मंगळवार, ८ जुलै, २०२५

ललित लेख. गुरु चरणी ठेवीतो भाव

शब्द रजनी कथा ललित लेख लेखन साहित्य समूह पुणे 
आयोजित 
ललित लेख लेखन 
दि ८\७\२५
विषय ... गुरू चरणी ठेवीतो भाव 
शीर्षक.     मी अजुनही विद्यार्थी  

         येता जन्मा गुरू हा हवाच.आई असे आद्य गुरू.जिचे बोट धरूनी चालता
शिक्षण देणे सुरू.    .जसे होतो मोठे गुरू पदांची संख्या वाढत जाते. जीवनात अनेक गुरू लाभतात जे ज्ञान देतात व जीवन सुलभ करतात. 

येताची जुळूनी  । 
गुरू  कृपा योग ।। 
तो असे सुयोग
जीवनात |

   खरच  अगदी उचित कथन आहे.   वरच्या माझ्याच ओळी  मला आठविल्यात. शालेय जीवनात विद्या देणारे व त्याच बरोबर व्यवहार ज्ञान सहजतेने देणारे गुरू . त्यांच्या तर आपण आदर भाव ठेवून ....त्यांना वंदनीय मानून ज्ञान संपादन केले
म्हणूनच आपण जीवनात काही करु शकलो. , नुसतेच करु शकलो  नाही तर

गुरू कृपा योगे  । 
तरलो तरलो ।। 
आता  उध्दरलो।  
जीवनात  ।।           

  असे म्हटले तर काही चुकीचे नाही.
गुरू कृपेचा तो योग. आजही ते भाव मला आठवितात. त्यांची कृपा झाली म्हणून ज्ञानी झालो ,त्याचा आज आनंद वाटतो. ज्ञान संपादन करून भविष्याची वाटचाल सरळ सुलभ झालीच.. शिवाय संकटी. कठिण प्रसंगी पण कसे तरून जायचे ,बाहेर  निघायचे या ज्ञानाचा उपयोग झाल्याने, जीवनी दु:ख निवारण झाले.कुठल्या शंका कुशंकेला मनी थारा दिला नाही. 
   आणि हो ....नेहमी निशा नसतेच...  निशे नंतर उषा पण येते ...असे समजवित गुरू ची प्रेरणा, वेळोवळी कौतुकाची थाप ,हे सारे गुरूंचे मनी भाव अजूनही स्मरणात आहे.
            जीवनात गुरू शिष्य नाते चालूच रहाते. ज्याच्या पासून ज्ञान मिळते तो गुरू..
मग तो आपल्या हून लहान पण असू शकतो. 
         साधा किटक  कोळी पहा.. पण जिद्द असावी मनी तरच यश मिळेल ,काम पूर्णत्वास जाईल . हे  शिकवितोच ना! 
 तो कोळी चिकाटीने शंभरदा पडून जाळे  पूर्ण करतोच ना.? तर असे गुरू चे भाव मनी असावेत. निसर्ग पण गुरू शिकवितो कसे जगावे. तर
    
जीवनी शिकणे हे गरजेचे
तर वाढे  आपले ज्ञान .
विद्यार्थी अवस्था महत्त्वाची 
ठेवा सदा त्याची जाण.   
            असे म्हटले तर चुकीचं  ठरणार नाही.

     जाणूनी महिमा गुरूचा
     मिळण्या जीवनास आकार 
    विद्यार्थीनी मी रहाते सदैव 
    आयुला भक्कम आधार .

तर गुरू विणा नसे उध्दार  हे सदा भाव मनी ठेवावे .

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

सोमवार, ७ जुलै, २०२५

लेख घन ओथंबून आले

 ग्रीष्माच्या तप्त झळा अंगाची लाही करत होत्या. आदित्यराजे जणू आग ओकीत होते. सारी सृष्टी तप्त उन्हाने

कोमेजली गेली होती.गुरांना हिरवा चारा मिळत नव्हता.

मानवाच्या अती प्रगती च्या लालसेने सध्या वनराई पण कमी झालेली , त्यामुळे वृक्षेच सावली शोधत होती तर पथिक, गुरे यांना सावली कोठुन मिळणार. जो तो गर्मी ने हाशहूश करत ,आकाशाकडे पहात  बरस रे बाबा आता म्हणून आकाशाकडे नजर लावून बसला होता.

      वसुंधरा तर तापून तापून तिच्या मातीचा कणन कण तप्त झाल्याने शिवारात तील माती भेगाळलेली होती. व भुकेलेल्या बाल्यापरि परि तोंड पसरवूनी ममृग जलासाठी आसुसलेली होती . पण यंदा वरूणाची कृपा जरा लवकरच झाली ,6जूनला मृग नक्षत्र लागते पण यंदा आकाशात काळ्या मेघांची गर्दी दाटली .

बळीराजाला  पेरणीचीतयारी करण्यात घाई करावी लागणार या विचारात होता.

  गर्जत बरसत या मेघांनो 

   नको नुसती गर्दी गगनात 

   गडगडाटाने बरसा  रे

   काळी माय आसुसली शिवारात.

    सुरु झाला सोसाट्याच्या वारा, पक्षांना पण पावसाची चाहूल लागली. इकडून तिकडे पंख पसरून, उडु लागली. पाला पाचोळा पण जणु आनंदाने फेर धरून वा-या च्या तालावर गोल गोल गिरक्या घेत उडू लागला

आणि जलधारा नभातून बरसू लागल्या. मग


वाजवित ढोल ताशे 

मेघ राजा बरसला

नृत्य  दावी सौदामिनी

मोर आनंदे नाचला

  तप्त वसुंधरा पण तिच्या सख्यांना भेटण्यासाठी आतुरतेने वाट पहात होती . तिच्या वरुण सख्याला अलिंगन

देऊन तिची तृष्णा तृप्त झाली. आणि  वारा पण त्या आनंदात सामील होऊन आसमंतात मृद्गंध जणू पसरवत होता. सारी जन मन आनंदाने प्रसन्न झाली. जणू

           

चिंब झाली वसुंधरा

आल्या पावसाच्या धारा

ओल्या झाल्या वृक्षवेली

गाणी गात फिरे वारा


घन निळा बरसला मग हळूहळू  रिमझिम पाऊस धारा जलधारा बरसल्या. आसमंती गारवा आला जनांची गर्मीने होणारी जिवाची काहीली थांबली. 


मुले नाचती आनंदे

गात गाणी पावसाची

टपटप झेली धारा

माळ दारी  पागोळ्याची

     अशा रितीने जलधारा बरसून  घन ओथंबून आलेले आकाश रिक्त झाले.थंड वारा मस्त जिवाला सुखावत होता. वृक्ष वल्ली पाण्याने स्वच्छ धुवून निघाल्या होत्या.पानांवर तितकी जाणवित होती .शेवटी निसर्गाचे 

जलाची किमया आगळीच.



वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...