मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह 
उपक्रम 1391

दि 3/2/26
विषय. वही

आनंदिले मनोमनी
वही पाहून  सुंदर 
गुज मनीचे सांगण्या 
मन धावे क्षणभर 

किती सुबक बांधणी
वही खुणावी मनाला 
घेऊनिया लेखणीला
मन सुरु  लिखाणाला.

 रेखांकित ओळीवर
 झरताची शब्द फुले 
पाने वहीची फुलली
आनंदाने मन डुले.

निळ्या शाईची अक्षरे
जणु मोतीयाच्या माळा
 करी  शोभित पानांना
मोद होतसे मनाला

झरझर उलटली
लेखणीने खूप पाने
 मन माझे  शांत झाले
 पूर्ण लिहीता गाणे,

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, २८ जानेवारी, २०२६

मी कोण कविता

मोहरली लेखणी साहित्य समूह 
विषय...मी कोण 

मी कोण असे पुसता
प्रश्न ..अस्तित्व,वा स्व ओळखीचा
मी,आहे तुमच्यातील सारस्वत
छंद जडलाय लेखणीचा

आहेत साहित्य समूह अनेक 
जतन करण्या मायबोली 
देत-घेत विचारांना चालना
रचिते रोज चार ओळी 

होते खरी तरणपटू, बेंकर 
निवृत्तीत  छंद जडला लेखणीचा 
अन् अविभाज्य स्थान तिज लाभता
मान मिळाला कवियित्रीचा


अ.भा साहित्य संमेलनी आमंत्रित 
कवि कट्टयावर सादरीकरणासाठी 
 भेटूया साता-यास आपण
सारस्वत भेटीचा आनंद घेण्यासाठी 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
मोहरली लेखणी साहित्य समूह 
विषय.      निरोप 
वृत्त मनोरमा
लगावली.  . गालगागा गालगागा 
 
रोज रात्री आरतीला
मोद वाटे सोहळ्याचा
टाळ झांजा घेत हाती 
घोष चाले गणपतीचा

आजच्या त्या आरतीला
आल पाणी  लोचनांना 
कंठ भारी दाटलेला
नाम त्याचे गर्जताना

ठेवताना ती शिदोरी
मोरयाचा नाद चाले              
आपुल्या सदनी निघाले
आज  ओठी. शब्द आले. 



मखर वाटे ते फिके हो
सदनही वाटे भकास
धूप दीपक मंद झाले
जन मनाने ती उदास 

नाव घेता गणपतीचे
दु:ख. क्षणी  दाटलेले
जड मनाने परतले जन
नयन ते पाणावलेले

  वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

पादाकुलक. .े क्षणा क्षणाने

    
२९\१\२६
वृत्त..पादाकुलक
    क्षणा क्षणाने

 काळ पुरुष तर, चाले अविरत 
उषा आजची न येते परत

दिवस आजचा,संपेल क्षणी.     
गत काळाची, सय नको मनी

क्षण न पाहतो, रंक व राजा
कधीच न करी , गाजावाजा ,

सुखी क्षणांना , झणी लुटूया,
क्षण जो आला ,मौज करूया. 
 
 क्षण सरताची,उल्हासाचा 
तोची पुन्हा.  न परतण्याचा 

                  
निसटे वाळू,  . हातामधुनी
क्षणही सरतो  जीवनातुनी.               

दिवस आजचा,हा सोन्याचा 
विचारच नको,काल उद्याचा    


वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

रविवार, २५ जानेवारी, २०२६

स्वतःला व्यक्त करणे गरजेचे आहे

विषय---  स्वतःला व्यक्त करणे गरजेचे आहे

अगदी बरोबर कथन आहे . जो पर्यंत  आपण आपले विचार मांडत नाही तोवर समोरच्यास कळणार कसे. ? आपल्या मनात काय विचार  आहेत ते. विचार  सांगणे ..बोलणे ..नीट सविस्तर  सांगणे गरजेचेच असते .सगळेच काही मन कवडे नसतात की आपल्या मनातील शब्द न् शब्द जाणून घेतील.
       घरात ठीक आहे .आपले भाव, जाणतील....भावना जाणतील . ...आपला जोडीदार  सहवासाने  आपली मते  मनाचे विचार  जाणेल .पण ते काही हद्दे पर्यंत.  मग तर शब्दांची ..वाच्यतेची गरज ही कुठेही .कुठल्या ही क्षेत्रात  असतेच.
       आपण व्यक्त झालो तरच आपला विषय ..आपली मते..आपले मार्गदर्शन 
व्यक्त होऊनच सांगू  शकतो. आपली मते पटविण्यासाठी व्यक्त होणे गरजेचे ठरते. 
हो! व्यक्तता वाचाळ ,.बडबड नसावी की ज्यामुळे समोरच्याला ऐकण्यात रस च रहाणार नाही. मुद्दे सुद व्यक्त  झाले पाहिजे. 
        यथा योग्य व्यक्त होणे.. वाच्यता करणे महत्वाचे आहे. नाहीतर वेळ टळून जाता मग बोलणे कवडी मोलाचे ठरते. आणि मग आपल्यावर रडण्याची म्हणजे,
अरे ! हे तर मला माहित  होते, पण.......  माझे बोलणे व्यक्त होणे राहिले. असे होता कामा नाही. 
         वकील डाॕक्टर यांच्या समोर तर व्यक्त होणे अत्यंत गरजेचे. न व्यक्त  होता त्यांना आजार कसा कळणार . म्हणून तर लहान बालक आजारी होतात त्यांचे डाॕ.
वेगळे असतात. कारण बालक बाळ व्यक्त होऊ शकत नाही . आणि म्हणून तर म्हणतात  की, डॉक्टर व वकील यांच्या शी नीट खरे खरे व्यक्त व्हा.  
         व्यक्त नुसते बोलूनच नाही तर सारे आपण सारस्वत  आपल्या लेखणीतून व्यक्त होतो. आपले मनीचे गुज लिखाणातून मांडतो.व आम जनते समोर व्यक्त होतो. या व्यक्ततेचे  म्हणजे स्वतः ची मते प्रदर्शित करणे आहे. याचा समाजास पण फायदा होतो. आता नाही का !कोरोना  काळात  लाॕकडाऊन काळात लिखाणातून बरेच संदेश देऊन व्यक्त झालोत. जन जागृती केली . पोलीस  संरक्षक तसेच 
परिचारिका,  डाॕक्टर,  सफाई कामगारांची स्तुती सुमने शब्दातून  उधळून लेखणी व्दारे व्यक्त झालो त.    तर व्यक्त होणे स्वतःचे  व्यक्तव्य करणे  फायदेशीर असतेच. 
    तसेच स्वतः व्यक्त झाल्याने शरीरास पण फायदेशीर  असते. मनातल्या मनात  विचाराने कुढत बसणे ..दुस-यास न सांगता गप्प रहाणे याचा मनावर पण परिणाम होतो .स्वभावावर परिणाम होतो. मनावर ताण येऊन शरीरास हानी पोहचू शकते. 
स्वातंत्र्य वीर व्यक्त झाले नसते तर स्वातंत्र्य  कसे प्राप्त झाले असते. संतांनी व्यक्त होऊन आपल्यास सुखी जीवनाची अध्यात्मक वाटचाल कशी करवली असती.
    जीवनाचे सार  गीतेचा   बोध.. जो  कृष्णाकडून  मिळाला .. तो व्यक्तच झाला नसता तर  कसा जगताला मिळाला असता. 

.....वैशाली वर्तक

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

ती न संपणारी कविता

शब्द रजनी साहित्य समूह 
विषय ..ती एक न संपणारी कविता 
21/1/26

आहे खरच तू अशी
सदा  चाले अविरत 
नसे ठावुक थांबणे 
धावे सदा अखंडित 

 शांत बसता उपवनी 
 पाहूनी पर्णे डोलती 
 भासती जणु मनात 
हर्षे टाळ्या वाजवती.

सवय जडली अंतरंगी 
 करु सदा शब्दाविष्कार
हर क्षणी देती उपमा
भाषेतील शब्दालंकार


 विषयाची नुरते गरज
 वेळ प्रसंग देती विषय
शब्दांना गुंफता काव्यात 
लक्षात घेतेच आशय


नाते जडले लेखणीशी 
झालेय जीवन कविता 
 करण्या तिज अजून देखणी 
राहो ती सदा प्रवाहिता

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
21/1/26

रविवार, १८ जानेवारी, २०२६

खेळ

 मोहरली लेखणी साहित्य समूह 

17/1/26

विषय.. खेळ

   


खेळ म्हणता आठवे

दिन ते बालपणीचे 

कधी सांजवेळ होता  

घरी जाणे नावडीचे


किती ते खेळ असती

 खोखो कबड्डी  लंगडी

शारीरिक ऊर्जा देई 

एकत्र होता सवंगडी


 होते शरीर सौष्ठव 

शिकवण देती खेळ

द्यावी साथ एकमेका

जमवाया हवा मेळ


पत्ते सापशिडी गोटया

असती बैठकी   खेळ 

सारे खेळ खेळण्यात

मजेत जातो ची वेळ 


जीवनात  महत्त्वाचे

स्थान असे खरोखर 

खेळ खेळत जगावे

मोद मिळे निरंतर 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...