वर्ल्ड व्हिजन टाईम्स मधे

लालित्य नक्षत्र वेल समूह आयोजित
उपक्रम ललित लेख
आठवांचे मोरपीस
अजून आहे ती स्मरणात ...घेतलेली पहिली वा पहिल्या भेटीचे क्षण...
विचार येताच गाणे माझ्या ओठी येते
"भेट तुझी माझी स्मरते....आजून त्या दिसाची..."
खरच पहिल्या भेटीच्या क्षणांची आठवण काही औरच. कोण आधी बोलेल ..काय बोलेल. मन थोडे भयभीत असते. कशी बर आणि काय सुरुवात करु ?. कुठल्या विषयात हात घालू ..काही.sss. काही समजत नसते.
मग उगाचच पदराचा चाळा चालतो वा वेणीशी खेळ करत बोलणे होते. हो त्या काळी साड्याच नेसायचो .आजकाल सारखे पंजाबी वगैरे नव्हते. त्यामुळे पदराशी चाळा....
तसच काही से झालेले ते क्षण डोळ्यासमोर आले. ती पहीली भेट. ओढ तर असतेच ..कसा असेल आपला सखा. आपले विचार मांडणे मनात चालू होते . तेवढ्यात मनाचा निर्धार करुन .दोघांच्या तोंडून एकच शब्द निघतात .,"...मी म्हणत होतो / मी म्हणत होते. .."आणि पुन्हा स्तब्धता.
असेच काहीसे बावचळलेले क्षण होते व सर्वांचेअसतात. मग मात्र गंभीर पणे एकमेकांची आवड ..संगीताची आवड वगैरे आहे का करत गप्पा सुरु ..... आजु बाजुला चालत असलेली हालचाल डोळ्यांना दिसत असते पण लक्ष मात्र नसते. क्षण च तो असतो तसा ... एकमेकांना जाणून घेण्याचा .एकमेकात गुंतण्याचा. असेच गुंतत आम्ही पुढे चालत होतो. सहजच झालेला.... ..नाही.... नाही जाणून बुजून केलेला त्याने तो स्पर्श ..अजून आठवणीने मन शहारते. असतोच क्षण तसा तो. सहजचतेने हात हाती घेऊन ....टाकत गेलो काही पावले.
एकत्र पावले.. जणू मनास आनंद.. धीर ..विश्वास ..मनात वाटलेले ते क्षण. जणू
क्षणात भासले आता काहीही संकट आपल्यावर येऊ शकत नाही ..असा त्या वेळेचा वेडा ,....क्षण....हो वेडा ..आता वेडा भासतो. पण तेव्हाचा दृढ विश्वास .. कारण वेळच अशी असते.एकमेकां शिवाय काही दिसत नसते. आपल्याच विश्वात गुरफटलेले असतो.
असे मोहक क्षण अनुभवत .बोलत वेळ जातो. मग मात्र सहज झालेला स्पर्श हवा
हवासा वाटलेला. व जणू जीवनाची वाटचाल कशी असेल याची मनी स्वप्न रंगवीत पावले हातात हात गुंफवित वाटचाल करु लागलो
चालत चालत कधी घराशी आलो कळलेच नाही. टाटा बायबाय करत
उद्या च्या भेटीची आतुरता दोघांनी दर्शवत .निरोप घेत .पहिली भेट अविस्मरणीय मनी ठरवत... मनात आनंदाने घरी परतले. विचाराने पण मन प्रफुल्लित झाले
असेच असतात ना ते पहिल्या भेटीचे क्षण. !
वैशाली वर्तक
तेजोवलय ला पाठविली
पहिली भेट
अजून आहे ती स्मरणात ... घेतलेली पहिली भेट. वा पहिल्या भेटीचे क्षण... पहिल्या भेटीचे
विचार मनी येताच . गाणे माझ्या ओठी आले
" भेट तुझी माझी स्मरते....आजून त्या दिसाची..."
खरच पहिल्या भेटीच्या क्षणांची आठवण काही औरच. कोण आधी बोलेल ?. आणि .काय बोलेल.? मन थोडे भयभीत असते. कशी बर आणि काय सुरुवात करु ?. कुठल्या विषयात हात घालू ..काही.sss. काही समजत नव्हते.मनात विचार तर अनेक घोळत होते..
मग उगाचच पदराचा चाळा चालला वा वेणीशी खेळ करत बोलणे झाले. हो! त्या काळी साड्याच नेसायचो आम्ही ...आजकाल सारखे पंजाबी वा ड्रेस परिधान नाही करायचो. . त्यामुळे पदराशी चाळा.... अगदी अनाहुत व्हायचा.
तसेच काही से झालेले ते क्षण डोळ्यासमोर आले. ती पहीली भेट. ओढ तर असतेच ..कसा असेल आपला सखा. आपले विचार मांडणे मनात चालू होतेच . तेवढ्यात मनाचा निर्धार करुन .दोघांच्या तोंडून एकच शब्द निघालेत.,"...मी म्हणत होतो
मी म्हणत होते. .."आणि पुन्हा स्तब्धता.
असेच काहीसे बावचळलेले क्षण होते व मला वाटते सर्वांचे असत असावे. . मग मात्र गंभीर पणे एकमेकांची आवड ....संगीताची आवड आहे का करत गप्पा सुरु झाल्या ....नवे कुठले नाटक वा सिनेमा पाहिला असेल तर त्या विषयावर बोलणे झाले. शास्त्रीय संगीताची आवड आहे का.?... हो कारण आपल्या मराठी समाजात संगीत आवड असतेच. त्यामुळे थोड्या फार त्या विषयावर गप्पा झाल्या.. अर्थात फार काही विचार पूर्वक नाही हं.
पण आवड जाणून घेण्या इतपत.
. आजु बाजुला चालत असलेली हालचाल डोळ्यांना दिसत होती. पण लक्ष मात्र नव्हते. क्षणच तो असतो तसा ... एकमेकांना जाणून घेण्याचा... .एकमेकात गुंतण्याचा. .
असेच गुंतत आम्ही पुढे चालत होतो. चालताना सहजच झालेला.... अ ssहं ..नाही....
नाही जाणून बुजून केलेला त्याने तो स्पर्श ..अजून आठवणीने मन शहारते. ..असतोच क्षण तसा तो. मग सहजचतेने हात हाती घेऊन ....टाकत गेलेली काही पावले. त्यावेळी किती सुखद ,आनंद दायी भासली यांची आठवण झाली.
एकत्र पावले.. जणू मनास आनंद.. धीर ..विश्वास ..मनात वाटलेले ते क्षण.
जणू क्षणात भासले आता काहीही संकट आपल्यावर येऊ शकत नाही ....असा त्या वेळेचा तो वेडा ,क्षण....
हो वेडाच ..आता वेडा भासतो.
पण तेव्हाचा दृढ विश्वास .. कारण वेळच अशी असते.एकमेकां शिवाय काही दिसत नसते. आपल्याच विश्वात गुरफटलेले असतो.
असे मोहक क्षण अनुभवत .बोलत बोलत वेळ जात होता.. मग मात्र सहज झालेला स्पर्श हवा
हवासा वाटलेला. व जणू जीवनाची वाटचाल कशी असेल याची मनी स्वप्न रंगवीत पावले... हातात हात गुंफवित वाटचाल करु लागलो .अश्वासक स्पर्श अधिकाधिक आवडू लागला. त्या स्पर्शात आत्मियता निर्माण होत गेलेले ते गोड स्मृतीतले क्षण. .
क्षणात डोळ्यासमोर आले.
. सहजच समोर चालता चालता उद्यानात शिरलो. शिरलो. गवतात बसून उगाचच गवत कुढत
तर मधेच इकडचे परिक्षण करीत पुन्हा गप्पा रंगल्या.
भाळावर वा-याने पुन्हा पुन्हा येणारी खट्याळ लट मी सावरत असता..सहजच सख्या ने
त्याच्या हाताने बट सावरण्यात केलेली मदत .... आठवून आजही मन हर्षित झाले.
व त्याचे ते उद्गगार. लगेच आठविले. ,"
"असू दे लट अशीच छान दिसतेय. तिचा ती खट्याळ पणा दाखवितेय.
व तुझ्या सौंदर्यात भर करत आहे.
लगेच माझे शब्द आठविले. ," हं. काहीतरीच हे."
पण मनात मात्र सुखावले होते.
मग पाणी पुरी खायची हुक्की आली व खाण्यास पाणी पुरीच्या गाडी कडे वळलो.
पाणी पुरी खाताना तिखट लागल्याने .माझा लाल झालेला चेहरा पहाता , सख्याचा कावरा बावरा
(हो त्यावेळीस ह , आता नाही होत अती सहवासाचा. परिणाम) झालेला तो चेहरा आठवून हसू आले.
लगेच स्वतः हून धावत जाऊन आईस्क्रीम आणलेले क्षण आठविता आता मात्र मनी हसू आले.
हो पण त्यावेळी असतेच असे. जरा त्रास न व्हावा ही तळमळ पाहून मनोमन सुखावले.
थोड्या वेळाने मीच म्हटले चला आता परतायचे का घरी?
लगेच का?ग? थांब ना इतकी कसली घाई.
अजून थोड्या वेळाने जाऊ की.
मीच बोलले,"नको वेळात जाऊया . आता अंधार पण होत आहे.
लगेच वदला,"मी आहेना .
पण हो नाही करत आम्ही परतीची वाट धरली.
चालत चालत कधी घराशी आलो कळलेच नाही. टाटा बायबाय करत असता
उद्या च्या भेटीची आतुरता दोघांच्या चेह-यावर न सांगता दिसत होती,
पुन्हा केव्हा? कधी? कुठे? भेटायचे यात पुन्हा ५\१० मिनीटे दाराशी उभे राहून काढली.
दोघांची .निरोप न घेण्याची इच्छा चेह-यावर कळत होती. अशी .पहिली भेट अविस्मरणीय मनी ठरवत... मनात आनंदाने घरी परतले. विचाराने पण मन प्रफुल्लित झाले.
आणि आता त्या पहिल्या भेटीचे वर्णन करता .मला माझेच स्वरचित गीत आठविले .
आठव भेट आपुली चंद्र साक्षीत घडलेली
हात तुझा घेऊन हाती वचने ती दिधलेली.
व पुन्हा एकदा पहिल्या भेटीच्या स्मरणात रममाण झाले
वैशाली वर्तक
अहमदाबाद
८१४१४२७४३०