शनिवार, २९ मार्च, २०२५

चित्र काव्य


 सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम क्रमांक ५२५
विषय... चित्र काव्यलेखन 
शीर्षक..

किती खुष झालीय
आनंद दिसे मुखावरी
झेलतेय रेशीम धारा
पडण्या आधीच भूमीवरी

डोळे  घेतले मिटून
हसतमुखे पसरून हात
थेंब ओधळती गालावर 
झाली ग्रीष्म झळांची मात

विसरली माळलेल्या
सुमनांचा गंध क्षणात
मृद्गंध पसरता सर्वत्र
दवबिंदू सवे आसमंतात


रक्त वर्णी कंकण  हाती
लाल  साडीचोळी परिधान
लाली आली गालावर 
 चेहऱ्यावर दिसे समाधान

थंड शीतल झोंबे वारा
करी कंपित तन मनाला
शहारली काया जल बिंदूंनी
 मन  होई थेंब झेलायाला.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

समजून घे तू सुखमय जीवन


 सिध्द साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम आठोळी लेखन
विषय... माझिया मना जरा बोलना


 नको ठेवू मनी  किंतू परंतु
माझिया मना  जरा बोलना
तव हृदयीचे दडलेले गुज
अलवार मजला सांग ना

 स्थान नुरते गैर -समजाला
नित्य रहा  स्पष्ट  बोलण्यात
नको विचारांचा  कधी कोंडमारा 
हीच  समजूत  ठेव  मनात

वैशाली वर्तक
अहमदाबाद





जगाचा पोशिंदा साहित्य मंच 
आयोजित उपक्रम सहाक्षरी काव्य लेखन 
विषय.   समजून घ्यावे
शीर्षक    सुखमय जीवन 

सुखाने जगण्या
हवी तडजोड 
होतसे जीवन
आंब्याची फोड


ऐकता दुजांचे 
गवसे कल्पना
देत असे आशा
नव्या संकल्पना 
घ्यावे समजून 
उत्तमच ठरे 
नसे आपलेच 
सदा साठी खरे.

समजून घेता
कळते क्षणात 
उगाच धरिला
हट्टची मनात.

मीपणा सोडून 
घे ना समजून 
सुसंबद्ध वाद
दोघां च्या कडून 

माझे तुझे सोड
व्हावे  सहमत
व्हा समजदार 
होते एकमत 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
8141427430

पतंग / दोर पतंगाचा

यारिया साहित्य  कला समूह
विषय -- पतंग

शोभिवंत तू विविध रंगात
लहान मोठे  अनेक आकार
दोन साध्या काड्या जोडूनी
झाले बघ तव रुप साकार

हलका फुलका तू नाजूक
होतो वा-यावरती स्वार
उंच  गगनी घेत भरारी
क्षणात ढगांना करिशी पार

दोरीची तुजला सदा साथ
जीवन नौका तिच्या हातात
संभाळीते तीच तव भार
करविते सफर गगनात

मधूनच डोकावी ढगातूनी
थंडगार सुखकर वा-यात
दिसे तव रुप अती  मनोहर 
भासे विहरता खग नभात

कधी मारीशी सूर नभी
जशी मासोळी पाण्यात
लगेच तो-यात मान काढूनी
सर सर भरारी घेतो गगनात

 तुटता दोरी , सहवेना विरह
भरारी घेत रममाण नभात
सुटता दोरीची साथ तुझी
हताश  होता  दोघे क्षणात

वैशाली वर्तक

अ भा म सा प स्वप्नगंध समूह
उपक्रम षडाक्षरी काव्य लेखन
विषय . -- पतंगाचा दोर
        *साथ दोरीची*


पतंगाची दोर 
सदैवच साथी
पतंग नभात
दोर राही हाती              1


पतंग ,दोरीच्या   
बळावर स्वार
ढगांना करीतो
क्षणार्धात पार                 2

जीवन नौकाच
दोरीच्या हातात
तीच करविते
सफर नभात                      3

.\
  ढिल देता जाई 
  उंच गगनात
जणु भासे खग      
  विहरे  नभात                    4

पहा कसा मारी 
 सूर तो नभात
जणु की, मासोळी
ती जलाशयात                       5


मान वर काढी
लगेच तो-यात
सरसर घेई
भरारी नभात                   6

पतंगाचा दोर 
तुटता नभात
साथ संपताच
उदास क्षणात                       7              


वैशाली वर्तक           
अहमदाबाद







लेख कर्णफुले

वल्ड व्हिजन टाईम्स मधे 

लालित्य नक्षत्रवेल समूह आयोजित 
ललित लेखन
विषय... कर्णफुले 

     कर्णफुले कानात हवीच त्या विण चेहरा कसा भकास भासतो. मला तर बांगड्या गळ्यातली पेक्षा कानातली याची फार हौस .........हौस नाही, तर हव्यास म्हणा. ...मला म्हणजे सर्वच बायकांना असतोच..खरी सोन्याची तर सध्याच्या काळात घेणे परवडत नाही   तरी 10/12तर असतातच . शिवाय नकली तर आकर्षक व सुंदर. आजकाल अमाप मिळतात. 
       आपल्यात तर मुलगा असो मुलगी कान विंधवणे. कान टोचणे प्रकार असतोच. जन्मा नंतर 10/12 व्या दिवशी कान विंधविण्यात येतात . तेव्हा सुंकले हा पहिला कानाचा दागिना.  कानात घातल्याने , बाळाच्या चेहऱ्यात, दिसण्या तर लगेच फरक पडतो. शेवटी दागिनाच...तो.!  अलंकार.... शृंगार शरीराचा वाढविणारच. !
     तर अशा रितीने पुढे  मुली चौकुला.  कुड्या. कुडयांव्यतीरिक्त कर्णफुले, भोकर, झुबे, झुंबर, बाळी, वेल,सोन्याचे कान यांसारखे आभूषणेही कानात घातले जातात. याचे पारंपारिक नाव झुबे असे आहे. सतराव्या शतकाच्या आधीपासून हे प्रचलित आहेत.
       तर सांगायचे काय मला कर्णफुलांची फार आवड. नवीन लग्न ठरले होते . लग्ना आधीचे फिरणे म्हणजे लाड पुरवून घेणे व नव-याने पण लाड पुरवण्यात  मागे न पडणे .  असेच फिरायला गेलो होतो. 
यांनी कौतुकाने विचारले घ्यायची कानाची आभुषणे.... मी उगा नको नको म्हटले. पण कानतली पाहून  मन रहावलेच नाही. यांनीच त्यांचा आवडीचे निवडले. आणि काय ! त्यांची आवड छान आहे कळले.
डूल प्रकारातील पसंत केली.
     पसंत करून थांबले नाहीत तर चक्क दुकानात त्यांनीच माझ्या कानात घालून फिरकी पण लाव ssली.
व अशी नजर रोखून पहात होते की.  ... त्यांच्या सुंदरीला कवेत घेणारी की काय !
 हो आमच्या वेळेचा काळ  होता. ..सध्याचा काळात तर  तेही शक्य आहे म्हणा.
    पण खरच कर्णफुले शोभून दिसत होती. तेवढ्यात मी पण लहान मुली सारखी २\४ दा माना वेळावून आरशात स्वतःला निरखून पाहिले. शेवटी  यांनी पण   पुढे पुढे.  येणाऱ्या.. माझ्या लाडिक बटांना कानामागे  करण्याची व अनाहुत स्पर्श करण्याची संधी  सोडली नाही.
     ती कर्णफुले आजतागायत मी जपली आहेत. एकतर  लग्ना आधीची पहिली भेट. ती नुसती कर्णफुले  नसून पहिल्या भेटीची सदा आठवण करून देतात. त्यानंतर अनेक कुड्या काय झुंबरे काय खड्याची काय!
इतकं नव्हे तर सुंदर नव्या नव्या आकर्षक डिझाईन ची.  मस्कत ची पण ४\५ आणलीत
सर्व वापरली पण ती लग्ना आधीची कर्णफुले अजून मीच वापरते.  कारण त्या कर्णफुलात दुकानात  ते विकत घेतानाच्या आठवणी दडलेल्या आहेत ना!


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

मायबोली. कसे वर्णू ऋण. अभिजात मराठी


शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे 
आयोजित काव्य लेखन स्पर्धा 
शीर्षक .... कसे वर्णू ऋण 
                                                          


साहित्य तेज पेपर मधे प्रकाशित १९\४\२५



  भाषा मराठी आहेच प्राचीन
  म्हणून मिळाला तिज मान
  साकारले  प्रयत्न , भाषा प्रेमिकांचे
  उरी दाटला ,भाषेचा अभिमान 

मुकुंद राज अन् ज्ञानेश्वर
माय मराठीचे आद्य जनक,
वैशिष्ट्ये पाहून मायबोलीची
अभिजात दर्जाचे जनमनी सार्थक 

अहवाल केला तयार समितीने
रंगनाथ पठारें याचे  होते नेतृत्व
 सविस्तर अहवाल पाचशे पानी
दाविले तयात भाषेचे प्रभुत्व .

प्राप्त झाले यश मराठीला
जाणा आता मराठी ची महती
मिळला दर्जा उच्च भाषेचा 
वाढवू मान सर्व भाषेत जगती.

कसे  वर्णू ऋण समितीचे 
ज्यांनी केले  प्रयत्न अखंड
मिळविण्यास मान मराठीला
विश्वात शोभण्या सदैव उदंड 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद 
८१४४२७४३०

गुरुवार, २७ मार्च, २०२५

काव्य रचना. शब्द सरी बरसल्या

सावली प्रकाशन समूह
काव्य लेखन 
उपक्रमासाठी
16/12/21
विषय - ओळ कविता
ओळ - शब्द सरी बरसल्या
     *काव्य रचना*
       
  मनी दाटलेले भाव
हाती घेता लेखणीला
*शब्द  सरी बरसल्या*
धारा भेटल्या मातीला

असे गुज अंतरीचे
उमटवे ती लेखणी
शब्द सरी बरसता
भासे मजला देखणी

अशा  नवरस पूर्ण 
*शब्द सरी बरसल्या* 
जणु मेघवर्षा आल्या
मन भावन ठरल्या

शब्द सहज  झरता
 दावी हृदयाचे भाव
शब्द शब्द जोडुनिया
घेई अंतरीचा ठाव

शब्द  असती सुमने
नाना रंगी उधळण
भक्ती, शौर्य ,धैर्य ,शांत
जणु शब्द पखरण

पहा शब्द एक-एक
झरला लेखणीतूनी
झाली कविता तयार
मोद झाला मनातूनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

आठवण (बालपणीचा काळ)

                     आठवण
अजुन आहे स्मरणात, ते दिन  बालपणीचे
कसे जड़लो घडलो , आजच्या या मितीचे.

अचूक वेळ सांगणे, आठवते ते आजीचे
बिनकाट्यांचे घड्याळ ,होते तिचे उन्हाचे.

जीभेवर रेंगाळतेय ती चव , पोळीच्या लाडूची
अन खमंग त्या  कुरमु-याच्या  चिवडया ची.

गुळ पोळीची सात्विक गुंडाळी ,असे न्याहरिला
मागे टाकेल चवीत, सध्याच्या  या फ्र्ँकीला.

पत्ते,लगोरी डाव ,रंगले असत दिवसभर
मोबाईल्स् गेम्सना, कधीच येणार नाही ती सर,

सांजवेळी म्हटली जाई ,घरात शुभंकरोती
तर आता,वेळ सुरु होते , टिव्हीच्या मालिकेंची

मातीनी ,गेरूनी बनविलेले ओटे न् किल्ले
नव्हते सर्वत्र चायनीजचे लाईटींगचे जाळे.

घरोघरी मित्रांसवे , चाले दिवाळीचे फराळ
अभ्यंग स्नाना वेळी, वाजवायचे फटाके बार

आता राहिल्या,नुसत्या आठवणी
"ती" मजाच न उरली , "त्या" काळाची.
 असे म्हणत फक्त, आठवण काढायची
गत काळाची , अन् जुन्या दिवसांची.





वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...