त्यामुळे जागरूक. सावलीची ही बाळगावीच लागते.
अनोळखीशी जरा दोन हात लांबच रहावे लागते.
        पण आता विज्ञानाने फारच प्रगत केले आहे जगताला. हे face book, insta , Whatsapp वगैरे तून सर्व माहिती सहज मिळू शकते. व अनेक fraud वाट फसवा फसवी चाली आहे. त्यामुळे अनोळखी पण उतराई ने आपणास फसवू शकत आहे. तेव्हा आपला ओळखीचा आपल्या सतत हाताय   आपला श्वास बनून रहाणा-या मोबाईल ला जपा संत statu टाकून आपली माहिती इतंबुत कळणार नाही ची काळजी घ्या 
ओळखीचा. नाही तर आधार तोडणारा होईल

शुक्रवार, १९ जून, २०२६

गझल..... वृत्त अनलज्वाला.

 गझल.....................

गझल
अनलज्वाला  ८-८-८

कष्ट करूनी यश मिळवाया झगडत गेलो
भौतिक सुखात नकळतची मी हरवत गेलो.

मान मिळविला  हजारो गुन्हे  करूनी जगी.  
  लोकांना मी सत्याचे पाठ शिकवत गेलो
                                            
 क्षणभर येता  दिन दु:खाचे  कष्टी जीवा
हास्य किस्से सांगूनी मी हसवत गेलो.

केला प्रयत्न सदा उजळण्या  जीवन सारे.        
कुसंगतीने  व्यसनात  पहा अडकत गेलो.

वृक्ष तोडून  सिमेंट राने किती बांधली
पर्यावरणा जपता धान्ये उगवत गेलो.

सोमवार, १५ जून, २०२६

सुरकुत्यांची कहाणी

सुरकुत्यांची कहाणी
सहज गुगल फोटो निहाळत होते.त्यात दोन वर्षा पूर्वी चे फोटो आले. पाहून मन  हरकले, .मी मनात म्हटले," अरे वा
दोन वर्षांपूर्वी आपण छान दिसत होतो की !  खरच या मोबाईल ने फेसबुक ने आपल्या ला दोन.. तीन.. काय 8/10वर्षापूर्वी आपण कसे दिसत होतो  ह्याच रूप क्षणात दाखवितो.
     मी जस जसे जून्या काळात गेले, तर मनी हर्ष वाढतच गेला,  मग मनाशी म्हटले,
"म्हणजे आता आता म्हणजे दोन वर्षा पूर्वी या सुरूकुत्या कमी होत्या .आता मी प्रत्यक्ष हाता कडे नजर टाकली व मनाला. समजावले , "बाई साहेब आता वृध्दत्वाकडे झुकत चाललात  बरं का  ! शरीरावरच्या  झुर्या झुर्या पहा ..सांगत आहेत .कितीही  केस काळे करा    सुरुकुत्या कुठे लपवणार ? त्या तर त्यांचे अस्तित्व तीव्रतेने दाखविताच आहेत.
     खरय या सुरूकुत्याच  जीवनात. घेतलेले  ,सुख दुःखाचे क्षण . किती आनंद  अनुभवले   किती कष्ट साहिले , यांची कथा आहे. 
आपल्या जीवन काळाचा भुतकाळ सामावला आहे.  त्यांना प्रेमाने मी गोंजांरले . जरा तेलाचा हात प्रेमाने फिरविला . स्नानाला जायचेच होते. तर नीट कांतिला तेल लावले. स्नायूंना पण व्यायाम झाल्याने स्नायू पण जरा ताठरले . .
        अंघोळी नंतर अंगणात आले तूळशीला पाणी घातले व सहज लक्ष इतर लता -वेली ,वृक्षांकडे गेले तर काही झाडांची पाने सुरकतून क्षीण भासली. तर काही निखळली होती. सहज संदेश ल्या वेलीलतांनी , निसर्गाने दिला, 
ऋतूचक्र चालत रहाते. वाढ वृद्धी. झीज हे चालत रहाणार.  मग या सुरकुत्या पण त्यातील एक भाग आहे .
काळ किती लोटला याची त्या पावत्या देताहेत.   क्षण न् क्षण  आनंदाने जगून घे. लेखणीला धार देत रहा. अनुभवाचे गाठोडे जपत  रहा. 


-

सकाळ विषयक. हसरी सकाळ स्वाक्षरी सोनेरी पहाट उध्दव वृत्त

विषय.  हसरी सकाळ  ऐकू आली किलबिल भासे झालीय सकाळ  रवी राजे येता नभी झाली पहा  उष:काळ प्राची हळु उजळली रवी   किरणे फाकली सडे केशराचे नभी उषा ...