शुक्रवार, १९ जून, २०२६

वृत्तबद्ध उध्दव. मात्रा 2-8-4. कविता उध्दव

फक्त वृत्तबद्ध कविता उपक्रम
वृत्त उद्धव 
मात्रा 2-8-4
ओढ जीवा

भेट आपुली ती पहिली.    
मन  माझे अगतिक पळभर
माझ्या विचलित या जीवा
तूची सावरले    क्षणभर


अन भासला  प्रथम भेटी
आश्वासक  संपर्क मजला
जाहला आनंद हृदयी 
 तू भासे  गाली हसला

छंदची लागला आता
अन कसे आवरु.मजला
तव सहवासाची गोडी 
मज वेडे करी   जिवाला



गंध तव प्रीति चा तो
अंतरी  माझिया  राहे
बघ वसंत फुलतो राया
आनंदे ऊरी  वाहे        

वैशाली वर्तक 
अहमदाबाद             

गझल..... वृत्त अनलज्वाला.

 गझल.....................

गझल
अनलज्वाला  ८-८-८

कष्ट करूनी यश मिळवाया झगडत गेलो
भौतिक सुखात नकळतची मी हरवत गेलो.

मान मिळविला  हजारो गुन्हे  करूनी जगी.  
  लोकांना मी सत्याचे पाठ शिकवत गेलो
                                            
 क्षणभर येता  दिन दु:खाचे  कष्टी जीवा
हास्य किस्से सांगूनी मी हसवत गेलो.

केला प्रयत्न सदा उजळण्या  जीवन सारे.        
कुसंगतीने  व्यसनात  पहा अडकत गेलो.

वृक्ष तोडून  सिमेंट राने किती बांधली
पर्यावरणा जपता धान्ये उगवत गेलो.

सोमवार, १५ जून, २०२६

सुरकुत्यांची कहाणी

सुरकुत्यांची कहाणी
सहज गुगल फोटो निहाळत होते.त्यात दोन वर्षा पूर्वी चे फोटो आले. पाहून मन  हरकले, .मी मनात म्हटले," अरे वा
दोन वर्षांपूर्वी आपण छान दिसत होतो की !  खरच या मोबाईल ने फेसबुक ने आपल्या ला दोन.. तीन.. काय 8/10वर्षापूर्वी आपण कसे दिसत होतो  ह्याच रूप क्षणात दाखवितो.
     मी जस जसे जून्या काळात गेले, तर मनी हर्ष वाढतच गेला,  मग मनाशी म्हटले,
"म्हणजे आता आता म्हणजे दोन वर्षा पूर्वी या सुरूकुत्या कमी होत्या .आता मी प्रत्यक्ष हाता कडे नजर टाकली व मनाला. समजावले , "बाई साहेब आता वृध्दत्वाकडे झुकत चाललात  बरं का  ! शरीरावरच्या  झुर्या झुर्या पहा ..सांगत आहेत .कितीही  केस काळे करा    सुरुकुत्या कुठे लपवणार ? त्या तर त्यांचे अस्तित्व तीव्रतेने दाखविताच आहेत.
     खरय या सुरूकुत्याच  जीवनात. घेतलेले  ,सुख दुःखाचे क्षण . किती आनंद  अनुभवले   किती कष्ट साहिले , यांची कथा आहे. 
आपल्या जीवन काळाचा भुतकाळ सामावला आहे.  त्यांना प्रेमाने मी गोंजांरले . जरा तेलाचा हात प्रेमाने फिरविला . स्नानाला जायचेच होते. तर नीट कांतिला तेल लावले. स्नायूंना पण व्यायाम झाल्याने स्नायू पण जरा ताठरले . .
        अंघोळी नंतर अंगणात आले तूळशीला पाणी घातले व सहज लक्ष इतर लता -वेली ,वृक्षांकडे गेले तर काही झाडांची पाने सुरकतून क्षीण भासली. तर काही निखळली होती. सहज संदेश ल्या वेलीलतांनी , निसर्गाने दिला, 
ऋतूचक्र चालत रहाते. वाढ वृद्धी. झीज हे चालत रहाणार.  मग या सुरकुत्या पण त्यातील एक भाग आहे .
काळ किती लोटला याची त्या पावत्या देताहेत.   क्षण न् क्षण  आनंदाने जगून घे. लेखणीला धार देत रहा. अनुभवाचे गाठोडे जपत  रहा. 


-

गुरुवार, ११ जून, २०२६

माझा आनंद

माझा आनंद 

आनंद  ही मनाला प्रफुल्लित प्रसन्न वा खूश करणारी मानसिक भावना.
 माझा आनंद मला अगदी साध्यासुध्या छोट्या कारणाने मिळतो. साध्या म्हणजे अगदी.... मनाजोगे काम होणे.... स्वतः रोपलेल्या रोपास. फुल येणे, छान झोप लागणेल,, सुंदर गाणे ऐकणे, ..मुलांचे , सुनांचे  तसेच आता नातवंडांचे यशाचे संदेश वा निरोप येणे  या सा-यातून  पण आनंद मिळतो.
      मला gardening चा छंद आहे. सकाळी गवताची हिरवी गार पाती  वा-याच्या झुळकीवर हलताना , रोपे. व
जणु टाळ्या वाजवित आहे  असे भासणारी वा-याच्या तालावर ची इवली इवली पाने  , ,बांबूच्या झाडांची लवलवती पाने ,खरच खूप आनंद देतात.त्याच बरोबर पक्ष्यांना पिण्यास ठेवलेल्या पाण्याच्या, मातीच्या भांड्यावर बसून
त्यात चोच बुडवून इकडे तिकडे पहात कोणी  मांजर वगैरे झडप तर नाही घालणार यांची चाहुल घेणारी पक्ष्यांची नजर , तसेच मोठया पक्ष्यांची लहान पक्ष्यांवर ची दादागिरी, मधेच खारूताईचे चपळाईने पाणी पिऊन जाणे
हे सारे पण पहाण्यात आनंद मिळतो.
    तसेच सध्या माझी लेखणी पण जरा जास्त लेखणी झाली आहे. त्यामुळे. आपली कुंडली कविता वा साहित्य  कुठल्या दैनिकात प्रकाशित झाले आहे. हे पाहून आनंद होतो. सहज विषय सुचता कल्पना शक्तीला सहज स्फुरण चढता तयार झालेली कविता . यामुळे पण मन पुलकित होते,.
   तसेच उद्या शनि रविवार म्हटले तर मनाला आनंद वाटतो मन आनंदाने हलके वा प्रफुल्लित होते.
खरं पहाता. सध्या निवृत्ती काळ , त्यामुळे रोजच रविवार  पण  दोन दिवस मुले -सुना पण घरी असणार... या
 विचाराचा पण मनास मोद होतो.    चला आज सारे कुटुंबीय जन एकत्र असणार. याचा पण मनाला हर्ष होतो. .
     तसेच हवी असलेली वस्तू पटकन मिळाली तरी देखिल आनंद मिळतो म्हणतात ना नोकर व वस्तू.. हवी तेव्हा मिळाली तर पृथ्वी वर स्वर्ग अवतरतो असे म्हणतात . अशा रीतीने माझा आनंद सर्वत्र विखूरलेला आहे. 
सर्वत्र पसरलेला आहे. 
  आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे!
  कवी बाल  ठोंबरे यांच्या बाल गीता सारखा  वरती खालती सर्वच आहे.
कदाचित आजीने दिलेल्या शिकवणीचा भाग असावा. वृत्ती समाधानी   तर आनंद मन भरुन असतो .तसेच काहीसे असावे. नाही का!
कारण समाधानातच आनंद दडलेला असतो.ना.


मंगळवार, ९ जून, २०२६

वृत्त बध्द ...पादाकुलक. विषय कुटुंब

             कुटुंब 
कुटुंब नसते    चार जणांचे 
सहवासाने   लागतो लळा. 
स्नेहाचा अन,  प्रेमळतेचा
जीवलगांचा , गळ्याशी गळा                   

वळण शिस्त ती माय पित्याची
बाबा असती आधार खरा
भाऊ भगिनी   प्रेमळ नाते
ताई  वाटे  .प्रेम रुप झरा 

 खंबीर  सदा असती  भिंती 
स्नेह तर वसे , ठायीं ठायी    
साथ   देतसे  परस्परांना 
कुटुंब नांदे सुख सुख दायी

 नाती गोती कुटुंब  जपते
कुटुंब ताठा  तर  मनोमनी
हर्ष सदोदित तेची देते.         
मान वाढवी लोकात क्षणी

राहती सदा  एकजूटीने
विचार स्वार्थी  नसे कदापी 
 सुखाच राहो सर्व कुटुंबी
आळविती  जन ही आलापी

वैशाली वर्तक 
८\६\२६

सोमवार, ८ जून, २०२६

शब्दांची बरसात

शब्द रजनी कथा \ललित लेख लेखन साहित्य समूह पुणे 
प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय स्पर्धा ललित लेख लेखन 
दि 16/4/26
विषय .... शब्दांची बरसात भावनांचा सागर

साहित्यात एकंदर 
खेळ असे तो शब्दांचा
 पूर येतो कल्पनेला
  पसाराचा विचारांचा 
        तर शब्द आहेत म्हणून आपले विचार ..मनातले गुज..आपल्या भावना..आपण 
एक दुसऱ्यास सांगू शकतो. आपण दुसऱ्या समोर आपल्या विचारांची मांडणी करून 
आपलं मंतव्य सांगू शकतो. तर ही आहे शब्दांची किंमत. वा जादू . 
           जुळवूनी शब्द शब्द
            होते तयार लिखाण 
            असो मग गद्य पद्य 
            शब्दांचीच असे खाण 
       
            मुल्य सर्वदा शब्दांचे 
             जाणे शब्द शिल्पकार 
             शब्द ओवितो उचित 
             करी तो शब्दाविष्कार 

    आपल्याला जे  विचार .भावना अंतरी येतात  , त्यांना शब्दच वाट करून देतात . शब्दांची बरसात होते व साहित्य घडते. मनातील भावनांचा सागर उचंबळतो.व शब्दांतून भाषा समृद्ध होते. साहित्याची  भरभराट होते.
     त्यासाठी शब्दांचा भंडार वाढविला पाहिजे. जेवढे वाचन जास्त तेवढा शब्द समूह वाढतो . एका शब्दास समान अर्थी शब्द मिळतात व भाषावर प्रभुत्व वाढते.  तसेच 
अलंकारिक शब्दाने पण लेखन प्रभावी होते. 
  या साऱ्या साठी शब्दांची बरसात व्हायला पाहिजे. म्हणजेच काय शब्द आहेत तर
भाषा आहे ,संवाद आहे. तरच साहित्य आहे.जसे मुर्तीकार शिल्प करतो तसे
शब्द शिल्पकार शब्द रचून रचनेतून शब्द शिल्पकार घडतो.
शब्द शिल्पकार सदा
देतो मनास उभारी
जपणूक संस्कृतीची
काम त्याचे सदा भारी

शब्द शिल्पकारांपैकी
वाल्मिकींचे रामायण
 जन  ज्याचे  करितात
 सदासाठी पारायण.

आपला शब्द रजनी समूह पण विषय देताच सारस्वत नियमित लेखन करतात,
आपल्या लेखणीस धार देत लेखणी लेखणी करतात. 
कधी असे होते की लेखणी रुसून बसते काही केल्या शब्दच अधरी येत नाही, सतत
लेखन  गरजेचे असते. जेव्हा भाषा नव्हती तेव्हा चित्र काढून भावना वा विचार दाखविले जाई,वा अशिक्षित असता चित्राची मदत घेतली जाते. 
  तर असे महत्व आहे शब्दांचे,
वैशाली वर्तक 
अहमदाबाद

वृत्तबद्ध उध्दव. मात्रा 2-8-4. कविता उध्दव

फक्त वृत्तबद्ध कविता उपक्रम वृत्त उद्धव  मात्रा 2-8-4 ओढ जीवा भेट आपुली ती पहिली.     मन  माझे अगतिक पळभर माझ्या विचलित या जीवा तूची सावरले ...