रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

धागा धागा अखंड विणूया

धागा धागा अखंड विणूया              24/2/2019

तळे जमते, थेंब थेंब पाण्याने
वस्त्रासाठी जोडावे , धागे धाग्याने

विणण्यास वस्त्र , येती धागे कामी
जरा न करता , जोडण्यात खामी

विणकर दावी , त्याची कुशलता
धागा -धाग्याने, विणता सहजता

तंतू तंतूने , विणतो कोळी जाळी
अती प्रयत्ने , तया मिळते टाळी

अवनीचे हे , अक्षांश रेखांशाचे
वाटे रेखांकन , विणले रेषांचे

काही मऊ ,रेशमी धागे प्रेमाचे
मजबूत न् , शिस्तीचे मातृत्वाचे

वस्त्र विणले ,कबीराचे रामाने
भक्तासाठी देव ही ,धावे प्रेमाने

धागे विणावे , प्रेमाचे जीवनात
जेणे मानव , जुडसी जगतात

धागा धागा प्रेमाचा विणू अखंड
सा-या विश्वात शांती नांदो उदंड

वैशाली वर्तक.

मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

राहून गेले

आयुष्य म्हणजे जीवनाचा प्रवास . जसे आपण मोठे होत जातो तसे मेंदू च्या विकासाने आपले मन इथे तिथे धावू लागते. ब-याच कल्पना आपण करीत असतो. मनांत स्वन्प रंगवित असतो. अगदी बालपणा पासून आपल्या काही ईच्छा आकांक्षा मनात तयार होत असतात . आपण त्या बालपणीच्या गोष्टी, आई वडील वा मोठ्यांकडून पूर्ण करुन घेत असतो. तेव्हा एखादी इच्छा होणे ती पूर्णत्वाला आणणे अशी क्रिया चालूच असते. जसे बालपणी पोलीस पाहून ,त्याचा दरारा , त्या वेळच्या वयास आकर्षक वाटून , मी पण शूर शिपाई होईन .वा आईने, आजीने शूर लढवैय्यांच्या सांगितलेल्या गोष्टी तून त्या वेळी बाल मनात तशा ईच्छा तयार होतात. . रेलगाडीच्या आकर्षणाने रेल्वे गाडी चालविन वगैरे वगैरे .या सा-या बाल मनातील बाल कल्पना . पण मोठे झाल्यावर क्रिकेट मॕच पाहून आपण पण sports मधे निपूणता मिळवावी. एखादा गेम शिकावा व नाव कमवावे. वा एखादी कला शिकून त्यात नाव मिळवावे . संगीत - गाणे शिकून , अगदी लता, आशा ,ऊषा नाही पण चार लोकांत , "वा छान गाते हं ,"असे उद्गार निघतील इतपत गाणे शिकावे . तर गाणे शिकणे अशी गोष्ट इच्छा मनात येते. आपल्या वेळी सध्या सारखे मुलांना विविध classes ला घालण्याचे वेड नव्हते , पण लहान /मोठे class मधे आई वडील पाठवायचे. तर प्रत्येकाच्या मनात कांही ना काही गोष्ट असतेच .तसे च मोठे झाले की एखादा छोटा व्यवसाय करावा तसेच विदेश प्रवास करावा. अरे हो! ..आता तर प्रवास ही गोष्ट पण सहज शक्य होत आहे .त्यामुळे , एखादी गोष्ट राहून .........गेली असे कमीच दिसते. कारण सध्या वरिष्ठ नागरिक सधन म्हणा वा आर्थिक दृष्टीने स्वतंत्र आहे वा परावलंबी नाहीत. मला पण बहुतांशी गोष्टी मिळाल्या तशी मी समाधानी वृत्तीचीच आहे हं. हो ! खरच सांंगते .आजीची बालपणाची शिकवणच तशी. तर ,त्यामुळे म्हणा वा इच्छाच कमी आहेत म्हणा. आणि आता वाढत्या वयाला आकांक्षा पण कमी होतात. तरी आजकालच्या युगाकडे पहाता "वेहीकल चालविणे" राहून गेले. असे म्हणायला हरकत नाही, त्याच काय आहे .पहिली गोष्ट ,अगदी बालमंदीरा पासून ते शाळे पर्यत सर्वच ठिकाणे घराच्या दोन मीनीट अंतरावर .त्यामुळे सायकलची पण गरज भासायची नाही. कारण सायकल पहिले वाहन शिकण्याचे. पुढे काॕलेजमधे गेले तर बस स्थानक घराच्या 2/4 मिनीटाच्या अंतरावर . तिथे पण वेहीकलची गरज भासली नाही .पोहणे मात्र शिकले,.. ....अगदी निपुणता मिळविली .थेट नॕशनल लेव्हल पर्यंत पोहचले .व अजुन ही या वयात पण वरिष्ठ नागरिक मधे सुवर्ण पदक नॕशनल लेव्हलला मिळवत आहे. पण तो swimming pool तेव्हा घरापासून सहज खेळत जाऊ येऊ शकेल अशा अंतरावर . पुढे , बँकेत सर्वीस लागली. ती पण इतकी जवळ की आई ने फोडणी घातली तर घमघमाट बँकेत पोहचायचा. ...इतकी जवळ. तेव्हा सांगायचे हे की, घराच्या आजुबाजुलाच माझा सतत वावर राहिला .त्या मुळे वेहीकल शिकणे जरुरी भासले नाही .त ssसे नाही म्हणायला भावाकडून सायकल शिकण्याचा प्रयत्न केला .पण दोन्ही गुडघे घासले गेले त्यावर मलम पट्टीत करणे व swimming ला न जाणे. घरी रहाणे हे शक्य नव्हते. कारण swimming competition सतत असत. त्या साठी पोहणे रोजचे करावे लागे. शेवटी सायकल शिकणे लांबले. ते इतके लांबले की , .....राहूनच गेले. त्यामुळे सायकल नाही म्हणजे balancing करणे जे दुचाकी वेहीकल ला जमलेच पाहिजे. ते आलेच नाही. कारण एकदा का व्यवस्थित balancing आले तर मग two wheeler वाहन चालविण्यास पटकन जमते .पण तेही नाही . तरी देखील मुलीने मोठे पणी टू व्हिलर शिकविली .रात्री घराजवळच्या ओपन मैदानात नेऊन शिकविण्याचा प्रयत्न केला .व मी शिकले पण . नाही म्हणायला 3/4दा जवळच्या दुकानात वस्तू आणावयास गेले .पण समोरून वहान येताच जीव घाबरायचा . भिती वाटायची. त्यामुळे भर रहदारीत स्कूटी चालविणे शक्यच झाले नाही. त्यामुळे टू व्हीलर चालविली नाही. तसेच मिस्टरांनी फियाट घेतली तर शिकविण्याचा प्रयत्न केला. चांगले 7/8 दिवस जात होतो. जातांना हे दहा वेळा clutch break एक्सलेटर चे सांगून ही चूक व्हायचीच. तसेच करत ५/६ दिवस गेले मी गाडी चालवायला. एकदा तर भर रहदारीत सर्व रहदारी माझ्या मुळे आडली . लोक horn देत होती.. मला काहीच सुचेना .मी गाडी कशी सुरु करु समजेना. लाजून खाली उतरले व मिस्टरांना म्हटले तुम्ही च पहा मला जमतच नाही. त्यावर त्यांची बोलणी तर खाल्ली च.... पण तोवर लोक ओरडत होती, ते वेगळच ... ती बोलत होती, " ओ ताई काय येत नाही आणि निघाल्या गाडी चालवायला. आम्हाला उशीर होतोय .या बायकांना काय ? उचलतात वेहीकल निघाल्या . उगाचच खोटा हव्यास .ओ ! ताई किती खोळंबा करताय " मी गांगरून गेले. त्यानंतर दुस-या दिवशी नीट गाडी चालवित घरा पर्यंत आले. ..university च्या मैदानावर मी आठचा आकडा चालविला . ब्रीजवरुन पण न घाबरत गाडी चालविली .व आता घरा जवळ आले. .. तर मेन गेट मधे आत शिरणार तर गेटशी पुरूष मंडळी गप्पा मारत उभी होती. त्यातून ओळखीचे पहात आहेत हे पाहून अजून बावरले . आधीच confidence नाही , घाबरत वळवून गाडी आत तर घेतली ... पण बाजूला उभ्या असलेल्या गाडीस ठोकून दिले. बरे कोणा लोकांना ठोकर दिली नाही पण बाजूला उभी असलेल्या गाडीचा व माझ्या गाडीच्या अंतराचा माझा अंदाज चुकला . व त्या गाडीला टक्कर दिली .... झाले....त्याच्या व आमच्या गाडीला खर्चाची भर झाली . तरी .मग गाडी दुरुस्त होऊन येऊ दे .मग चालवू .पण, मग .... ते ..मगच... राहिले .पुन्हा काही गाडी चालविण्याची हिंमत केली नाही. त्या मुळे गाडी शिकण्याची ईच्छा तेथेच राहिली. त्यामुळे गाडी वा टूव्हीलर चालविलेच नाही असे नाही .पण सध्याच्या बायका कशा बिनधास्त वाहन चालवितात. मुलांना सोडायला वा भिशीला कशा ऐटीत गाड्या घेऊन जातात, अथवा कधी नवरा म्हणतो बायकोला ,"आज तूच गाडी चालव .मी बसतो आरामात ."असे सुख मी त्यांना कधी च दिले नाही. अथवा आमची " ही गाडी घेउन आली होती मला सोडायला. "असे यांनी माझ्यासाठी काढलेले शब्द ऐकायला मला कधीच मिळाले नाहीत . उलट एवढी swimmer पण वेहीकल कसे चालवण्यास नाही शिकली हे मात्र वारंवार ऐकण्यास मिळाले. पण खर सांगू मला त्यात जराही वावगे वाटले नाही. कदाचित भिती वा आवड कमी दोन्ही कारणे असावीत . तरी पण काही ही म्हणा, वाहन स्वतंत्र बिनधास्त चालविणे.... राहूनच गेले. हे मात्र खर . .बर आहे माझ्या मुलांना आताच्या मुलांप्रमाणे आई गाडी चालविते वा आईने गाडी चालवावी असे तेव्हा फार कौतुक नव्हते. हल्ली, आपल्या नातवंडाना आईने गाडी चालविणे आवडीचे ,कौतुकाचे वाटते. काळा काळातील फरक दुसरे काय! आता माझे तरी या जन्मी तरी शक्य नाही.. "वेहीकल चालविणे" ही गोष्ट राहिलीच वैशाली वर्तक ( अहमदाबाद )

गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१९

मी तिरंगा बोलतोय/ गीत तिरंगा


                मी तिरंगा बोलतोय                        28/1/2019
यावर्षी आमच्या सोसायटीच्या ध्वज वंदनासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविले होते. सोसायटी ची सेक्रेटरी नात्याने मी राष्ट्रध्वज नीट स्वच्छ आहे का नाही ? व्यवस्थित इस्त्री आहे की नाही ? या सर्व गोष्टींची जातीने तपासणी केली.तसेच त्याची दोरी नीट आहेना वगैरे गोष्टी ची काळजी पूर्वक पहाणी करून खात्री करून घेतली. तसेच ध्वज वंदनाची जागा स्वच्छ आहे ना , याची पण खबरदारी घेउन मगच रात्री झोपण्यास गेले. आज दिवसा , चार रस्त्यावर बरीच लहान मुले पैसे कमविण्यासाठी तिरंगे विकत होती . बरेच जण त्यांना मदत, या हेतूने पण तिरंगा विकत घेत होते. दिवस भरात ध्वजाची केलेली तयारी व रस्त्यावर ध्वज विकणारी बालके माझ्या डोळ्यासमोर आलीत व त्याच विचार तंद्रीत मी झोपी गेले . म्हणतात ना मनीं वसे ते स्वन्पनी दिसे . मला नीट घडी केलेला, ध्वज स्वन्पनात आला. व सांगू लागला . व माझ्याशी बोलू लागला .," वा छान हं .! माझी छान काळजी घेतलीस. आता सकाळी राष्ट्र प्रेम जागृती ने सकाळी वेळेत ध्वज वंदन तुम्ही सारे कराल. प्रेमाने तयात फूले ,फूलांच्या पाकळ्या ठेवून मला मानाने वर चढवाल व मला हवेत फडकवाल .एक साथ सलामी द्याल व नंतर शिस्तबद्ध राष्ट्र गीत म्हणून एका सुरात "जयहिंद " चा जयघोष करून मला वंदन, सलामी द्याल .खर सांगू मला पण नभात फडकतांना खूप अभिमान , आनंद वाटतो. संध्याकाळी सूर्यास्ताला मला मानाने राष्ट्र प्रेमाने उतरवितात छान वाटते. पण या सा-या बरोबर मला काही विचार आले ते सांगतो. रस्त्यावर विकले जाणारे झेंडे 2/3 दिवसांनी रस्त्याच्या कडेला , इव्हन घरात मुलांकडून कच-यात पडलेले दिसतात .तसे होऊ देवू नका. एक तर plastic चे वा कागदाचे ध्वज बनवू नका. त्यास पायदळी येणार नाही याची काळजी घ्या. मी पायदळी येणे यात आपल्या देशाचा अपमान आहे. तसेच ध्वज वंदनाचे काही नियम आहेत. त्याचे पालन करा. केव्हा ,कुठे -कुठे रोजच फडकवायचा याचे ही नियम आहेत ते जाणून घ्या. तसेच ध्वजात जे तीन रंग आहेत ते प्रत्येक रंग काय दर्शवितात .ते सर्वांना माहित च आहे . वरचा रंग केसरी / भगवा .हा रंग त्यागाचा. पण खंत वाटते सध्या त्याग राहिला बाजुला .जो तो आपल्या पोळीवर तूप कसे पडेल यातच मशगूल आहे. जरा विचार करा. कुठे गेले ते शहीद लोक .? ज्यांच्यात देशासाठी त्यागाची भावना होती. ज्यांनी प्राणांचे बलिदान करुन स्वातंत्र्य प्राप्ती साठी स्वतःच्या घरादाराची रांगोळी करून प्राण अर्पीले ..प्राण वेचले. आज त्या त्यागाची भावना दिसत च नाही. नुसते आपला स्वार्थ पहात आहेत. ज्यांनी बलिदान केले त्या व्यक्तींना आठवा. त्यांचा त्याग मनीं स्मरा. देशासाठी माझ्या तील केसरी रंगाचे स्मरण करा व तो काय सांगतो दर्शवितो याचा विचार करा. दुसरा रंग पांढरा / सफेद . शांतीचा. जो शांतिचे प्रतिक दाखवितो. पण सध्या तर जो तो उठतो दंगे , जातिवरून दंगे. आपण सारे पाढरा रंग शांतीचे प्रतिक विसरलाच आहात .सरकार विरूद्ध दंगे करुन, जाळपोळ करणे .सरकारी मालमत्तेचे नुकसान म्हणजे आपलेच नुकसान हे न समजता दंगे आतंकवाद वाढतच आहेत. तिसारा रंग हिरवा ..हिरवा रंग समृद्धी चा. भारत देश कृषीप्रधान देश आहे. त्याची समृध्दी जतन करणे आपले कर्तव्य आहे. भारतात ६ऋतु दिसतात पण निसर्ग पण कधी कधी कोपतो. सध्या निसर्गाचा कोप वाढत चालला आहे. कारण विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानव निसर्गाच्या विरूद्ध जात आहे. जंगले उद्ध्वस्त करून वनश्रीचा नाश करुन, सिमेंट ची जंगले तयार करीत आहे .झाडे मातीतून पाणी शोषून पानांच्या द्वारे बाष्प रुपाने ढगात रुपांतर करतात. जे ढग पाऊस पाडण्यास मदत रुप होतात .पण झाडे कापल्याने ही क्रिया मंदावत आहे. पर्यावरणाचे संतुलन बिधडत आहे. व कमी पावसाने पाण्याची कमतरता भासतेय व हिरवी डौलणारी शेते नीट पीक देत नाही व तेव्हा या "हिरव्या" समृद्धी च्या रंगाची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे. पाण्याचा पण दुरुपयोग टाळला पाहिजे. पर्यावरण ची खंत बाळगली पाहिजे. माझ्या वर मधोमध अशोकचक्र आहे.त्यास २४ दाते आहेत. ते चक्र दर्शवते अविरत काम करा . पण सध्यातर जरा महागाई वाढली वा सवलत हवी असेल तर व सरकारने मान्य केली नाही. की, लगेच "संप" पुकारला जात आहे ."बंद"ची घोषणा ,ऐलान देऊन प्रोडकशन मधे व्यत्यय आणणे, सहजतेने अनुसरले जाते . देशाच्या उत्पादनाची जवाबदारी लक्षातच घेत नाहीत तेव्हा नुसते १५ आॕगस्ट व २६ जानेवारीला मला उत्सहाने लहरविण्यात फडकविण्यात आनंद न मानता .माझ्या या सर्व तीन रंगाचा विचार करा. या ध्वजाची मान, शान ठेवणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नुसत्या प्रतिज्ञांचे वाचन न करता त्या आंमलात पण आणा. " तेवढ्यात गजर झाला .मी लगबगीने उठले .जागी झाले .मला कळलेच नाही .स्वन्पातून जागे झाले. खरच स्वप्नात तिरंगा केवढे सांगून गेला. मी पण त्याच्या बोलण्याने भारावून गेले.! ..........वैशाली वर्तक ( अहमदाबाद)



सावली प्रकाशन समूह 

गीत तिरंगा

विषय -- तिरंगा



...तिरंगा


पहा   फडकतो तिरंगा नील गगनी 

 वाटे अभिमान तो मजला क्षणो क्षणी 

        

  तीन रंगात पहा ,भाव दावितो शुध्द

  हिरवा दावी देश ,आहे सदा समृध्द

  भगव्यात त्यागाची, भावना सांगे मनी

 वाटे अभिमान तो, मजला  क्षणोक्षणी      1


पाहून तिरंग्यास ,उर  येतो भरुनी

क्रांती वीर लढले, तया कवटाळूनी

हुत्म्यास पांघरता  , दुःख दाटते मनी

वाटेअभिमान तो, मजला  क्षणोक्षणी           2


शान तिरंग्याची ती , मोद देई मनाला

श्वेत रंग संदेश  , शांतीचा जगाला

कार्यरत रहाण्या, सांगे  तो चक्रातूनी

वाटे अभिमान तो , मजला क्षणो क्षणी           3


सदा राखूया मान, आपुल्या तिरंग्याचा 

नाही होऊ देणार अवमान कधी त्याचा

राहिल फडकत ,अखंडित गगनी

वाटे अभिमान तो, मजला क्षणोक्षणी             4


वैशाली वर्तक






मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

शेतकरी राजा

काव्यांजली   स्पर्धेसाठी
- शेतकरी राजा                                         5/2/2019

   बळीराजा माझा
पडता  मृगाचे  पाणी
   बीजांकुर पाहूनी
       आनंदितो.

  अन्नदाता म्हणोनि
नमन  करितो  तुजला
     पोषितो मजला
        तवकृपे

         मातीचा मित्र
  रमतो  काळ्या  मातीत
       पिकवण्या शेत
           जनासाठी.

          शेतकरी राजा
  तुजला  पोशिंद्याचा  मान
        देशाची   शान
          राखतोसी

         करुनी काबाडकष्ट
    काळ्या  मातीला   सजवितो
           मोती पिकवितो
                 शिवारी

         सदा कर्जदार
   आणितो बीज बियाण
         लागते  ग्रहण
            सुगीदिनी

         वैशाली वर्तक
        
          
   

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

मन तुझ्यात गुंतले

विषय- मन तुझ्यात गुंतले            2/2/2019

सहज झाली नजरा नजर
अन् भरली  थेट मनात
सावरली  तिने  लाडिक बट   
भावली तिची अदा क्षणात

लागले   जीवास वेड     
सतत तिजला   "पाहणे"
होता  जरा नजरे आड
शोधिले  भेटण्या बहाणे 

योगायोगे आली सामोरी
भेट घडली अवचित
निरुत्तर उभी ठाकली
न उमजे बोलणे कदाचित

साधिला मुक संवाद
नजर  कटाक्षांनी क्षणिक     
 कळले  न ,  माझेच मला
कधी?कसा? झालो भावनिक

होता देवाण - घेवाण
शब्दांची अमुच्यात चार
ठरले भेटण्याचे ठिकाण
मन झाले आगतिक फार

सहज घडलेली भेट                         
अजुनी ही स्मरते  मनीं   
 "मन तुझ्यात गुंतले   "                         
कळले मज त्याच क्षणी .


          वैशाली वर्तक (अहमदाबाद )
तिच कविता थोडे बदल करुन
यारिया साहित्य  समुह

**भेट तुझी माझी**


सहज झाली नजरा नजर
अन् भरली  थेट मनात
सावरली    लाडिक बट 
भावली तुझी अदा क्षणात

लागले   जीवास वेड   
सतत तुजला   "पाहणे"
होता  जरा नजरे आड
शोधिले  भेटण्या बहाणे

योगायोगे आलीस सामोरी
भेट घडली अवचित
निरुत्तर  तू उभी ठाकली
न उमजे बोलणे कदाचित

साधिला मुक संवाद
नजर  कटाक्षांनी क्षणिक   
 कळले  न ,  माझेच मला
कधी?कसे? झालो भावनिक

होता देवाण - घेवाण
शब्दांची अपुल्यात चार
ठरले भेटण्याचे ठिकाण
मन झाले आगतिक फार

भेट तुझी अन् माझी                 
अजुनी ही स्मरते  मनीं 
मन  आपुले  गुंतले                         
कळले दोघां त्याच क्षणी .

          वैशाली वर्तक (अहमदाबाद )


सोमवार, ७ जानेवारी, २०१९

स्पर्धेतील चारोळ्या

स्पर्धेसाठी..... विषय--- पितृपक्ष
असते ऋण पितरांचे आपणांवरी
करण्या परत फेड तयांच्या ऋणाची
अन् दिलेल्या भरभरुन आशीषांची
परंपरा चालत आलीय पितृपक्षाची. .
..वैशाली वर्तक (अहमदाबाद ).

चित्र चारोळीं ---
मेघांनी भरलय अंबर
संथ वाहे निर्मल सरिता
घेऊन तव हात करी
रचूया जीवन कविता ...
वैशाली वर्तक

साहित्य मांदियाळी क्र 91
विषय-- सलाम वर्दीला
अजून स्मरते ती काळ रात्र
निष्पाप जनतेचे गेले प्राण
आनंदाने स्वीकारून वीर मरण
जवानांनी राखली वर्दीची शान .....
वैशाली वर्तक.

स्पर्धेसाठी चारोळीः-
साहित्य मांदियाळी स्पर्धा क्र 92

कर्ता तोचि संविधानाचा
दलित जीवनाचे केले नंदनवन
भारतरत्न चा मिळाला मान
करूया तयांना मानाचे वंदन ...
..वैशाली वर्तक

स्पर्धे साठी चारोळी
मनस्पर्शी विषय ः--ंसंकल्प
मनीं गर्दी जमली विचारांची
लागता नववर्षाची चाहूल
कोणता बरे करावा संकल्प
विचारातच टाकले नव वर्षात पाऊल
वैशाली वर्तक (अहमदाबाद)

चित्र चारोळी स्पर्धा क्र.९३ स्पर्धेसाठी
चारोळीः-
- दोन हात भासती वृक्षासम
पाना फूलांनी झाड आले मोहरून
पक्षी विसावले निवांत तयावर
रुप दिसे वसुंधरेचे बहरून ...
.वैशाली वर्तक (अहमदाबाद)

सडे घातले केशराचे नभांगणी
सोनेरी किरणांनी वृक्षे न्हाली
रवी किरणात प्राची उजळली
सुप्रभात म्हणण्याची वेळ झाली

निरोप देत  गतवर्षाला
आतुर सारे आगमनाला
नवीन करुनीया संकल्प
ध्यानात घेऊनी उत्कर्षाला

स्वन्पातील नववर्ष

स्पर्धेसाठी
विषय ः- स्वप्नातील नववर्ष

नववर्ष स्वन्प माझे
रंगविले होते मनांत
कितपत पाहू होते
साकार ते प्रत्यक्षात

      स्वच्छ असेल सुंदर
        देश भारत महान
       समानता ही नांदेल
      नसता कोणी लहान

कळ्यां कधी न खुडता
हाती तयांच्या लेखणी
होई मुलगी साक्षर
सावित्री रूपे देखणी

         वृक्षारोपणाचा नारा
         गाजवूया या जगती
         पृथ्वी पाहू नटलेली
          भासे जणू रूपवती

किण किणली ती घंटा
जागे झाले स्वन्पातूनी
नाद आला मंद कानी
रम्य ते स्वन्प पाहूनी.

वैशाली वर्तक

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...