शनिवार, १३ डिसेंबर, २०२५
लोक मान्य. लोकनेता टिळक
विषय *लोकमान्य*
भारतीय पेहराव
लोक मान्य टिळकांचा
विडा स्वातंत्र्य प्राप्तीचा
उचलला नेतृत्वाचा.
*लोक* हीच शक्ती आहे
मिळविण्या स्वातंत्र्य.
प्रबोधन दिले जना
घालविण्या पारतंत्र्य
हक्क मागण्या स्वातंत्र्याचा
सिंह गर्जना केली बेधडक
स्वातंत्र्याचा लढ्यासाठी
प्रेरणा व धैर्य दिले बेशक
जन जागृती करण्या
गणेश उत्सव केला सुरू
एकतेचे बळ आणण्या
झाले ते, स्वातंत्र वीरांचे गुरू
तरुण भारत,केसरी 'तून
केली जागृती जनात
केल्या शिक्षण संस्था स्थापन
गीतारहस्य रचिला कारावासात.
निर्भयतेने मांडित मते
स्वातंत्र्याचा होता ध्यास
कधी न झुकले कोणा पुढे
लोकमान्य लोक नेता खास
वैशाली वर्तक
सोमवार, ८ डिसेंबर, २०२५
वृत्तबध्द... वृत्त आनंदकंद. विषय कविता ,२)दुनिया३) दु:ख
वृत्त आनंद कंद
लगावली गागाल गालगागा गागाल गालगागा
विषय ...कविता
शीर्षक. प्रेम कवितेशी
दैनंदिनी पहाता,आले विचार ओठी.
ओवीत शब्द माळा, कविता तयार मोठी.
झरतात शब्द जेव्हा,वाहे अखंड सरिता.
माझ्या कवी मनाची, भावे जनास कविता.
बेधुंद होत मन हे, येताच शब्द हाती
सुचता विचार धारा, ओंजळ भरुन जाती.
पाहून डोलणारी ,वा-या सवे फुले ती,
रेखाटता सहजची , आनंदली मुले ती.
देते कधी सुवचने, सारून ती निराशा.
संबोधते./ जनांना , उजळेल आज आशा
दावीतसे अबोला ,का तू कधी रुसूनी
यमके न साथ देती ,बसतेस तू फुगूनी,
माझे मला कळाले, करिताच नित्य वाचन
स्फूरेल काव्य मजला, नियमित करीन लेखन
वैशाली वर्तक
अहमदाबाद
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
मृदगंध
विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अष्टाक्षरी काव्यलेखन विषय मृदगंध किती वसुने साहिल्या तप्त उन्हाच्या झळा काया तिची भेगाळली भासे ज...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...
