सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

पादाकुलक वृत्त. पहिली वही

 
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प
आयोजित दोन दिवसीय उपक्रम 
9/2/26
विषय ...पहिली वही
पादाकुलक वृतांत


सहज काढला ,आवरायला
निवांतात खण ,फडताळाचा
हाती आली, रोज टिप्पणी 
हर्ष मिळाला, गतकाळाचा

उचलून वही, घेता हाती
भरभर टिपली , सारी पाने
दिसली मजला, माझी कविता 
वाचन केले, आनंदाने 

जागी झाली, जुनी आठवण
पहिली वाचक , होती आई
कौतुक केले, तोंड भरूनी
तिला दावण्या माझी घाई.

  वाचून हसू आता येते
कशी लिहीली, मला कळेना
भाव मनीचे, कसे उतरले
अजूनी मला, ते उमजेना 

नीट लावले  कपाट सारे
पण दिन सरला, आनंदाने 
 ताज्या झाल्या  आठवणी त्या 
उजळा दिधला् आवरण्याने.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

भग्नावशेष आंबोळी रचना

माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे अंतर्गत 
आंबोळी साहित्य मंच आयोजित स्पर्धेसाठी 
दि ८\२\२६

विषय .. भग्नावशेष 
शीर्षक..जपणुक संस्कृती 

उत्खलनात  मिळतात 
भग्नावशेष अनेक मूर्ती 
ज्यामुळे  सहज कळते
त्याकाळची संस्कृती 

पुरातन वस्तू संशोधन 
यांचा असतो हाच ध्यास 
करिते नेमकं हेच काम 
  शोधून काढणे  जुना इतिहास 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह 
उपक्रम 1391

दि 3/2/26
विषय. वही

आनंदिले मनोमनी
वही पाहून  सुंदर 
गुज मनीचे सांगण्या 
मन धावे क्षणभर 

किती सुबक बांधणी
वही खुणावी मनाला 
घेऊनिया लेखणीला
मन सुरु  लिखाणाला.

 रेखांकित ओळीवर
 झरताची शब्द फुले 
पाने वहीची फुलली
आनंदाने मन डुले.

निळ्या शाईची अक्षरे
जणु मोतीयाच्या माळा
 करी  शोभित पानांना
मोद होतसे मनाला

झरझर उलटली
लेखणीने खूप पाने
 मन माझे  शांत झाले
 पूर्ण लिहीता गाणे,

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

आनंद कंद वृत्त. देव पाहिला कविता

देवास पाहण्याची ,होती मनात इच्छा 
 बाल्यास हासताना , पाहून पूर्ण मनीच्छा

देता भुखी जनाला, खाण्यास अन्न पाणी 
हासून पाहिलेला   होताच चक्रपाणी .

 येता नभी दिवाकर , होते नवीच ऊषा
घडते दर्शन त्याचे, देतो नव्याच आशा


फुलती कळी पहाता, गंधाळली क्षणाते.    
भरिला  सुगंध पुष्पें,  किमया दिसे मनाते


तोची असे  सुरेश,  सृष्टीत भेट घडते
सारीच जादु त्याची, दिनरात  नित्य करते.

बुधवार, २८ जानेवारी, २०२६

मी कोण कविता

मोहरली लेखणी साहित्य समूह 
विषय...मी कोण 

मी कोण असे पुसता
प्रश्न ..अस्तित्व,वा स्व ओळखीचा
मी,आहे तुमच्यातील सारस्वत
छंद जडलाय लेखणीचा

आहेत साहित्य समूह अनेक 
जतन करण्या मायबोली 
देत-घेत विचारांना चालना
रचिते रोज चार ओळी 

होते खरी तरणपटू, बेंकर 
निवृत्तीत  छंद जडला लेखणीचा 
अन् अविभाज्य स्थान तिज लाभता
मान मिळाला कवियित्रीचा


अ.भा साहित्य संमेलनी आमंत्रित 
कवि कट्टयावर सादरीकरणासाठी 
 भेटूया साता-यास आपण
सारस्वत भेटीचा आनंद घेण्यासाठी 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
मोहरली लेखणी साहित्य समूह 
विषय.      निरोप 
वृत्त मनोरमा
लगावली.  . गालगागा गालगागा 
 
रोज रात्री आरतीला
मोद वाटे सोहळ्याचा
टाळ झांजा घेत हाती 
घोष चाले गणपतीचा

आजच्या त्या आरतीला
आल पाणी  लोचनांना 
कंठ भारी दाटलेला
नाम त्याचे गर्जताना

ठेवताना ती शिदोरी
मोरयाचा नाद चाले              
आपुल्या सदनी निघाले
आज  ओठी. शब्द आले. 



मखर वाटे ते फिके हो
सदनही वाटे भकास
धूप दीपक मंद झाले
जन मनाने ती उदास 

नाव घेता गणपतीचे
दु:ख. क्षणी  दाटलेले
जड मनाने परतले जन
नयन ते पाणावलेले

  वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

पादाकुलक. .े क्षणा क्षणाने

    
२९\१\२६
वृत्त..पादाकुलक
    क्षणा क्षणाने

 काळ पुरुष तर, चाले अविरत 
उषा आजची न येते परत

दिवस आजचा,संपेल क्षणी.     
गत काळाची, सय नको मनी

क्षण न पाहतो, रंक व राजा
कधीच न करी , गाजावाजा ,

सुखी क्षणांना , झणी लुटूया,
क्षण जो आला ,मौज करूया. 
 
 क्षण सरताची,उल्हासाचा 
तोची पुन्हा.  न परतण्याचा 

                  
निसटे वाळू,  . हातामधुनी
क्षणही सरतो  जीवनातुनी.               

दिवस आजचा,हा सोन्याचा 
विचारच नको,काल उद्याचा    


वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

पादाकुलक वृत्त. पहिली वही

  विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम  9/2/26 विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फडताळ...