सिद्ध साहित्यक समूह आयोजित
उपक्रम
विषय ..आशेचा किरण
कधी मनी नकोची खंत
संभ्रम मनात अपयशाचा
असावे सदैव आशावादी
किरण आशेचा दावी पथ यशाचा.
असावे विचार सकारात्मक
सदा हवाआत्मविश्वास
घेतले काम होणारच पूर्ण
आशेचे किरण करी पूर्ण आस.
नको मनी थारा निराशेला
नका करू मन विचलित
मनी विश्वास असता यशाचा
आशेचे किरण करी मन प्रफुल्लित.
निशे नंतर ऊषा उजळते
आणिते ती नव आशा
सारून मरगळ तनमनाची
दाविते यशरूपी नव्या दिशा
वैशाली वर्तक
अहमदाबाद

