गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

राबत गेले \ गेलो

 मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 

काव्यलेखन 

विषय. राबत  गेले


सध्याच्या जीवनशैलीशी

   तुलना  करिता मनात 

वाटते कधीतरी तेव्हा

 किती राबलो  बालपणात 


पायी चालणे  शाळेला

किती  जायचो सहज

कधी वाटली नाही तेव्हा

टोपी वा छत्रीची गरज


 तूप गुळ पोळी ,भाजी

 नाही केली हॉटेलची मौज 

जुनी पुस्तकं वापरून 

भागविली नवीनची हौस


उधळपटी केली नाही 

 जीवनात केली काटकसर

 आहे त्यात  गोड मानले

 म्हणून सुख मिळाले जीवनभर.


नोकर नव्हते  घरात

  घरकामात केली मदत

स्वतः चे काम केले स्वतः 

   आनंदे होतों राबत


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...