बुधवार, २१ जानेवारी, २०१५

कधी कधी असा ही प्रवास घडतो .


                                              कधी कधी असा ही प्रवास घडतो .
       प्रवास म्हटला की आयोजन आलेच . सर्व साधारण पणे  प्रवासास जावयाचे म्हणजे  निघण्याची तारीख नक्की करणे , तसेच परतीची तारीख पण नक्की करणे व  त्या प्रमाणे गाडयांची avaibility पाहून , आपल्या वेळे प्रमाणे  योग्य तशी सोयीची गाडी आहेना ? ते आपण पाहून घेतो.  व त्या प्रमाणे दोन्ही आरक्षण करतोच . सध्या  मुंबई काय , पुणे काय  वा इतर  सर्वच प्रवास reservation केले असले तर सुखदायी ,आरामदायी झालेले आहेत. मुंबई  अहमदाबाद  तर अगदी नेहमीच्या रुटीनचे  झाले आहे. आम्ही पण अहमदाबाद -मुंबईचे  व  तसेच  परतीचे पहिल्या वर्गाचे स्लीपर ए सी कोचचे reservation  करून ठरल्या दिवशी परतीचा प्रवास सुरु केला होता .
       शेवटी अहमदाबाद ला  पोहचलो . कधी एकदा अहमदाबाद येते असे झाले होते. आमच्या जवळ सामान विशेष नव्हते व आपल्याच म्हणजे स्वतःच्या शहरात परतत होतो ,त्यामुळे स्टेशन वर घेण्यास कोणीही येवू नका.  आम्ही आमचे येवू हे सांगितले होते .  त्यामुळे न  कोणाची वाट पहाता घरी पोहचलो .
        घरी पोहचल्यावर मुलांनी  विचारले कसा काय झाला प्रवास ? सुटकेचा  श्वास सोडत म्हटले कसले काय ! रात्र भर जागेच आहोत. लगेच मुलांची प्रश्नांची प्रश्नावली झाली . म्हणजे? फस्ट क्लास ए सी चे reservation   होते ना  ?  आणि तुम्ही आलात त्यावरून कळतय  की गाडी पण वेळेतच आलेली आहे . मग काय झाले? कुठे माशी शिंकली?
         अरे ! कसले reservation  विचारतो रात्र भराची झोप नाही. मुंबई  अहमदाबाद गाडीला सीझन असा नसतोच  नेहमीच  गर्दी.  सीटच्या एका टोकाला बसून , बसून कसले! कसे बसे बुड टेकवून रात्र काढली . बाजूची बाई जाम हलायला  तयार नव्हती . नेहमी जी स्टेशने झोपेत जातात ती सर्व स्टेशने  अगदी चक्क उघडया डोळ्यांनी पहिलीत .  मधेच एखादे पोर जोर जोरात रडत होते. खाली, माझ्या पायाशी बसलेली बाई माझ्या पायांना,गुडघ्यांना मान टेकविण्याचे साधन म्हणूनच वापर करत होती . त्यात चहा विकणारे त्या गर्दीत चहाची किटली सावरत ,"'चाय गरम,गरम चाय "ओरडत होते.  तर मधेच ताजा वडा  पाव , तर मधूनच पुरी भाजी असे ओरडत  विक्रेते विक्रीचे काम आणि पैसे वसुलीचे काम सराहित पणे करत होते. रात्र झालेली असून रात्र आहे का दिवस कळत नव्हते . उभे असलेले प्रवासी आशाळभूत  पणे बसलेल्या   लोकांकडे  पहात होते. पण कोणास दया येत नव्हती . चार जणांच्या सीट वर पाचव्या प्रवाशास  जागा ,कशी तरी मिळाली होती .  मिळाली कसली ?मिळविली होती .व तो प्रवाशी पण पुन्हा पुन्हा बसण्याची पोझिशन बदलत होता . मधेच एखादी बाई खाली बसलेल्या प्रवाशांना " जरा जाऊ   द्या ना " म्हणत कसरत करत कशी बशी टोयलेट पर्यंत जावून परत येत होती.  त्यात विकणारे होतेच . मधेच कुणीतरी खावून झालेला  खाण्याचा कागद इकडे तिकडे टाकण्याचा प्रयत्न करत होते . अथवा सीट  खाली जागा दिसेल तेथे ढकलत होते . गाडी थांबली  की  थंडीचे दिवस असून सुद्धा गर्मी जाणवत होती .
         अग पण  reservation होते ,फर्स्ट क्लास ए सी चे तिकीट होते त्याचे काय झाले ? तिकीट हरविले की विसरलात व गाडीत बसल्यावर कळले की तिकीट नाही व pan no.पण  नाही  म्हणून ? मुलांनी  एकदम प्रश्नांचा  बडीमार केला.
        नाही रे! या वेळी reservation आपण बोरीवली हून केले. कारण मुंबईची सर्व कामे आटपून उशिराची गाडी घेतली . नेहमी दादर अथवा मुंबई सेंटर पासून तिकीट घेतो. व त्या गाड्या रात्री १२ च्या आधी सुटतात . व त्या गाड्या बोरिवलीला येतात तोवर १२ वाजून जातात व दिवस बदलतो . तेच आमचे झाले . गाडी वेळेत च आली.तिकीट पण हातात होते. पण हातातील तिकीटाची तारीख आदल्या दिवशीची होती . त्यामुळे ते तिकीट निरुपयोगी ठरले . व आता मिळेल ती गाडी,  मिळेल ते  reservation , वा नाही  मिळाले तर  without  reservation  प्रवास करावा लागला ,कारण आज सकाळी पुन्हा येथे  येणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे नाईलाजाने का होईना फर्स्ट क्लास ए सी  चे तिकीट हातात असून with out reservation  अगदी असहाय्य होवून अगदी असह्य असा प्रवास केला .
          तेव्हा सर्व नीट planning  करून पण कधी कधी असाही प्रवास घडतो .

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...