शनिवार, २९ जुलै, २०१७

मी अनुभवलेला सिंगापूर

    
       सन  2001  मी बँकेतून VRS घेण्या आधी आम्ही दोघांनी बँकोक, पटाया , शेवटी 7 दिवस सिंगापूर अशी सहल आयोजित केली होती. ते आमचे पहिले सिंगापूर दर्शन . पण तेव्हा फक्त हाॕटेल मधे राहून सिंगापूरची पहाणी झाली . तोंड ओळख झाली .कारण हाॕटेल मधे राहून तेथील लोकांची  रहाणी करणी जीवनशैली याची काहीच कल्पना येणे शक्य नसते. पण सचिन ची (मुलांची ) बदलीच सिंगापूरात झाल्याने सिंगापूरामधे वास्तव्य करावयास मिळाले. व आता तर दरवर्षी २महिने सिंगापूर मधे येतो. आणि दरवर्षी चला" मामाच्या गावाला जाऊया"म्हणतात तसे दरवर्षी चला "सचिनच्या सिंगापूरला जाऊया" म्हणत नित्य नियमित रहावयास येतो.
         खरच , सिंगापूर एक तर भारता पासून तसे जवळ .अहमदाबाद पासून पाच - साडेपाच तासांच्या अंतरावर. सिंगापूर सुरेख ,सुंदर , शिस्तीचे अन् सोपे.सोपे  एवढया  साठी की  आमच्या सारख्या कधी तरी रहायला येणा-यांना तसेच वरिष्ठ नागरिकांना जर पत्ता नीट माहित असेल तर हिंडण्यात, फिरण्यात कठीण पणा भासत नाही .तसेच transportation  सोय पण फारच छान. प्रत्येक cluster च्या वा रहात्या घराच्या जवळच शक्यतो MRT वा बस स्थानक असतात,  त्यामुळे कुठेही जाणे सहज सुलभ होते. .तसेच जीवन पण  रहायला सुरक्षित आहे.
        कुठे ही नजर टाका, 5/25 झाडे नजरेसमोर येतात. सर्वत्र हिरवळ
पसरलेली . Vertical plantation नजरेस येते.  मध्यंतरी मी सिंगापूरात असतांना आमच्या येथील  चारोळी ग्रुप वर " असेच काही तरी येते माझ्या मनीं" म्हणून चारोळीचा विषय होता .तर लगेच माझ्या मनांत येथील  हिरवळ पाहून विचार सुचला.
                  असेच काही तरी येते माझ्या मनीं
                  दिन सिंगापूर सोडण्याचे  येता जवळी
                  घ्यावी डोळा भरूनी येथील  हिरवळ
                  जीवास देत राहील गारवा वर्षे भर.
  असे सदा हरित सिंगापूर सर्वांना आर्कषित करणारे आहे.
             तसेच सिंगापूर मधे येथील सिंगापूरीयन लोकात,   आपल्या भारतीयां सारखी एकत्र कुटुंब पध्दती पहावयास मिळते. जेव्हा मी नातीला शाळेच्या  बससाठी सोडायला जाते. तेव्हा एखादी तरी आजी वा आजोबा नातवा बरोबर सोडायला आलेले दिसतात. एक मात्र गोष्ट जाणविली. कीं सिंगापूरीयन बायकांना आपल्या सारखे सबंध दिवस स्वयंपाक घरात रहावयास आवडत नसावे.  ठिक- ठिकाणी food court दिसतात. आॕफीस मधून परत येतांना ब-याच जणांच्या  हातात तयार फूड पार्सल दिसतात. त्यामुळे त्यांच्या  स्वयंपाक घरात उगाचच वर्दळ नसते. 
              इथे कपडे वाळत घालण्याची सोय  मात्र फारच भयानक आहे.अर्थात घरात पण स्टाँड अथवा दो-यां वर कपडे वाळत  घालता येतात . तरी पण काही HDB मधे ती बांबूवर  कपडे वाळत घालण्याची सोय धोकादायक वाटते.
            तसेच येथील लोकांच्यात स्त्रीदाक्षिण्य आहे, तसेच वरिष्ठ नागरिकांना मान देणे हे पण प्रामुख्याने दिसते. वरिष्ठांना Metro वा बस मधे जागा देणे . वगैरे शिष्टाचार ते छान  पाळतात. रस्त्यावर पण ,कोणास  जिथे जावयाची याची कल्पना नसेल, अजाण असतील व  विचारले तर योग्य  माहिती सांगण्यात मदत करतात.  आणि वस्तूंची उपलब्धता म्हटली, तर आपल्या भारतीयांच्या सर्व साधारण लागणाऱ्या नित्य उपयोगी वस्तू पण मिळतात.
          या सर्व गोष्टींचे निरीक्षण सिंगापूरातील वास्तव्यात करता आले , तसेच संस्कृती दृष्टा सिंगापूरात दरवर्षी सर्व भारतीयांचा एक कार्यक्रम  असतो .तेव्हा भारताच्या सर्व प्रादेशिक  लोकांना , त्यांच्या त्यांच्या संस्कृती व कलेचे दर्शन घडविणारा कार्यक्रम असतो.  भारतातील सर्व प्रादेशिक लोक तेथे   आपापल्या नियत केलेल्या  जागी संस्कृती ची झलक दाखवितात. आम्ही एकदा तिथे असता आपल्या MMS ने सत्यनारायण पूजा , नूतन वर्ष गुडीपाडवा बद्दल  प्रत्यक्षात   गुडी उभारून, तसेच गणपती उत्सव, दही हंडी , दसरा ,दिवाळी सणांची  पोस्टरस् लावून सण व उत्सवांचे दर्शन घडविले होते .
         त्याच कार्यक्रमाच्या वेळी माझी श्री  माधवजी भावे यांची भेट झाली. सचिनने (माझ्या मुलाने) त्यांची  ओळख करून दिली. व शब्दगंधची माहिती करून दिली. त्यांनी पण मला सविस्तर शब्दगंध दर महिन्यास दिलेल्या विषयांवर एकेकाच्या  घरी होतो. पण त्या वर्षी आम्ही सिंगापूर पहाण्यात व्यस्त असल्याने शब्दगंध ला हजर नाही राहू शकलो. पण दुस-या वर्षी  सिंगापूरात येताच मात्र ,श्री केळकरांकडे मी पहिल्यांदा शब्दगंध ला आले. मग मात्र मला नियमित  email व्दारा विषय कळू लागले . यात सांगावयाचे हे की सिंगापूर शब्दगंधने  माझ्यातील कवी मन जागे केले. तसे आम्ही भारतात विविधा ग्रूपवर  हस्तलिखित काढतो.पण दर महिन्यास विषय देऊन  सिंगापूर शब्दगंधाने माझी कल्पना शक्ती जागृत केली. आता तर असे झाले आहे की आम्ही सिंगापूर मधे आलो की आवर्जून शब्दगंध ला हजरी लावतो. सर्वांच्या  कविता ऐकून मजा तर येतेच तसेच प्रत्येकाच्या काव्य  शैलीचा आस्वाद घेता येतो.मी सिंगापूर शब्दगंधची खरच ऋणी आहे. कारण शब्दगंधनी मला त्यांच्यात समावून घेतले.
       तसेच आपले सिंगापूर महाराष्ट्र मंडळ ,मराठी संस्कृती टिकविण्यात फार सक्रिय आहे. भारता बाहेर पण आपली मराठी भाषा जीवंत ठेवण्यात
मंडळाचा भरपूर वाटा आहे.तेव्हा असे भाषा व संस्कृती प्रेमी लोक सिंगापूरात असता मराठी भाषा व संस्कृती ला नक्कीच कधीच मरण नाही.
         

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...