गुरुवार, २७ मार्च, २०२५

आठवण (बालपणीचा काळ)

                     आठवण
अजुन आहे स्मरणात, ते दिन  बालपणीचे
कसे जड़लो घडलो , आजच्या या मितीचे.

अचूक वेळ सांगणे, आठवते ते आजीचे
बिनकाट्यांचे घड्याळ ,होते तिचे उन्हाचे.

जीभेवर रेंगाळतेय ती चव , पोळीच्या लाडूची
अन खमंग त्या  कुरमु-याच्या  चिवडया ची.

गुळ पोळीची सात्विक गुंडाळी ,असे न्याहरिला
मागे टाकेल चवीत, सध्याच्या  या फ्र्ँकीला.

पत्ते,लगोरी डाव ,रंगले असत दिवसभर
मोबाईल्स् गेम्सना, कधीच येणार नाही ती सर,

सांजवेळी म्हटली जाई ,घरात शुभंकरोती
तर आता,वेळ सुरु होते , टिव्हीच्या मालिकेंची

मातीनी ,गेरूनी बनविलेले ओटे न् किल्ले
नव्हते सर्वत्र चायनीजचे लाईटींगचे जाळे.

घरोघरी मित्रांसवे , चाले दिवाळीचे फराळ
अभ्यंग स्नाना वेळी, वाजवायचे फटाके बार

आता राहिल्या,नुसत्या आठवणी
"ती" मजाच न उरली , "त्या" काळाची.
 असे म्हणत फक्त, आठवण काढायची
गत काळाची , अन् जुन्या दिवसांची.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...