गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

लढा तरी किती द्यावा

लढा तरी किती द्यावा

मर्यादा त्यास का नसावी

करा मर्यादित लढा मग

उत्कर्षाची कास न धरावी


जीवनच  असे एक लढा

हे तर आहेची सदा खरे

 होते , लढा दिल्यावरच 

प्रगती जीवनी हेच सत्य खरे


पहा आयुष्य श्री कृष्णाचे

जन्मा पासून लढा सुरू 

पण आयुष्य जगलेच ना!

अखेरीस ठरले जगतगुरु .


थांबला तो संपला  म्हण

आहेची सदासाठी उचित 

मर्यादित करिता लढा

प्रगती खुंटते हे खचित


साधे फुल गुलाबाचे

किती  साहू लढारुपी काटे

 मान फुलांच्या राजांचे मिळे

नको लढा तया , मनी न वाटे


दगडाला पण मिळविण्या देवत्व

साहितो टाकीच्या लढ्यांचा संघर्ष 

 जीवनात येणारे लढयासाठी

सहजच ध्यानात ठेवावा निष्कर्ष 


पहा आपले पंतप्रधानजी

 लढे झेलीत  संघर्षांने

प्रेरणा देती सर्व जगाला 

कसे जगावे सहर्षाने


वैशाली वर्तक

लढा तरी किती द्यावा

मर्यादा त्यास का नसावी

करा मर्यादित लढा मग

उत्कर्षाची कास न धरावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...