सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

सौजन्य

स्पर्धेसाठी 

कमल विश्व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित 
मासिक काव्य लेखन स्पर्धा 
विषय ... सौजन्य 

सौजन्य गुण स्वभावाचा,
प्रत्येकाच्या बालपणी.
जशी होते,जडण-घडण
तसे सौजन्य दिसे जीवनी.

सौजन्य उजळे मानवास,
मिळे शाबासकी सदाची.
होते वाहsवा समाजात,
सौजन्यशील माणसाची.

मायबापांचे संस्कार,
हीच पाळेमुळे सौजन्याची.
रचतात पाया गुणांचा,
जी ठरतात महत्त्वाची.

वाणीने जिंकता जग,
वागण्यात आदर भाव
सौजन्यशील माणसावर,
होई प्रेमाचा वर्षाव

अमूल्य गुणांचा ठेवा.  
सौजन्यानेच सजतो
नाही मिळत कधी पैशाने
स्वभावातून दिसतो

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६

चित्र काव्य

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 
उपक्रम क्रमांक 1615
29/8/26
चित्र काव्य 
  *निवांताच्या गप्पा* 

उभ्या दोघी शेजारणी 
 गप्पा कधीच्या रंगल्या
आटपले का काम सारे
  दोधी चौकशीत दंगल्या 

  मिळे आनंद गप्पात
  दोघी पहा समाधानी
  हास्य विलसते गाली 
  न थकती गाता गाणी

  आयुष्याच्या सांजवेळी 
  करी कौतुक पोरांचे
  भाग्यवान आपण ग
  स्मरण करीती देवाचे.

  घेत आधार भिंतीचा 
 चाले सुखदुःखी बाता 
 संपणार नाही कधी
 उद्या करूयात आता.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गोड गैरसमज

स्पर्धेसाठी
जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच 
साकव्य आयोजित सन्माननीय समूह सदस्या
सौ वृंदा ताई देसाई आणि या कृष्णागवस यांच्या वाढदिवसानिमित्त काव्य लेखन स्पर्धा 
विषय.  गोड गैरसमज 


होती तिची गोड समजूत 
इडली तर तिचीचअसते खास
कधीही खावी मऊ हलकी
इडली चटणी तिची सदा हमखास.

आणि नेहमी  प्रमाणे तिने
घातला ईडली करण्याचा घाट
होती खुश खुशाल मनात 
इडली माझी दाविल छान थाट

केले नेहमी प्रमाणे वाटण 
दिले आमंत्रण येण्या सकाळी 
नास्ता माझा असेल तयार
माझी इडली चटणी असते आगळी.

पण झाला  थोडा घोटाळा
स्लो बारिक गॅस चालूच रात्रभर
गडबडीत पडला विसर
वाटणाचे पातेले राहिले तयावर.

सकाळी पहाता, झाकण सारता 
ती एकदम हिरमुसली 
सा-या वाटण्याचा एकच ईडलेश्वर
पाहून गोड गैर समजावर हसली.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६

हायकू. तुझे हासणे

अभा म प सा धुळे जिल्हा
चित्र  काव्य
हायकु लेखन
हायकु



 तुझे हसणे
 भासे चित्ता  मोहक 
 मना वेधक   १

  लोभस हास्य
 जणु चांदणे  फिदा
मोहीत अदा २

नको अडवू
हास तू मुक्त पणे
भासे  चांदणे ३

हसतमुख
चेहराची हासरा
पहा नखरा       ४


 मनी हासणे
 शीतलता भासणे
रूप पहाणे

वैशाली वर्तक

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

प्रत्येकाची कहाणी


 जागतिक कला साहित्य व्यक्तित्व विकास मंच* 

 *सलमान दादा शेख यांचे वाढदिवसा प्रित्यर्थ* 

 *आयोजित स्पर्धेसाठी कविता* 

 *स्पर्धा क्रं. 94* 

 *दि. 18.08.2026* 

 *विषय : प्रत्येकाची एक कहाणी*

शीर्षक. मी कोण



मी कोण असे पुसता

प्रश्न ..अस्तित्व,वा स्व ओळखीचा

मी,आहे तुमच्यातील सारस्वत

छंद जडलाय लेखणीचा


आहेत साहित्य समूह अनेक 

जतन करण्या मायबोली 

देत-घेत विचारांना चालना

रचिते रोज चार ओळी 


होते खरी तरणपटू,... बेंकर 

निवृत्तीत  छंद जडला लेखणीचा 

अन् अविभाज्य स्थान तिज लाभता

मान मिळाला कवियित्रीचा.


 कोणी म्हणे मी अशी मी तशी

  बोला , बोला तुम्ही काही

 माझ्यात मात्र फरक तसुभर

  कधीही पडणार नाही             


    नेहमीच वाटते जनांना 

    आहेची मी थोडी शिष्ट

     पण ,खरच सांगते तुम्हा

   नाहीचय, मी गर्विष्ठ              


   रहाते  रममाण माझी मी

   सदा माझ्याची छंदात 

   अन् मिळतो परमानंद 

   मला दिवस भरात             


   आहेच हं , मात्र मी मनाने.  

  अतिशय स्वाभिमानी 

  माझ्या जीवनातील काळात

  खरोखरी  समाधानी    


लागलाय छंद लेखनाचा 

   सेवा निवृत्त जीवनी

   तोची असे माझा  विरंगुळा 

. ‌‌    हीच माझी  कहाणी       


वैशाली  वर्तक

अहमदाबाद 

8141427430

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

चित्र काव्य


 झटुनिया करू यत्न

टाकुया प्रगतीचे पाऊल

उजळवू ज्ञान ज्योती 

लागेल यशाची चाहुल


साथ देत एकमेकांस

चला जाऊया शिखरी 

ज्ञान दीप उजळविण्याची

आस हवीच अंतरी.


खचू नका ,भिऊ नका

असेच सदाची जायचे

शेताची कितीही संकटे

क्षणभर न डगमगायचे.


मनी करिता निश्चय 

यश मेरू येईल समीप

जुळता वात ज्ञानाची 

देईल प्रकाश ज्ञान दीप 



वैशाली वर्तक 

 अहमदाबाद

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

प्रतिलिपी चे विचार साहित्य


आभाळाला स्पर्शताना

#################

असो आभाळ उत्तुंग
  मन देत असता उभारी.
आशा   मनात  यशाची.
घ्यावी बिनधास्त भरारी.

करा बळ एकवटून यत्न
असता आपण बलवंत
मनच देते वेळोवेळी  ग्वाही
होणार आपण यशवंत

होता अपेक्षा पूर्तता
आभाळाला स्पर्शण्याचा
होईल  मनी आभास
क्षण असेल आनंदाचा


काळाच्या पुढच पाऊल 

###################

घेणे उद्याचा अंदाज
असे गोष्ट योग्यच
जेणे करून जीवन
जगण्या होतो सुसज्ज

जग झालय प्रगतीशील
आयोजन चाले भविष्याचे
जगता वर्तमान  काळात
जेणे करुन जगणं होते आनंदाचे.

काळाच्या पुढच पाऊल
टाकावी लागतात सदा
तहान लागता विहीर खणणे
नसेची  योग्य  कदा

साधी मुंगी  किटक पहा
करत असते काम अविरत
पाऊस पडला तरी त्यांचे
कोठार भरलेलं सदोदित

वैशाली वर्तक

##################

पुस्तका बाहेरील ज्ञान 

खरं आहे ,झालो आपण पदवीधर
पण किती कामास येते ज्ञान जीवनभर

बहिणाबाईंना नव्हते पुस्तकी ज्ञान
पण   ख-या ज्ञानाची दिधली जगाला जाण

आमच्या आजीला नव्हते  ज्ञान पुस्तकी
पण अचूक वेळ सांगायची आम्हा नेमकी

बाळ संस्कार देऊन घडविले जीवनी
षडरिपूं  पासून दूर रहा बिंबविले मनी.

अनुभव पण हे सारे  शिकवे आपणास
अनुभवाचे गाठोडे  येते कामास



सौजन्य

स्पर्धेसाठी  कमल विश्व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित  मासिक काव्य लेखन स्पर्धा  विषय ... सौजन्य  सौजन्य गुण स्वभावाचा, प्रत्येकाच्या बालपणी. जश...