सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

आनंद कंद वृत्तात दु:ख

मोहरली लेखणी साहित्य समूह 
आनंद कंद वृत्तात 
विषय दु:ख

सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे.
नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे

संतोषिला मनाने,वाटे न खेद त्याला
दु:खात मोद शोधी, भासे सुखी जगाला.

मिळताच मोद जीवा, येताच सुख घराला
राही सदा खुषीने ,   आनंदिला क्षणाला.

दाटून कंठ येतो, वाटे नकोच जगणे
डोळ्यात अश्रु धारा,नित्याच झाल मरणे.


ठेवून  शांत जीवा, जाईल दु:ख सारे 
शमतील दु:ख आता, वाहेल सुखद वारे 

वाचून संत वाणी, माझे मला कळाले 
नाही जगी सुखी तो ,भय दु:ख ते पळाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...