शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

आयुष्याची संध्याकाळ लेख

अ भा म सा प स्वप्न गंध  समूह 
स्फूट लेखन  स्पर्धेसाठी
विषय -- आयुष्याची संध्याकाळ
                       शीर्षक --   *आनंदकाळ*
      संध्याकाळ  होता ओढ लागते  आपापल्या आप्तजनांना भेटण्याची...दिवस भराच्या घडामोडी एकमेकांना  सांगण्याची...घरकुलाकडे जाण्याची.. 
        तसेच *आयुष्याची  संध्याकाळ* पण सुखदायी होते. आयुष्यभर  धावपळीत ... कधी कुटुंबाच्या तर कधी स्वतःच्या  स्वप्नपूर्तीसाठी महेनत करुन जीवन व्यतीत केलेले असते. तयात कितीकदा स्वतःच्या  आवडी निवडींना मुरड  पण घालावी लागली असते.. पण,...   आता या जीवनाच्या सध्यांकाळी जवाबदा-या थोड्याफार कमी झाल्याने..... आपण आपल्या मनासारखे जीवन जगण्यास , ही संध्याकाळ  फार सुखदायी ..उचित असते . जे सुख वेळे अभावी ......स्वतःच्या  मुलांच्या बालक्रिडा  , बाल लीला पाहण्याचा ....त्याच्यात रमण्याचा  आनंद उपभोगण्यात उणीव राहिली असते ... ते सारे  सुख आता  नातवंडात  पाहून जीवन आनंदमय होते. आणि.....  महत्त्वाचे ...ही सुंदर  देवाने निर्मीलेली सृष्टी .....तिचे रूप  न्याहळणे.....पर्यटन करून ...सहजीवनाचा आनंद उपभोगण्याचा .....हा   काळ . तसेच  ज्या समाजात  आपण रहातो.. त्याचे पण ऋण  असतेच  ना !  तर जमेल तशी समाज सेवा... लोकांना मदत रुप होणे..  आत्म चिंतन करणे  या सर्वाचा काळ म्हणजे जीवनाची संध्याकाळ . 
   ...... वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...