रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

वृत्तबद्ध .....भुजंग प्रयात. सख्या रे. कविता



 वृत भुजंगप्रयात 
लगावली.   लगागा लगागा लगागा लागा

        सख्या रे

कितीदा तुला सांगते मी फिरुनी
 सख्या ये तरी तू नदीच्या किनारी        

नको ते फुकाचे बहाणे  सदाची. 
मनी खेद दाटे उरी तो फिरूनी 

मनीची गुपीते कथाया तुला मी
कधी सांग येऊ नदीच्या किनारी

 कितीदा  विनंती करावी  तुला रे
  तुलाही कळावी  मनाची व्यथा रे

नको ते, तुझे रे , कधी चांदणे ही,
तुझी साथ राहो  नशीबी सदाही. 

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जेथे निषेध...