गुरुवार, २६ जून, २०२५

आला आषाढ महिना ... ऋतू हिरवा

सिद्ध साहित्यिक समूह आयोजित उपक्रम 
उपक्रम क्रमांक 596
विषय ...आषाढ महिना 
     
येता मृगाची ती सर
खुश होई  बळी  मन
मनी आतूर चातक    
आनंदती  सारे जन

येता महिना आषाढ 
सुरू पावसाच्या सरी
तृणपाती  डौलताना
मोद वाटे जन ऊरी.

 
बरसता जलधारा 
काम बळीला शिवारी 
लगबग पेरणीची 
आस वारीचीही भारी

देव्हाऱ्यात पाही विठू
मुखी विठ्ठल गजर
विठु भरला हृदयी 
 मनी  वारीत हजर


पाहताच  कृष्ण मेघ. 
कवी मनात कविता 
चिंब मन पावसात
शब्द  ओंजळी भरिता

 
असा आषाढ महिना 
कवी ,भक्त ,शेतकरी 
सारे  व्यस्त कामातून
आपापल्या घरोघरी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद.

साहित्य तेज पेपरात १५|९|२५

शीर्षक...ऋतू हिरवा*

झाली मृगाची बरसात
तप्त  अवनी तृप्त जाहली
दरवळला मृद्गंध आसमंती
वृक्ष  लता फोफावली


गरजत बरसत या मेघांनो
नको नुसती गर्दी गगनात
गडगड करित बरसा रे
पेरणीची झाली वेळ शिवारात


वाहतील झरे खळखळ
भासतील शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस ते निसर्गाचे
गीत गाईल थंड मंद वारा


 बळीराजा खुश होईल
 काम करेल  शिवारी
 स्वप्न रंगवेल मनी
 गोड लागेल भाकरी


वाहता जल कडे कपारीतून
होईल रंग     धरेचा हिरवा
रानमाळ डोंगर सजतील
करु साजरा   ऋतू बरवा

झाकोळते आकाश मेघांनी
 भासे  भर दिवसा  सांज
जल बरसूनी जाता पुन्हा 
दर्शन देतात रवी राज


बरसला घन निळा 
 वाटे समाधान मना
दूर केली मरगळ सृष्टीची
सृजनता दिसे क्षणा


वैशाली वर्तक 
अहमदाबाद



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...