जीवनातील कवितेचे महत्त्व
तीन अंकी नाटक
म्हणती जीवन जसे
आनंद तयात भरण्या
कवितेचे स्थान असे
भाव दावी मनीचे सदा
असे अपुल्या मनाचे दर्पण
नव रसाचे ती भरभरुनी
सहज घडविते ती दर्शन
लहान बालकास रिझवण्या
कविताच येते ओठी
गाता गेय करुनी कविता
तयास वाटे गंमत मोठी
भक्ती रसाने ओतप्रत
भरली असता कविता
देते शांती मनास सदा
दावे मंगल प्रसन्नता
येता कधी प्रसंग बाका
जागृती करी जन मनात
रचिता वीर रस काव्य
देती स्फुरण जवानात
सदा विहरते प्रेमी जनात
दावीत रोमांचित भाव
होई उत्कट प्रेम मनीचे
घेण्या एक दुजांचा ठाव
नव रस संपन्न असे भाव
चित्रीत करण्यात तिचे श्रेष्ठत्व
रंगवीते मानवी जीवन सदा
म्हणून तीचे जीवनी महत्व
वैशाली वर्तक....19/10/2019
म्हणती जीवन जसे
आनंद तयात भरण्या
कवितेचे स्थान असे
भाव दावी मनीचे सदा
असे अपुल्या मनाचे दर्पण
नव रसाचे ती भरभरुनी
सहज घडविते ती दर्शन
लहान बालकास रिझवण्या
कविताच येते ओठी
गाता गेय करुनी कविता
तयास वाटे गंमत मोठी
भक्ती रसाने ओतप्रत
भरली असता कविता
देते शांती मनास सदा
दावे मंगल प्रसन्नता
येता कधी प्रसंग बाका
जागृती करी जन मनात
रचिता वीर रस काव्य
देती स्फुरण जवानात
सदा विहरते प्रेमी जनात
दावीत रोमांचित भाव
होई उत्कट प्रेम मनीचे
घेण्या एक दुजांचा ठाव
नव रस संपन्न असे भाव
चित्रीत करण्यात तिचे श्रेष्ठत्व
रंगवीते मानवी जीवन सदा
म्हणून तीचे जीवनी महत्व
वैशाली वर्तक....19/10/2019
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा