गुरुवार, १७ जुलै, २०२५

कल्पना विस्तार

उपक्रम 
विश्व लेखकांचे साहित्य मंच महाराष्ट्र आयोजित उपक्रम 
दि १६ व १७ जूलै २०२५
कल्पना विस्तार 
विषय.....एखाद्या खोटे बोलणे लगेच समोरच्या व्यक्तीला समजले असते तर?


   खोटे बोलणे ही मनाला जडलेली सवय असते.  वेळीच नाही सुधरवली तर, मग ती सवय अंगवळणी पडत जाते.  इतकी सहजतेने स्विकारली जाते की त्यात त्याला काही वावगे वाटत नाही.
असेच झाले एकदा.  कमलाबाई खोटे  बोलण्याची सवय होती उद्देश काही नसायचा, फुशारकी वा थापा मारणे. त्यांचे खोटे कसे उघडकीस आले पहा.
         विजया व मंजू मैत्रिणी... रहायला जवळ जवळ होत्या. दोघी बराच वेळ गप्पा मारत सोसायटीच्या बाकावर बसल्या होत्या. कमलाबाई तेथूनच पसार होता होता जरा थांबली. दोघी च्या रंगलेल्या गप्पात उगीचच मधे मधे करू लागली. 
आणि सांगू लागली की  सोसायटीत सुंदर गाण्याचा कार्यक्रम  होणार आहे. मला त्यात
 कदाचित निवेदन करण्यास सांगितलं . 
       अगदी खोटी बातमी, पण ती स्वतः चेच खरे पटवून देत राहिली. तिला काय माहित नव्हते , की विजया कमीटीत आहे. तिला सोसायटीच्या सर्व कार्यक्रमाची
तपशील वार माहिती असते. पण माहित नसताना, खोटे बोलणे अंगवळणी पडलेले 
. आणि विजया कमीटीत आहे याची जाणीव नसता सवयीप्रमाणे खोटं बोलली.
          पण  मंजुला कमलची  सवय माहित होती. तिने विजया कमीटीतील सदस्या आहे . तर तुझे खोटे बोलणे उघडकीस आले. आता तरी उगाचच थापा मारणे. सोड.
 सहजच कमलबाई वरमली. व मी जाते ग! मला काम आहे म्हणत निघून गेली.
  खोटे बोलण्याची फजिती झाली.

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...