शनिवार, १९ सप्टेंबर, २०२६

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.
 .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.                                                   |त्यावर व ज्या माणसात वावरतो त्यावर पण थोडी फार अवलंबित असते .अथवा 
काही वृत्ती जन्मताच स्वभावात असतात .तर काही वृत्ती परिस्थितीने अंगीकारल्या 
जातात . आता अलिप्त वृत्तीवर बोलावयाचे म्हणजे ही वृत्ती थोडी फार अंगी असते अथवा 
 परिस्थितीने स्वीकारावी लागते, अंगिकारली जाते . अथवा जरूरी पण असते उदाहरणार्थ 
मुले मोठी झाली त्यांच्या संसारात रमली की आपण समजून उमजून अलिप्तता स्विकारण्याची 
जरूरी असते. उगाच उपदेश वा सूचन न करता अलिप्त रहाणे हितावह असते, अर्थात जरूरी असता व विचारणा होता  पण अलिप्तता दर्शनवणे पण योग्य नाही. 
   आणि दुर्लक्षता ही  कधी जाणून बुजून केली जाते वा  कधीआपल्या चुकीमुळे होते.  जेव्हा चुकीने ,तेव्हा ती निष्काळजीपणा दर्शविते. पण काही वेळा  जीवनात दुर्लक्ष करणे म्हणजेच आपल्या पुढील जनरेशन 
काय,किती  कशावर खर्च करतेय वगैरे  बारिक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे , हीच पायरी आहे अलिप्तता कडे 
जाण्याची वा जीवनात अलिप्तता आणण्याची .जेणे करून   नाते संबंध गोड ठेवण्याची  व जीवनाचे खरे सार समजले हे अनुभविण्याची.
       किती ही झाले तरी सर्व सामान्य माणसाचे  जीवन आंब्याच्या कोयी सारखे असते  ,कोय जशी लडबडलेली असते तसे आपण संसारात नाही म्हटले तरी लडबडलेलो असतो चिकूच्या बी प्रमाणे जगणं 
संतांना जमते पण सुषमाचेच उदा घेत सांगते  
     गॅस बाजूला केलेल्या तयारी नुसार  खीर बनणार आहे तर ती. का? कशासाठी? चे विचार न येऊ देता तेथे अलिप्तता दर्शनवणे व ऊतु जाणारे दुध ,न उतू देता , न दुर्लक्ष करीता  गॅस बंद करण्यात दक्षता दाखविणे .
दोन्ही एकाच वेळी संसारातील आंब्याची कोय. क्षणात  जरूरी प्रमाणे (चिकूची बी.)  दक्षताघेणारी होऊ शकते
 तर  अलिप्तता व दुर्लक्षता  सांभाळत जे जीवन जगतात त्यांना जीवनाचा खरा आनंद लुटता येतो.

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६

गौरी

स्पर्धा!स्पर्धा! स्पर्धा
*स्वप्नगंध साहित्य समूहातर्फे ज्येष्ठ गौरीआवाहन आणि गौरी पूजनानिमित्त विशेष काव्यलेखन स्पर्धा 
*स्पर्धा क्रमांक -७९
*दिनांक -१७ सप्टेंबर २०२६ तेदिनांक -१८सप्टेंबर २०२६
विषय. गौरी 
शीर्षक. गिरीजा 

झाले आगमन जेष्ठ गौरीचे
पायी रूळझुळली पैंजणे,
आली सोनियांच्या पाऊले
सदन  भरले आनंद मने

  हिरवीगार केली सृष्टी
कन्याच ती पर्वताची
 नव चैतन्य तिने भरले
गिरीजा ती ब्रम्हांडाची

नेसवून भरजरी साडी
नथ चमके,हाती चुडा हिरवा
शोभे कंठात हिरे माळा
शालु दिसे मोहक बरवा

करून गोडधोड पदार्थ 
नैवेद्यासाठी पुरणपोळी 
  पाही प्रसन्न वदने 
रेखाटलेली सुंदर रांगोळी 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२६

थापा मारणे

मोहरली लेखणी साहित्य समूह 
उपक्रम 
विषय   थाप
शीर्षक. थापा मारणे कला



नाही जमत सर्वांना
सत्य कमी खोटे फार 
थापा मारणे ही कला
खोट्याचाच भडीमार 

बालपणी खेळलोय
एप्रिल फुलचा खेळ
थापा मारिता खेळलो
मजेत गेलाय वेळ 

थाप मारणे गरजेचे
कामी येते हमखास
नको कसे म्हणायचे 
काम टाळताना खास 

न करण्याचा शनिवार
म्हण येते की कामास
थापा मारण्याचा असे
हुकूमी एक्का वदण्यास

कसे अव्हेरू व्यक्तीला 
 न जमे   बोलणे खोटे
 करा  विचार मनात 
चालवा खोटे नाटे


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

एकटा

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 
उपक्रम 
विषय एकटा

का ? शब्दची एकटा 
वाटे नकोसा मनाला 
खर पहाता आलोय
एकटेच ना! जन्माला 

पण येताची  जन्मास
सुरू होतो गोतावळा
माय -बाप भाऊ- बहिण 
 मिळता, हर्षाचा सोहळा

 मानव सामाजिक प्राणी
एकमेका देत साथ
नावडे एकटे रहाणे
!सुख दुःखात मिळतो हात

सारे असता सभोवती
विरंगुळा वाटे मना
एकटेच असता मात्र 
 कसे जगावे वाटे  क्षणा

 तरी कधीतरी वाटते 
 बसावे जरा एकांती
 शांत बसूनी रहावे
 मिळवावी मना विश्रांती 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

सौजन्य

स्पर्धेसाठी 

कमल विश्व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित 
मासिक काव्य लेखन स्पर्धा 
विषय ... सौजन्य 

सौजन्य गुण स्वभावाचा,
प्रत्येकाच्या बालपणी.
जशी होते,जडण-घडण
तसे सौजन्य दिसे जीवनी.

सौजन्य उजळे मानवास,
मिळे शाबासकी सदाची.
होते वाहsवा समाजात,
सौजन्यशील माणसाची.

मायबापांचे संस्कार,
हीच पाळेमुळे सौजन्याची.
रचतात पाया गुणांचा,
जी ठरतात महत्त्वाची.

वाणीने जिंकता जग,
वागण्यात आदर भाव
सौजन्यशील माणसावर,
होई प्रेमाचा वर्षाव

अमूल्य गुणांचा ठेवा.  
सौजन्यानेच सजतो
नाही मिळत कधी पैशाने
स्वभावातून दिसतो

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६

चित्र काव्य

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 
उपक्रम क्रमांक 1615
29/8/26
चित्र काव्य 
  *निवांताच्या गप्पा* 

उभ्या दोघी शेजारणी 
 गप्पा कधीच्या रंगल्या
आटपले का काम सारे
  दोधी चौकशीत दंगल्या 

  मिळे आनंद गप्पात
  दोघी पहा समाधानी
  हास्य विलसते गाली 
  न थकती गाता गाणी

  आयुष्याच्या सांजवेळी 
  करी कौतुक पोरांचे
  भाग्यवान आपण ग
  स्मरण करीती देवाचे.

  घेत आधार भिंतीचा 
 चाले सुखदुःखी बाता 
 संपणार नाही कधी
 उद्या करूयात आता.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गोड गैरसमज

स्पर्धेसाठी
जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच 
साकव्य आयोजित सन्माननीय समूह सदस्या
सौ वृंदा ताई देसाई आणि या कृष्णागवस यांच्या वाढदिवसानिमित्त काव्य लेखन स्पर्धा 
विषय.  गोड गैरसमज 


होती तिची गोड समजूत 
इडली तर तिचीचअसते खास
कधीही खावी मऊ हलकी
इडली चटणी तिची सदा हमखास.

आणि नेहमी  प्रमाणे तिने
घातला ईडली करण्याचा घाट
होती खुश खुशाल मनात 
इडली माझी दाविल छान थाट

केले नेहमी प्रमाणे वाटण 
दिले आमंत्रण येण्या सकाळी 
नास्ता माझा असेल तयार
माझी इडली चटणी असते आगळी.

पण झाला  थोडा घोटाळा
स्लो बारिक गॅस चालूच रात्रभर
गडबडीत पडला विसर
वाटणाचे पातेले राहिले तयावर.

सकाळी पहाता, झाकण सारता 
ती एकदम हिरमुसली 
सा-या वाटण्याचा एकच ईडलेश्वर
पाहून गोड गैर समजावर हसली.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...