शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५

अष्टाक्षरी...पांघरुण

नीजेसाठी गरजेचे 
प्रत्येकाला अंथरूण 
त्याच बरोबर हवे
पांघरण्या  पांघरुण 

आई बाबांचे मायेचे.             तातमाये पांधरीले. आपणासी मायरुपी.  पांघरूण  .
ममतेचे उबदार 
सदा साठी पांघरले
किती भासे शानदार 

देवे दिधले आपणा
नभ रुपी पांघरूण 
सारे राहू तयाखाली 
समतेचे भाव जाणून 

पांघरूण यामिनीचे 
दूर होतेची  क्षणात 
येता रवी राजे नभी
होते मंगल पहाट 

संस्काराची हीच शिकवण
उपयोगी असे जीवनात
पाहता अंथरूण पांघरूण 
खर्च करावा आटोक्यात.

वैशाली वर्तक 


नाव घेता झोपण्याचे
काय घेऊ अंथराया
शांततेने नीजयेण्या
 पाहिजे ना पांघराया 

देवराये आपणाला
राखण्याला भाव समता
एकलेची व्योम दिधले.
जोपसाया  ती एकता (ठेवण्याला)

पांघरूण यामिनीचे
आदित्याने दूर केले
फाटलेल्या रश्मिकांनी
गगन सारे ऊजळीले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जेथे निषेध...