रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

मी अजून हरलो नाही

स्वराज्य लेखणी मंच
आयोजित स्पर्धा
स्पर्धेसाठी
विषय.  मी अजून  हरलो नाही 


जीवन तरआहेच
तीन अंकांचा खेळ .
कसे जगावे त्यात आनंदाने
 जमवावा लागे मेळ

 संघर्षा शिवाय नसे जीवन
अन् तेव्हाच होते प्रगती 
महेनत करण्याची जिद्द मनी
जाणतो साधनेची महती

घेतो शिकवण निसर्गाची
कसा हसतोय तोही संघर्ष
करीतो सदैव यत्न
साधण्या जीवनी उत्कर्ष

मिळो यश अपयश
हार कधी नाही मानत
अपयश पायरी यशाची
हेच विचार मनी ठसवत

शिकवण साध्या कोळ्याची
कितीदा पडुन न हरतो
तसा मीही न करीता कसूर
आत्मविश्वासाने यत्न करतो

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...