मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित
काव्य लेखन
विषय .. मौन
मौन पाळणे उत्तम
वाद होतात स्थगित
पण सर्वच ठिकाणी
नसे योग्य सदोदित
जेथे निषेध दाखविणे
असते अगदी उचित
विनयाने बोलून पहा
काम होते ची खचित
गांधीजीनी बनविले
होते ना एक खेळणे
मौन धरावे सदैव
हेच तयांचे सांगणे
मौनात असते शक्ती
नको सदा दुराग्रह
रहा जरा वेळ शांत
साध्य कामास आग्रह
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा