विषय--- स्वतःला व्यक्त करणे गरजेचे आहे
अगदी बरोबर कथन आहे . जो पर्यंत आपण आपले विचार मांडत नाही तोवर समोरच्यास कळणार कसे. ? आपल्या मनात काय विचार आहेत ते. विचार सांगणे ..बोलणे ..नीट सविस्तर सांगणे गरजेचेच असते .सगळेच काही मन कवडे नसतात की आपल्या मनातील शब्द न् शब्द जाणून घेतील.
घरात ठीक आहे .आपले भाव, जाणतील....भावना जाणतील . ...आपला जोडीदार सहवासाने आपली मते मनाचे विचार जाणेल .पण ते काही हद्दे पर्यंत. मग तर शब्दांची ..वाच्यतेची गरज ही कुठेही .कुठल्या ही क्षेत्रात असतेच.
आपण व्यक्त झालो तरच आपला विषय ..आपली मते..आपले मार्गदर्शन
व्यक्त होऊनच सांगू शकतो. आपली मते पटविण्यासाठी व्यक्त होणे गरजेचे ठरते.
हो! व्यक्तता वाचाळ ,.बडबड नसावी की ज्यामुळे समोरच्याला ऐकण्यात रस च रहाणार नाही. मुद्दे सुद व्यक्त झाले पाहिजे.
यथा योग्य व्यक्त होणे.. वाच्यता करणे महत्वाचे आहे. नाहीतर वेळ टळून जाता मग बोलणे कवडी मोलाचे ठरते. आणि मग आपल्यावर रडण्याची म्हणजे,
अरे ! हे तर मला माहित होते, पण....... माझे बोलणे व्यक्त होणे राहिले. असे होता कामा नाही.
वकील डाॕक्टर यांच्या समोर तर व्यक्त होणे अत्यंत गरजेचे. न व्यक्त होता त्यांना आजार कसा कळणार . म्हणून तर लहान बालक आजारी होतात त्यांचे डाॕ.
वेगळे असतात. कारण बालक बाळ व्यक्त होऊ शकत नाही . आणि म्हणून तर म्हणतात की, डॉक्टर व वकील यांच्या शी नीट खरे खरे व्यक्त व्हा.
व्यक्त नुसते बोलूनच नाही तर सारे आपण सारस्वत आपल्या लेखणीतून व्यक्त होतो. आपले मनीचे गुज लिखाणातून मांडतो.व आम जनते समोर व्यक्त होतो. या व्यक्ततेचे म्हणजे स्वतः ची मते प्रदर्शित करणे आहे. याचा समाजास पण फायदा होतो. आता नाही का !कोरोना काळात लाॕकडाऊन काळात लिखाणातून बरेच संदेश देऊन व्यक्त झालोत. जन जागृती केली . पोलीस संरक्षक तसेच
परिचारिका, डाॕक्टर, सफाई कामगारांची स्तुती सुमने शब्दातून उधळून लेखणी व्दारे व्यक्त झालो त. तर व्यक्त होणे स्वतःचे व्यक्तव्य करणे फायदेशीर असतेच.
तसेच स्वतः व्यक्त झाल्याने शरीरास पण फायदेशीर असते. मनातल्या मनात विचाराने कुढत बसणे ..दुस-यास न सांगता गप्प रहाणे याचा मनावर पण परिणाम होतो .स्वभावावर परिणाम होतो. मनावर ताण येऊन शरीरास हानी पोहचू शकते.
स्वातंत्र्य वीर व्यक्त झाले नसते तर स्वातंत्र्य कसे प्राप्त झाले असते. संतांनी व्यक्त होऊन आपल्यास सुखी जीवनाची अध्यात्मक वाटचाल कशी करवली असती.
जीवनाचे सार गीतेचा बोध.. जो कृष्णाकडून मिळाला .. तो व्यक्तच झाला नसता तर कसा जगताला मिळाला असता.
.....वैशाली वर्तक