शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

एक प्रवास आयुष्याच्या आयुष्याची रंगीत पाने

 काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 

नवाक्षरी कविता 

 विषय..एक प्रवास आयुष्याच्या 

*आयुष्याची रंगीत पाने 


पाने चाळली आयुष्याची.          

पान  प्रत्येकच सुंदर 

निहाळली सरलेली ती

होती सारीची मनोहर 


बालपणाचे निरागस 

होतेची पान आनंदित

नव्हते त्यात हेवेदावे

चिंता  व क्लेश विरहीत


यौवनाचे  तर गुलाबी

रंगविलेली स्वप्ने मनी

 कधी किनारी उपवनी

ताज्या झाल्या की आठवणी 


  कर्तव्याचे अन् कर्तृत्वाचे 

 नजरेत येताच  पान

 चढले स्फुरण मनात 

 मिळविलेला जगी मान


आयु करण्या  सप्तरंगी

केली उधळण रंगाची

जगले सदा स्वच्छंदाने

गीत गाणी आनंदाची


रंगची देती मोद जीवा

पहाताची मन झाले दंग

किती मोहक भासले ते

एकाहून एक सुंदर  रंग


मिळाला जन्म मानवाचा

करावे सोने  आयुष्याचे

नको खंत निराशा मनीं

रंग उधळू आनंदाचे


शिकवण माता पित्याची

 संस्काराची सदैव गाठी 

सुख लाभणार संसारी

 विश्वेश्वर सदेव पाठी


 रमले सुखाच्या जीवनी

पान समोर समाधानाचे. 

दिले सारेची विधात्याने

ऋण मानीते  विधात्याचे



वैशाली वर्तक 

अहमदाबाद 




 परिस्थिती बेताची बालपणी

 कष्ट सोसले  जीवनी

 पूंजी दिली  संस्काराची

 फळास आली मोठेपणी


 नाही केली मौजमजा 

नाही केले खोटे हट्ट 

शिकवण होती शिस्तीची




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...