सोमवार, ८ जून, २०२६

शब्दांची बरसात

शब्द रजनी कथा \ललित लेख लेखन साहित्य समूह पुणे 
प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय स्पर्धा ललित लेख लेखन 
दि 16/4/26
विषय .... शब्दांची बरसात भावनांचा सागर

साहित्यात एकंदर 
खेळ असे तो शब्दांचा
 पूर येतो कल्पनेला
  पसाराचा विचारांचा 
        तर शब्द आहेत म्हणून आपले विचार ..मनातले गुज..आपल्या भावना..आपण 
एक दुसऱ्यास सांगू शकतो. आपण दुसऱ्या समोर आपल्या विचारांची मांडणी करून 
आपलं मंतव्य सांगू शकतो. तर ही आहे शब्दांची किंमत. वा जादू . 
           जुळवूनी शब्द शब्द
            होते तयार लिखाण 
            असो मग गद्य पद्य 
            शब्दांचीच असे खाण 
       
            मुल्य सर्वदा शब्दांचे 
             जाणे शब्द शिल्पकार 
             शब्द ओवितो उचित 
             करी तो शब्दाविष्कार 

    आपल्याला जे  विचार .भावना अंतरी येतात  , त्यांना शब्दच वाट करून देतात . शब्दांची बरसात होते व साहित्य घडते. मनातील भावनांचा सागर उचंबळतो.व शब्दांतून भाषा समृद्ध होते. साहित्याची  भरभराट होते.
     त्यासाठी शब्दांचा भंडार वाढविला पाहिजे. जेवढे वाचन जास्त तेवढा शब्द समूह वाढतो . एका शब्दास समान अर्थी शब्द मिळतात व भाषावर प्रभुत्व वाढते.  तसेच 
अलंकारिक शब्दाने पण लेखन प्रभावी होते. 
  या साऱ्या साठी शब्दांची बरसात व्हायला पाहिजे. म्हणजेच काय शब्द आहेत तर
भाषा आहे ,संवाद आहे. तरच साहित्य आहे.जसे मुर्तीकार शिल्प करतो तसे
शब्द शिल्पकार शब्द रचून रचनेतून शब्द शिल्पकार घडतो.
शब्द शिल्पकार सदा
देतो मनास उभारी
जपणूक संस्कृतीची
काम त्याचे सदा भारी

शब्द शिल्पकारांपैकी
वाल्मिकींचे रामायण
 जन  ज्याचे  करितात
 सदासाठी पारायण.

आपला शब्द रजनी समूह पण विषय देताच सारस्वत नियमित लेखन करतात,
आपल्या लेखणीस धार देत लेखणी लेखणी करतात. 
कधी असे होते की लेखणी रुसून बसते काही केल्या शब्दच अधरी येत नाही, सतत
लेखन  गरजेचे असते. जेव्हा भाषा नव्हती तेव्हा चित्र काढून भावना वा विचार दाखविले जाई,वा अशिक्षित असता चित्राची मदत घेतली जाते. 
  तर असे महत्व आहे शब्दांचे,
वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, ४ जून, २०२६

चित्र काव्य

बसलोय निवांतात
होते रोजची सकाळ 
आटपण्याची नसे घाई
एकांत जीव खाई सदाकाळ.

ओसरीत पहुडणे 
बाजेवर बसणे शांत
नाही बोलायला शेजारी 
 नाही उरली उद्या ची भ्रांत .

कसे असते एकाकी जीण
नाही सहन होत आता
पाखरे उडाली घेण्या भरारी
वेळ जात नाही जाताजाता.

खेळणी हाती घेऊन
पुन्हा पुन्हा हात फिरवितो
नातवंडांचा स्पर्श शोधता
जीव त्यात रमवितो.

एकटेच आलो एकटे जायचे 
माहित आहे जरी मना
पण मन मात्र नाही अजून 
समजत  आलेल्या या क्षणा

शुक्रवार, २२ मे, २०२६

को-या पाटीवरचे नशिबाचेअक्षर

*स्पर्धेसाठी*
विशेषकाव्य लेखन स्पर्धा 
दि 21/4/22
विषय - को-या पाटीवर नशिबाचे अक्षर

*शिकस्त केली प्रयत्नाची*

आस होती सुयशाची
शिकस्त केली प्रयत्नाची
झाली अक्षरे सुवर्णांची
साथ मिळता नशिबाची

 चाले  मधे विनाशाचा खेळ
न होता तरी कष्टी जीवनी
  उपसल्या कष्टाच्या  राशी
मोद, समाधान सदा मनी


  सदा उभा आहे पाठीशी
प्रयत्नांची कास धरी 
यश मिळणार सांगे कानी
दृढ विश्वास   तो देवावरी

करीता परिश्रम नेटाने
दैव घडते  मनगट बळावर
देव घडवितो नशीब प्रेमाने
*को-या पाटीवर नशिबाची अक्षर*

उघडले द्वार स्वर्गाचे
यश मिळाले पदरी
आनंदाला नसे पारावार
प्रसिद्धी ऐकून  जन अधरी

वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, २० मे, २०२६

विषय जाती प्रकारात. वृत पतितपावन व पादाकुलक. माझी शाळा

फक्त वृत्त बध्द कविता उपक्रम 
बुधवार 20/5/26
विषय शाळा
पतितपावन +पादाकुलक विषमजाती. प्रकारात 

          माझी शाळा 

जाता येता  सदैव दिसते माझी शाळा  मज 
दृढ निश्चयी  उज्ज्वल भविष्य घडविण्या मान तिज.     धृवपद

 दैवत  समान , आहे मजला,
 नाही वदते शब्दे शाळा.   
  ज्ञान वाहिनी  ती आम्हाला 
  माझ्या मनात राहिली तीच
जाता येता  सदैव दिसते माझी शाळा  मज 

आत्मनिर्भर  सक्षम करुनी
 गोड शब्दात  समजावूनी 
केले आम्हा सकळा ज्ञानी
भाव जपियले अंतरी तेच
जाता येता  सदैव दिसते माझी शाळा  मज

अजून स्मरते,  बोल स्तुतीचे
 मन मोदभरे , कला गुणांचे 
मान वाकते,  बहुमानानी
मधुर स्मृती आहेची निज 
जाता येता  सदैव दिसते माझी शाळा  मज


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, १३ मे, २०२६

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा अनिल मनीषा

दोघे बैसले एकांती
घेत आनंद निसर्गाचा
आला विचार मनात 
आनंदी सहजीवनाचा.

नाव राखिले मनीषा
केली पूर्तता इच्छांची 
मोदे विचारात रंगली
मने दोन जिवितांची

वदती एक मेकांना
अजून मज कळेना
पाच दशके सरली
काहीच आकळेना 

कधी दिन भासले कष्टाचे
पण  होती जाणीव मनाला 
होणार चीज श्रमाचे
सुख मिळणार जीवाला.


उन पावसाळे पाहिले 
पण नव्हती कधीही भ्रांत
प्रेमाच्या गाडीत  खरतर
समाधानी मन सदा शांत


मागे वळून पाहता
ओठात शब्द आले
देवा  तुझीच कृपा
सहजीवनी धन्य झाले.

गुरुवार, ७ मे, २०२६

परिचारिका

जगाचा पोशिंदा समूह आयोजित उपक्रम 
दि ७\५\२६
विषय परिचारिका 

सेवा रूग्णांची करणे
गुणाने असे मायाळु
नसे ठाऊक आराम
स्वभावाने ती दयाळु

परिचारिका राही मग्न 
 निष्ठा कामावर फार
न आळस कधी करता
 सेवा करे रूग्णांची अपार 


दिवस असो वा रात्र
कधीच नाही थकत 
वेळीच देते औषध
मुखाने सदा हसत

 रूग्णांसाठी समभाव
 काम हेची देव कर्म
मनाशी ठेवते हे नित्य
हेची मानीते जीवन मर्म

कोरोनात केली सेवा
अजूनही दिन थ्यानी 
मरणातून वाचविले
उपकार ठेवा मनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, ६ मे, २०२६

वृत्त लवंगलता ... मात्रा ८-८-८--४. सय गावाची

फक्त वृत्तबद्ध कविता उपक्रमा साठी
वृत्त लवंगलता. (८-८-८-४)
*सय गावाची*

फक्त वृत्तबद्ध कविता उपक्रमा साठी
वृत्त लवंगलता. (८-८-८-४)
*सय गावाची*

सहज पहाता चित्र गावाचे मन आनंदे  नाचे
 जाईन कधी  माझ्या गावी आठवण मनी  गाचे.      

 गावी येता  छोटी छोटी  टुमदार घरे दिसली      
 किती मजेचे दिन ते होते मनातून सय आली

भरून  गाड्या धावत होत्या.धान्ये विकण्या साठी.  
 खुशी खुशीने कृषक चाले  फेरीगाडया  पाठी 
 
गोरज समयी  पहा चरूनी  परतली गुरे गोठा
 चित्र रम्य किती पाहून मनी  मोद जाहला मोठा.
                                 .   
  नभ ता-यांचे जसे भासले सुपात लाह्या गावी
  होताच निशा यामिनी पहा शोभनीय रुप दावी

 किती मजेचे वाटे फिरणे  बैलगाडीत  बसता
वर्दळ नाही मौज आगळी  अनुभवानंद  मिळता

वाटे हेची  जीवन सुंदर आहे जगण्या साठी
 रोज बसावे. निवांत समयी शीतल सरिते काठी.

कशाला हवा  खोटा भपका  नकोच शहरी जीणे 
गावच माझा मला   विचारे   गावात काय ऊणे?


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शब्दांची बरसात

शब्द रजनी कथा \ललित लेख लेखन साहित्य समूह पुणे  प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय स्पर्धा ललित लेख लेखन  दि 16/4/26 विषय ......