शनिवार, ११ जून, २०११

लेख.. V. अलिप्तता


                                                  अलिप्तता 
     मनुष्याच्या स्वभावाचे अथवा वृत्तीचे अनेक पैलू असतात .हसतमुख वा
  उदासीन  मुखदुर्लभ अबोल वा बडबड्या ,समाधानी वा असंतुष्ट ,धीर गंभीर वा 
खेळकर ,एककल्ली वा मोकळ्या स्वभावाचा तर कधी अलूफ अलिप्त प्रकृतीचा   
अशी माणसे आढळतात .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो 
त्यावर व ज्या माणसात वावरतो त्यावर पण थोडी फार अवलंबित असते .अथवा 
काही वृत्ती जन्मताच स्वभावात असतात .तर काही वृत्ती परिस्थितीने अंगीकारल्या 
जातात . आता अलिप्त वृत्तीवर बोलावयाचे म्हणजे ही वृत्ती थोडी फार अंगी असते अथवा 
वर म्हटल्या प्रमाणे परिस्थितीने स्वीकारावी लागते, अंगिकारली जाते .  
    परदेशात अगदी लहानपणापासून स्वतंत्र खोल्या असल्याने स्वतंत्र खोलीत 
रहाणे झोपणे याची मुलांना सवय होते .त्यामुळे पुढे पण  त्यांना आपल्या आपल्यातच  
रमणे रहाणे याची सवय लागते .भारतीय लोक परदेशात जातात, तेव्हा  त्यांना ही
अलिप्तता वृत्ती अंगीकारावी लागते .जवळ शेजारी कोण- कोण रहात आहे ? त्याच्याशी
 दोन-चार मिनिटे आपल्या अंगणातून दारातून वा बाल्कनीमधून गप्पा मारीत उभे आहेत 
असे आढळत नाही . अपार्टमेंट मध्ये सकाळी लिफ्ट मध्ये कोणी भेटले वा सामोरे
आले तर गुड मोर्न्निग ,थांक्यू स्वॉरी , हाव अ नाईस डे   या तीन चार शब्दांच्या पुढे काही 
नाही .एकत्र गाडीत सहप्रवासी एकमेकात सहप्रवाशान बरोबर गप्पा मारत आहेत असे आढळत 
नाही .आपापली पुस्तके ,वर्तमान पत्रे घेवून त्यात डोके खुपसून वाचणे .बस .त्या विरुद्ध परिस्थिती 
 आपल्या देशात दिसते . वर्तमान पत्र दुसर्याच्या  हातात असताना त्यातच डोके घालून वाचणे वा
पेपरातीलबातमी वरून चर्चा करणे ,एवढेच काय चहा अथवा नास्तापण शेअर करणे असा प्रकार
 सहजतेने  आढळतो. 
         परदेशात गेल्यावर भारतीय स्वत: वृतीने अलिप्त नसल्याने चार-पांच कुटुंबे एकत्र येऊन वीक
एंड एन्जोय करत असतात .कारण तेथील सुख वस्तूंनी भरलेले ,सर्वत्र हिरवळ असलेले
पण स्वतः:चे कुटुंब  सोडून दुसरे कोणीच नसल्याने  आठवड्यानी वा  पंधरादिवसांनी एकत्र कार्यक्रम करून जी अलिप्तता भासत असते ती दूर करण्याचा प्रयत्न करतात .    
       मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे .त्याला माणसे ,समाज लागतोच .वर्षानु वर्ष एकाच गांवात राहून 
" आम्ही कधी मंडळात,  समाजात   आलोच  नाहीत , आम्ही   मंडळाचे  सभासद नाही " असे म्हणणाऱ्या    लोकांबद्दल  आश्चर्य वाटते. कसे काय राहू शकत असतील ?  पण तसे नसते अशी मंडळी दुसरी कंपनी ,मित्र जमवून वा
,जोडून रहात असतात .तर  एकूणकाय अलिप्तपणाने रहाणे कोणासच आवडत नाही         
     सध्याच्या  धावपळीच्या युगात थोडे  फार अलिप्त रहाणे अंगीकारावे लागत आहे . वेळेचा अभाव  त्यामुळे 
आपल्या आपल्यातच  रहाणे स्विकारावे लागत आहे.काही व्यक्ती आपली मने लिखाण द्वारे  जरी चार माणसात
मिसळली नाहीत बोलली नाहीत तरी वर्तमान पत्र वा इतर लिखाण द्वारे इतरांशी संवाद साधतात.तसेच   आपल्या
 आवडी निवडी प्रमाणे पेन फ्रेंड्स बनविणे ही पण अलिप्तता दूर करण्याचा  एक प्रकारच   आहे   आपल्या  आवडी प्रमाणे मित्र शोधून थोडया  वेळा साठी  कां होईना  अलिप्तता  दूर करतात.      
      प्रौढत्वाकडे झुकल्यावर वाचनालये ,सोसायटीचे ,कॉमन प्लॉट  मधील बाकांवर ,बागेत जावून  वरिष्ठ
नागरिक त्यांची मंडळे काढून  अलिप्तपणा दूर करत असतात .कारण संसारात  मुले मोठी होवून    
 त्यांच्या त्यांच्या  संसारात रममाण असतात अशा  वेळी  वरिष्ठ नागरिक आपली समवयस्क 
मंडळी गोळा करून आपला अलिप्तपणा घालवीत असतात . अलिप्तपणा दूर करण्यासाठी सध्या  
दूरदर्शन ,कोम्पुटर  वा मोबाईल वर whatsapp वरून संभाषण ही माध्यमे तर फारच उप्यागी ठरत आहेत. ज्याच्या
साह्याने  माणूस दिवसाचा काही वेळ तरी एकाकी पणा दूर करू शकतो .
        संतांनी जरी सांगितले की,जीवन चिकूच्या बी सारखे असावे .अलिप्त .तरी सर्व सामान्य माणसाचे 
आयुष्य  आंब्याच्या कोयी  सारखे असते .कोय जशी आमरसात लडबडलेली असते ना! तसेच मनुष्याचे
 जीवन  संसारात लडबडलेले असते. संतांनाच तो अलिप्तपणा जमतो .पण सर्व सामान्य 
माणसांना नाही. तेव्हा  लेखन ,वाचन ,चित्रपट  पाहणे दूरदर्शन चे कार्यक्रम पहाणे ,कोम्पुटर च्या माध्यमाने
  अथवा आपल्या  हॉबिज जपून,,कला क्रीडा वगैरे च्या  साह्याने काही काळ तरी अलिप्तता 
दूर करू शकतो . बाकी  अलित्पपणा कोणासच पसंत नसतो .     

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...