marathi lekh & kavita
बुधवार, २२ जुलै, २०२६
कसे जमते तुज सारे
सोमवार, २० जुलै, २०२६
रिकाम्या हाताची श्रीमंती
रिकाम्या हाताची श्रीमंती
20/7/26
आपण रिक्तची हस्ते
जाणार ही रिकाम्या हाती
कमवावी मनाची श्रीमंती
सुबोध हा संतची. सांगताती
हात दिधले सत्कर्म कराया
नाही फक्त शोभवाया आभुषणे
दान धर्मे दीन पतिता उठवावे
हेच बिंबवावे सदा मने
यातच दडलेली असे
रिकाम्या हाताची श्रीमंती
हाच मंत्र ठेवा ध्यानी
हीच शिकवण देते आपली संस्कृती
रविवार, १९ जुलै, २०२६
किंवा किंव्हा अथवा
गुरुवार, १६ जुलै, २०२६
म्हणी वरून. गरज सरो वैद्य मरो
सोमवार, १३ जुलै, २०२६
माया.
रविवार, ५ जुलै, २०२६
पाटाचे पाणी
सोमवार, २९ जून, २०२६
उखडलेली मुळे
काय पण योगायोग पहा आजच हा विषय दिला आणि..
आजच माझ्या दातांची implant treatment सुरू झाली. आधी माप घेणे झाले. आणि मग आजच्याच
दिवशीत treatment दातांचे काम सुरू झाले.
जुने अर्धे तुटके ..काही खराब दात उखडण्याची प्रकिया इंजेक्शन देऊन तेवढा भाग डॉक्टरांनी बधिर करण्याचे
काम सुरू केलं...
बधिर केल्याने. दुखत नव्हते पण कुठे तरी मधून कळ वा झिणझिण्या येत होत्या ."आलिया भोगासी असावे सादर" तसे मनात म्हणत. देवाचे मनात नामस्मरण करत. दातांची प्रक्रिया सहन होते.
अरे हो सांगायचे की मला गार्डनीगचा खूप छंद आहे रोज सकाळ चा १ तास त्यात जातो. .प्रेमाने रोपांना कुरवाळत
त्याची निगा घेते. पण त्याच बरोबर. लाॅनवर उगवलेले फालतु गवत. तसेच. फालतु वा अगांतुक
रोपे.. वाफ्यातील कित्येकदा उखडत असते . त्या आजवर उखडलेल्या. मुळापासून वा मुळासकट उपटून काढलेल्या मुळांना पण झालेले खंत. मी मनातल्या मनात देवाला व्यक्त केले व मनात त्या रोपांना sorry म्हटले. त्या मुळांना पण झालेली व्यथा ही मनोमन जाणली . वाईट वाटले.
असं आहे तर... आपल्याला त्रास झाला तर मला मुळांची खंत जाणवली.
कसे जमते तुज सारे
काव्य निनाद राष्ट्रीय साहित्य मंच पुणे आयोजित उपक्रम दि 22/7/26 विषय .. कसे जमते तुला शीर्षक.. हिशोबनीश कसे तुजला जमते रे तुच आम्हाला आधा...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
गागालगा लगागा विषय ...पाऊस केला सहन उन्हाळा कोमेजली शिवारे केव्हा पडेल पाणी वाहील थंड वारे आले भरून अंबर आनंदले मनाने येतील थेंब आता पाऊ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...