सोमवार, ११ जानेवारी, २०२१

मोबाईल शाप की वरदान

मोबाईल शाप की वरदान

      अरे  ! काय हा त्रास ... दोन घास सुखाने  खाऊ पण देत नाही. आताच्या आता 
तीस-यांदा जेवतांना उठत आहे. 
 हं हलो ....कोण ..good after noon ...
..हा s हा 
क्या काम  है बोलो....
कौनसी बँक  ...अरे बाबा नही नही ...काही  investment नाही करायची
आधीच पेंनशनर .
फोन कट करुन टाकला.
 ह्या फोनचा मोबाईलचा कंटाळ आला.उठ सुट .. नव्या स्कीम  वा आणखीन  काही ..
   कुठून मिळतात यांना नं . 
     अशी स्थिती झालीय या मोबाईलची. 
तेवढ्यात मैत्रिणी चा फोन आला .... घेतला व इतक्या गप्पा रंगल्या ... ब-याच नव्या 
खुशखबरी कळल्या .. रविवारी कुठे भेटायचे  ते ठरले. मान वाकडी करत व  खांद्याच्या आधाराने बेसनशी जाऊन तोंड धूवून तोंड साफ केले. मग जरा आडवी होते तर आईचा फोन मग काय ....माहेरच घरी आल वा माहेरात गेल्याचा आनंद मिळवत   ....दहादा उठून बसत ...एकदा या हातात तर एकदा त्या हातात करत फोन चालूच  ..तेव्हा जराही कंटाळा नाही ...तर असे आहे या मोबाईलचे.
           तस पाहिले तर कामाचा ....वरदान रूपच आहे. घर बसल्या whatsapp
 मधून थेट हजारो मैल दूर असलेल्या लेकी सुनांच्या थेट कीचन मधे जाऊन येतो. आपण  तर  मघेच छोट्या नातवंडाचे खेळ ..प्रगती.. त्यांचे सोहळे.. सर्व  कार्यक्रम  घर बसल्या पाहू शकतो. त्यामुळे आप्तजन कितीही दूर असले तरी सहज  मनी येईल तेव्हा भेट घेऊ शकतो. मग वरदानच आहे ना!
    या लाॕकडाऊनच्या काळात तर मेंदी लावणे पासूनसारे..  सारे लग्न विधी हजारो मैल दूरच्या कार्यक्रमात   लोक सहभागी  झालेत व आनंद लुटला. 
  आपणही  साहित्यिकांनी  किती कार्यक्रम  प्रत्यक्ष  सहभागी  झाल्या सारखे  अनुभवले. व सहभागी  झालो. 
      आता मोबाईल  शाप वाटणे कधी तरी शक्य आहे ... पण ...जशी चांगली  बाजु तशी वाईट असतेच ना. मुले सतत त्यावर गेम खेळतात... ज्या मुळे डोळ्यास विकार ...मैदानी खेळ न खेळल्याने शरीरास कसरत नाही  व शाररिक  हानी...
माणुस सतत मोबाईल मधे व्यस्त त्यामुळे  घरात , बाहेर संवाद साधत नाहीत..  एकल कोंडा बनत आहे. ...आई बाबांशी बोलण्यात वेळ न देणे... 
     या सा-या वाईट बाजु नक्कीच  ...पण देवने मेंदु बहाल केला आहे तर किती मोबाईल वापराचा याचा विचार  पण केलाच पाहिजे ,....मुलांना शिस्त ता लावली पाहिजे.. 
    आपण रोग बरे करण्यास औषधे घेतो. तेव्हा डाॕ. औषधे देतात त्या औषधांनी आपण बरे होतो. तेव्हा त्या औषधात , काही औषधे फार  strong असल्याने डाॕ  त्या औषधांचा side effect नको म्हणून जोडीस दुसरे औषध देतातच ना.! तेव्हा औषध  किती strong तरी  घेतोच ना  का औषध टाळतो. 
     तसे आहे .... चांगल्या बरोबर  काय वाईट याचा विचार  करतच मोबाईलचा वापर केला तर   वरदानच ठरेल


वैशाली वर्तक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...