शनिवार, १८ एप्रिल, २०२०

बाबासाहेब आंबेडकर (५) बहुजनांचा सारथी,महामानव, अष्टाक्षरी.भावगीत.तुझ्या जयंती

आष्टाक्षरी


१*भीमा तुझ्या जयंतीला*

   आले संकट देशात
   वंदू तुझ्या कर्तृत्वाला
   करु कायदा पालन
   भिमा तव जयंतीला

   लोक कल्याणा झटला
    मिळविला पुरस्कार
  केला दलित उध्दार
   संविधान शिल्पकार

     तेज चमके बुध्दी चे
     किती भाषा पारंगत
     तव कर्तृत्व अपार
     देशभर यशवंत

    समानता तू आणिली
   दलीतांचा तू कैवारी
   जात पात दूर केली
     तुझा मान घरोघरी

   आज वंदन करुनी
  दया भाव सर्वा वरी
    करु तुझीच आरती
  भिमराव सुविचारी

    वैशाली वर्तक
 २     बाबासाहेब आंबेडकर ....भावगीत

        करु तयांचा आठवणीने दिन साजरा                      
        बाबासाहेब होते महामानव शिल्पकार

         लोक कल्याणा दिन रात्र केले प्रयत्न
         मिळवला पुरस्कार तुम्ही भारतरत्न
        नाव तव जगी सतत गर्जत रहाणार
        बाबा साहेब होते महामानव शिल्पकार 1


       मानव ठरला हाची महामानव
        प्रवेशिते केले मंदिरी दलित बांधव
        दिधले तळ्याचे पाणी चवदार
        बाबासाहेब होते महामानव शिल्पकार 2


       जन करीती तुझीच प्रशंसा सदा
       विसर होणार नाही कर्तृत्व कदा
       मिळवून दिला समतेचा अधिकार
       बाबासाहेब होते महामानव शिल्पकार 3

३  बाबासाहेब अष्टाक्षरी

प्रज्ञा सूर्य मानवतेचा
आहे तुजला तो मान
 तव कर्तृत्वे मिळाला
तुझी जगतात शान

   लोक कल्याणा झटला
    मिळविला पुरस्कार
  केला दलित उध्दार
   संविधान शिल्पकार

     तेज चमके बुध्दी चे
     किती भाषा पारंगत
     तव कर्तृत्व अपार
     देशभर यशवंत

    समानता तू आणिली
   दलीतांचा तू कैवारी
   जात पात दूर केली
     तुझा मान घरोघरी

   आज वंदन करुनी
  दया भाव सर्वा वरी
    करु तुझीच आरती
  भिमराव सुविचारी


लोकशाही विचार धारा सा मंच
आयोजित स्पर्धा
क्रमांक 2

**स्पर्धेसाठी*
४ भीम शक्ती काव्य लेखन स्पर्धा

प्रेमाची अक्षरे समूह आयोजित
भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा
काव्य प्रकार... अष्टाक्षरी

विषय .. भीमशक्ती
शीर्षक   महामानव


भीम शक्ती ,प्रज्ञा सूर्य 
आहे तुजला तो मान
 तव कर्तृत्वे मिळाला
तुझी जगतात शान

   लोक कल्याणा झटला
   मिळविला पुरस्कार
  केला दलित उध्दार
  संविधान शिल्पकार

   तेज चमके बुध्दी चे
   किती भाषा पारंगत
   तव कर्तृत्व अपार
   देशभर यशवंत

   समानता तू आणिली
   दलीतांचा तू कैवारी
  जात पात केली दूर
  तुझा मान जगीभारी

  *भीमशक्ती* वंदनीय 
  दया भाव सर्वा वरी
  करु तुझीच आरती
  भिमराव सुविचारी.

 वैशाली वर्तक 
अहमदाबाद





भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी जिल्हा कोल्हापूर 
आयोजित
स्पर्धा क्रमांक 11
दि 14/4/23
५   विषय...बहुजनांचा सारथी
काव्य प्रकार...दशाक्षरी
शीर्षक.   *तूची महामानव* 

 दिला समतेचा अधिकार
 गाऊ तव कर्तृत्वाची गाथा
जन करीती तुझी प्रशंसा
बहुजन नमवती माथा.        1

तूची  ठरला  महामानव.             
पाजूनिया  चवदार पाणी 
दिधला प्रवेश मंदिरात 
बहुजन गाती तव गाणी         2


सारे जन लेकरे देवाची 
नाते आपले विश्व- बांधव
नुरे भाव तो  दलित-जनी
बाबा तुम्ही हो महामानव.           3

अहोरात्र  केलेत बाबांनी 
लोक कल्याण्यासाठी प्रयत्न 
देशाने दिधला पुरस्कार 
मान  बाबांचा *भारतरत्न*          4

आज दिसते दलितांची
तुमच्या  कर्तृत्वाची प्रगती
संदेश दिला बहुजनांना
बनूनी *सारथी* या जगती          5

 दिन साजरा आठवणीने
करु  बाबांचे नित्यस्मरण
गाऊया गुणगान आरती
बहुजनांचे तुला नमन.            6

वैशाली अविनाश वर्तक
अहमदाबाद
मो नं 8141427430















भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच अहमदनगर 
आयोजित उपक्रम क्रमांक १५०
 विषय..चवदार तळे सत्याग्रह 
     *क्रांतिवीर बाबासाहेब*  

निसर्गाची असे देन
जाण समानतेची हवी ठाव
जल हे तत्व अनमोल
असे असता का भेदभाव 

तूची पुकारले बंड जलासाठी
गाजला जल सत्याग्रह महाडला
घेऊन लक्षात हक्क समतेचा
मुभा दिली स्पर्श करण्या सर्व जनतेला 

होती विषमता भरलेली समाजी 
चवदार झाले तळ्याच पाणी
तुझ्या क्रांतिकारी परिवर्तनाचे
 आज गुणगान गाती गाणी

आता  दिसते समानता
नाही उरले  स्पृश्य अस्पृश्य
समतेचा भाव नांदे
सर्वत्र दिसते ऐक्यतेचे दृश्य

वैशाली वर्तक
अहमदाबाद

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

पापण्याच्या काठावर

सिध्द लेखिका समूह आयोजित उपक्रम
अष्टाक्षरी
        **पापण्याच्या काठावर**

       येता आठव प्रेमाची
       मन वेडे मागे पाहे
       उर येतेची भरुनी
       पाणी डोळ्यातून वाहे

       कसा सोसावा विरह
       कैसे कंठु रात दिन
       पापणीच्या काठावर
       नेत्र पाणावले क्षीण

        कधी कळणार तुला
        मनोभाव अंतरीचा
        पापणीच्या काठावर
        किती साठा भावनांचा

         कळताच मनाला त्या
         संपणार तो विरह
         आनंदाने पापण्यात्या
         वाहे अश्रूंचा समुह

      येता सुखाचे हे क्षण
      मन गेले आनंदून
      अश्रू दाटे पापणीत
       हसू येई ओठातून

   वैशाली वर्तक

   

दीप (बाल कथा)

         

                                            
                       परवाची गोष्ट. आपल्या पंत प्रधानजींनी सांगितल्या प्रमाणे दिवा लावण्यासाठी एक पणती तेल घालून वात घालून तयार केली .माझा ४ वर्षाचा नातू समोर आला व म्हणाला,
आजी , " दिवा का लावावायाचा ?
मी म्हटले ," बेटा , दिवा अंधारातून उजेडाकडे नेतो.
उजेड म्हणजेच सुख अंधार तिमीर म्हणजे दुःख . तसेच अंधार म्हणजे अज्ञान आणि उजेड म्हणजे ज्ञान.
तर अंधाराकडून उजेडाकडे , अज्ञानातून ज्ञानाकडे... दुःखापासून सुखाकडे .. नेणारी ही पणती ..दिवा .
तिची ज्योत म्हणजे ज्ञानाचे ..प्रकाशाचे ..आनंदाचे उजेडाचे प्रतीक आहे. तर सध्या जी सर्व जगावर आलेली व्याधी
  महामारी  आली आहे ना. . व बंदिस्त राहून मन उबले आहे. तर हा दिवा आपल्यास आशेचा किरण देतो. ही रोगराई महामारी दूर होणार ....पुन्हा सारे जग आनंदित होणार
दुःख दूर सरणार याची ग्वाही देण्यासाठी , सकारात्मक भाव जागृत होण्यास मदत रुप ठरतो.
                   "सारे सुखीना सन्तु सारे सन्तु निरामया
                   सारे भद्राणी पशन्तु मा कस्मिन दुःख आप्नुयात"
      या श्लोका प्रमाणे सारे जन सुखी होवोत.... सारे शुभ पाहोत.... कोणालाही दुःखी न येवो
अशा श्रध्दा ठेवून दिवा लावला.
        आणि तुला एक सहज पणती दिसली म्हणून पणतीची गोष्ट सांगते. आम्हाला लहान पणी पाठ्य पुस्तकात कविता होती...... मला अजून पाठ आहे त्यातील सार तुला सांगते.
         फार पूर्वी........ तू आता दिव्याचे हे जे बटण दाबताच ,लाईट चमकतो. सर्वत्र झगमगाट होतोना. तसे पूर्वी लाईट नव्हते.
        पूर्वी  ती दिवटी च्या रुपात होते. दिवटी पेटवायचे ..जणू मशाल .त्यातून उजेड पडायचा ...ती शेतकऱ्यांची आवडती होती. मग पणती ची कल्पना मानवास आली. घराघरात मिणमिणता प्रकाश आला .मग  तिला समईचे रुप मिळाले व देवा जवळ मंद प्रकाशात तेवू लागली , मग  तिला काचेच्या घरात रहाण्याचे मिळाले म्हणजे तिची  रुप कंदील झाले . छान कांचेचा जणु महालच तिच्या भोवती बांधला . आणि त्यास कंदिल असे संबोधू लागले. असे होत पुढे तिला गँस बत्तीचे रुप मिळाले. लग्न सराईत ..कार्यक्रमात लग्न वरातीत तिला डोई घेवून वरातीत तिचा  प्रकाश पडायचा. . तिचे काम प्रकाश देणे. पुढे तिची  रुपे बदलत गेली  
        मग तिला वीज .....बिजली म्हणू लागले .मग तर  तिचा लखलखाट वाढला. तिने जगच उजळून टाकले
 तिची  रुपे कितीही बदलली तरी ..तिचे काम एकच स्वतःजळो पण जग मात्र प्रकाशित होवो.
          तेव्हा ही छोटीशी पणती किती गुणाची आहे ना !
      आणि तू पण सांजवेळी देवाशी दिवा लावला की ,
             " शुभं करोती कल्याणम् " म्हणून, आई बरोबर देवाला नमस्कार करुन, सर्वांना सुखी कर असेच म्हणतोस ना. तर हा दिवा शुभ चे मांगल्याचेच प्रतीक आहे
       आजी तू मला "आधी होते मी दिवटी "कविता शिकव ना. हो ऐवते लहान पणी पाठ्य पुस्तकात होती आम्हास ऐक....

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

लोभस हास्य निसर्गाचे

विषय- लोभस हास्य निसर्गाचे

काव्य रचना

होता आगमन रवीचे नभी
सृष्टी पहा कशी उजळली
 लोभस हास्य निसर्गाचे
उषा पण अलवार हसली

मंद पवन वाहे सभोवती
 सुखद भासे क्षण उषेचे
फुले डौलती वेली वरती
लोभस हास्य निसर्गाचे

कृष्ण मेघांची होता गर्दी
येता श्रावण ऋतू बरवा
चिंब भिजवी या अवनीला
जणू पांधरण्या शालू हिरवा

सागराची दिसे भव्यता
 जोमानी लाट येई ऊफाळून
येता किनारा गेली विरुन
भासे चूरचूर झाली लाजून

डोंगरातूनी झरे वाहती
भासती शुभ्र दुग्ध धारा
लोभस हास्य निसर्गाचे
गीत गाई मंजूळ वारा


वैशाली वर्तक



स्वप्न गंध  समुह आयोजित
चित्र  -***अष्टाक्षरी काव्य रचना**

   **लोभस निसर्ग* 
येता रवि राजे नभी
सडे केशरी गगनी
फुले फुलली सुंदर 
उजळली पूर्वा झणी

पानोपानी बहरली
पुष्पे न्यारी चहुकडे
रंग हिरवा सर्वत्र 
वाटे पाहु कुणीकडे

रुक्ष धरा, येता वर्षा
पहा कशी बहरली 
ओली चिंब झाली धरा
तृणांकुरे अंकुरली

रुप पहा वसुधेचे
कसे झाले मनोहर
जणू हिरवे गालिचे
भासे सर्वत्र सुंदर


रान माळ हिरवट 
वृक्ष  वेली बहरल्या
रंग एकच धरेचा
भासे पाचू पसरला

झरा वाही खळखळ
वाटे गातो संथ गाणे
हास्य लोभस निसर्ग 
ऐकू वा-याचे तराणे



वैशाली वर्तक  15/10/20

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...