गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

वृत्तबध्द. वृत्त आनंद कंद देव पाहिला (कविता )

देवास पाहण्याची ,होती मनात इच्छा 
 बाल्यास हासताना , पाहून पूर्ण मनीच्छा

देता भुखी जनाला, खाण्यास अन्न पाणी 
हासून पाहिलेला   होताच चक्रपाणी .

 येता नभी दिवाकर , होते नवीच ऊषा
घडते दर्शन त्याचे, देतो नव्याच आशा


फुलती कळी पहाता, गंधाळली क्षणाते.    
भरिला  सुगंध पुष्पें,  किमया दिसे मनाते


तोची असे  सुरेश,  सृष्टीत भेट घडते
सारीच जादु त्याची, दिनरात  नित्य करते.

बुधवार, २८ जानेवारी, २०२६

मी कोण कविता

मोहरली लेखणी साहित्य समूह 
विषय...मी कोण 

मी कोण असे पुसता
प्रश्न ..अस्तित्व,वा स्व ओळखीचा
मी,आहे तुमच्यातील सारस्वत
छंद जडलाय लेखणीचा

आहेत साहित्य समूह अनेक 
जतन करण्या मायबोली 
देत-घेत विचारांना चालना
रचिते रोज चार ओळी 

होते खरी तरणपटू, बेंकर 
निवृत्तीत  छंद जडला लेखणीचा 
अन् अविभाज्य स्थान तिज लाभता
मान मिळाला कवियित्रीचा


अ.भा साहित्य संमेलनी आमंत्रित 
कवि कट्टयावर सादरीकरणासाठी 
 भेटूया साता-यास आपण
सारस्वत भेटीचा आनंद घेण्यासाठी 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, २५ जानेवारी, २०२६

लेख. स्वतःला व्यक्त करणे गरजेचे आहे

विषय---  स्वतःला व्यक्त करणे गरजेचे आहे

अगदी बरोबर कथन आहे . जो पर्यंत  आपण आपले विचार मांडत नाही तोवर समोरच्यास कळणार कसे. ? आपल्या मनात काय विचार  आहेत ते. विचार  सांगणे ..बोलणे ..नीट सविस्तर  सांगणे गरजेचेच असते .सगळेच काही मन कवडे नसतात की आपल्या मनातील शब्द न् शब्द जाणून घेतील.
       घरात ठीक आहे .आपले भाव, जाणतील....भावना जाणतील . ...आपला जोडीदार  सहवासाने  आपली मते  मनाचे विचार  जाणेल .पण ते काही हद्दे पर्यंत.  मग तर शब्दांची ..वाच्यतेची गरज ही कुठेही .कुठल्या ही क्षेत्रात  असतेच.
       आपण व्यक्त झालो तरच आपला विषय ..आपली मते..आपले मार्गदर्शन 
व्यक्त होऊनच सांगू  शकतो. आपली मते पटविण्यासाठी व्यक्त होणे गरजेचे ठरते. 
हो! व्यक्तता वाचाळ ,.बडबड नसावी की ज्यामुळे समोरच्याला ऐकण्यात रस च रहाणार नाही. मुद्दे सुद व्यक्त  झाले पाहिजे. 
        यथा योग्य व्यक्त होणे.. वाच्यता करणे महत्वाचे आहे. नाहीतर वेळ टळून जाता मग बोलणे कवडी मोलाचे ठरते. आणि मग आपल्यावर रडण्याची म्हणजे,
अरे ! हे तर मला माहित  होते, पण.......  माझे बोलणे व्यक्त होणे राहिले. असे होता कामा नाही. 
         वकील डाॕक्टर यांच्या समोर तर व्यक्त होणे अत्यंत गरजेचे. न व्यक्त  होता त्यांना आजार कसा कळणार . म्हणून तर लहान बालक आजारी होतात त्यांचे डाॕ.
वेगळे असतात. कारण बालक बाळ व्यक्त होऊ शकत नाही . आणि म्हणून तर म्हणतात  की, डॉक्टर व वकील यांच्या शी नीट खरे खरे व्यक्त व्हा.  
         व्यक्त नुसते बोलूनच नाही तर सारे आपण सारस्वत  आपल्या लेखणीतून व्यक्त होतो. आपले मनीचे गुज लिखाणातून मांडतो.व आम जनते समोर व्यक्त होतो. या व्यक्ततेचे  म्हणजे स्वतः ची मते प्रदर्शित करणे आहे. याचा समाजास पण फायदा होतो. आता नाही का !कोरोना  काळात  लाॕकडाऊन काळात लिखाणातून बरेच संदेश देऊन व्यक्त झालोत. जन जागृती केली . पोलीस  संरक्षक तसेच 
परिचारिका,  डाॕक्टर,  सफाई कामगारांची स्तुती सुमने शब्दातून  उधळून लेखणी व्दारे व्यक्त झालो त.    तर व्यक्त होणे स्वतःचे  व्यक्तव्य करणे  फायदेशीर असतेच. 
    तसेच स्वतः व्यक्त झाल्याने शरीरास पण फायदेशीर  असते. मनातल्या मनात  विचाराने कुढत बसणे ..दुस-यास न सांगता गप्प रहाणे याचा मनावर पण परिणाम होतो .स्वभावावर परिणाम होतो. मनावर ताण येऊन शरीरास हानी पोहचू शकते. 
स्वातंत्र्य वीर व्यक्त झाले नसते तर स्वातंत्र्य  कसे प्राप्त झाले असते. संतांनी व्यक्त होऊन आपल्यास सुखी जीवनाची अध्यात्मक वाटचाल कशी करवली असती.
    जीवनाचे सार  गीतेचा   बोध.. जो  कृष्णाकडून  मिळाला .. तो व्यक्तच झाला नसता तर  कसा जगताला मिळाला असता. 

.....वैशाली वर्तक

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

नजर

सहज झाली नजरा नजर
अन् भरली  थेट मनात
सावरली    लाडिक बट 
भावली तुझी अदा क्षणात

लागले   जीवास वेड   
सतत तुजला   "पाहणे"
होता  जरा नजरे आड
शोधिले  भेटण्या बहाणे

 असे. नजर कटाक्ष 
प्रेमाची एक ती भाषा
भाव मनीचे उमजण्या
वसे मनात   आशा

करी नजरेने घायाळ 
खेळ चालता प्रेम रंगी
उमलती भावना हृदयी
प्रेमिकांच्या अंतरंगी

 पहाता सकाळी हरीच्या 
नजरेतले प्रेमळ भाव
 जातो दिवस सुखाचा 
कसा गेला नसे ठाव

वैशाली वर्तक 

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

ती न संपणारी कविता

शब्द रजनी साहित्य समूह 
विषय ..ती एक न संपणारी कविता 
21/1/26

आहे खरच तू अशी
सदा  चाले अविरत 
नसे ठावुक थांबणे 
धावे सदा अखंडित 

 शांत बसता उपवनी 
 पाहूनी पर्णे डोलती 
 भासती जणु मनात 
हर्षे टाळ्या वाजवती.

सवय जडली अंतरंगी 
 करु सदा शब्दाविष्कार
हर क्षणी देती उपमा
भाषेतील शब्दालंकार


 विषयाची नुरते गरज
 वेळ प्रसंग देती विषय
शब्दांना गुंफता काव्यात 
लक्षात घेतेच आशय


नाते जडले लेखणीशी 
झालेय जीवन कविता 
 करण्या तिज अजून देखणी 
राहो ती सदा प्रवाहिता

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
21/1/26

रविवार, १८ जानेवारी, २०२६

खेळ

 मोहरली लेखणी साहित्य समूह 

17/1/26

विषय.. खेळ

   


खेळ म्हणता आठवे

दिन ते बालपणीचे 

कधी सांजवेळ होता  

घरी जाणे नावडीचे


किती ते खेळ असती

 खोखो कबड्डी  लंगडी

शारीरिक ऊर्जा देई 

एकत्र होता सवंगडी


 होते शरीर सौष्ठव 

शिकवण देती खेळ

द्यावी साथ एकमेका

जमवाया हवा मेळ


पत्ते सापशिडी गोटया

असती बैठकी   खेळ 

सारे खेळ खेळण्यात

मजेत जातो ची वेळ 


जीवनात  महत्त्वाचे

स्थान असे खरोखर 

खेळ खेळत जगावे

मोद मिळे निरंतर 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

विविधा वर्धापन दिनानिमित्त

 चिरंतर राहो विविधा 


दिन असे आनंदाचा

करु साजरा मिळूनी

देउ  विविधेस शुभेच्छा

आनंदाने  काव्यातूनी



विविधा आलीय यौवनात 

भासे जणु  नव तरूणी 

नाव तिचं घेता ओठी

 शोधण्या नसे कुठेच उणी



तिचाच समूह  तो *सांगते ऐका*

व्यक्त होतात  सख्या बोलून

कल्पना शक्तीला मिळे चालना

वकृत्व गुणास  देतो उजळून 


*अभिव्यक्ती* दुजा आणिक

जिथे होते  गुणांचे दर्शन

गायन, वाचन ,संस्कृती जतन

विविध रंगी कला प्रदर्शन 


*Only विविधा मिटींग* समूह 

पहा    ते शिस्तबद्ध आयोजन 

 देतो कार्यक्रमाच्या सूचना 

 गुणगान गातात *विविधाचे* जन

 


आज  तिच्या वर्धापन दिनी 

किती गाऊ गुण गान

झालीय विख्यात अहमदाबादमधे

वैविध्यपूर्णतेत तिजला मान




वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

3/1/26


गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...