मंगळवार, १५ जुलै, २०२५

सहा शब्दांची कथा

विश्व लेखकांचे साहित्य मंच महाराष्ट्र आयोजित उपक्रम 
दि १४\७\२५
उपक्रमाचे नाव. ...सहज शब्दांची कथा लेखन उपक्रम 
विषय..

संवाद....   माझा चेहरा पाहूनच, संवादाची गरजच  नुरली.

संधी. ..  .    एकदा हाती आलेली संधी ,  सोन्यासम असते

वादळ...  मी पाऊल टाकले ,वादळापूर्वीची शांतता जाणवली.

रात्र.  ...  पहिल्या रात्रीतच  नव ‌दांपत्यांचे सहजीवन संपले.

किमया.   मृगवर्षाची किमयाच  अशी, अवनीची  कायाच बदलली.

ओळख...  उत्तम व्यक्तिमत्व  हीच पंतप्रधानांची  ओळख ठरली.
                

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...