सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

पंचाक्षरी...तलाव

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित उपक्रम 
पंचाक्षरी लेखन 
विषय. तलाव

गावाच्या वेशी 
आहे तलाव. 
नाही तयाचे 
ठाऊक नाव


नित्य येतात
फिरण्या जन . 
होते सा-यांचे
आनंदी मन.

उठे तरंग 
 मना आनंद 
पाहता लागे 
जीवाला छंद .

हंसाची जोडी 
तरंगे छान. 
 कमळ फूले
 वाढवी शान.

वाहता वारा 
झाडे डुलती 
 सावल्या त्यांच्या
जळी हासती.

तळ्याच्या काठी. 
वड तो उभा. 
भासे जणु की 
घेतोय  सभा. 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...