जगाचा पोशिंदा साहित्य समूह आयोजित
काव्यलेखन उपक्रम
दि २७\७\२६
विषय ...झाले गेले विसरून जावे
शीर्षक..
झाले गेले होऊन गेले
नको मनी तयांच्या साठवणी
जगुया दिन आजचा आनंदाने
कालच्या दुःखाची नको उजळणी.
करा मनाची स्वच्छ पाटी
जाणा मोठ्या मनाची महती,
कोणी दिले , कोणी नाही
याची विसरा आता गणती.
नका करु मन संकुचित
मिळता कधी चिमूटभर ,
मन हवे सदा समाधानी
मिळेल उद्याला मुठभर
कालची गोष्ट आज विसरा
नव्याने उजळली, ऊषा आता
दावील ती नव्या दिशा
कशास हव्या कालच्या बाता.
झाले गेले गंगेला मिळाले
असे वदती वडील धारी
आहे तेची खरे जीवनी
सुबोध त्यांचा असेची भारी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
८१४१४२७४३०
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा