शब्द रजनी कथा ललित लेख लेखन साहित्य समूह पुणे
आयोजित
ललित लेख लेखन
दि ८\७\२५
विषय ... गुरू चरणी ठेवीतो भाव
शीर्षक. मी अजुनही विद्यार्थी
येता जन्मा गुरू हा हवाच.आई असे आद्य गुरू.जिचे बोट धरूनी चालता
शिक्षण देणे सुरू. .जसे होतो मोठे गुरू पदांची संख्या वाढत जाते. जीवनात अनेक गुरू लाभतात जे ज्ञान देतात व जीवन सुलभ करतात.
येताची जुळूनी ।
गुरू कृपा योग ।।
तो असे सुयोग
जीवनात |
खरच अगदी उचित कथन आहे. वरच्या माझ्याच ओळी मला आठविल्यात. शालेय जीवनात विद्या देणारे व त्याच बरोबर व्यवहार ज्ञान सहजतेने देणारे गुरू . त्यांच्या तर आपण आदर भाव ठेवून ....त्यांना वंदनीय मानून ज्ञान संपादन केले
म्हणूनच आपण जीवनात काही करु शकलो. , नुसतेच करु शकलो नाही तर
गुरू कृपा योगे ।
तरलो तरलो ।।
आता उध्दरलो।
जीवनात ।।
असे म्हटले तर काही चुकीचे नाही.
गुरू कृपेचा तो योग. आजही ते भाव मला आठवितात. त्यांची कृपा झाली म्हणून ज्ञानी झालो ,त्याचा आज आनंद वाटतो. ज्ञान संपादन करून भविष्याची वाटचाल सरळ सुलभ झालीच.. शिवाय संकटी. कठिण प्रसंगी पण कसे तरून जायचे ,बाहेर निघायचे या ज्ञानाचा उपयोग झाल्याने, जीवनी दु:ख निवारण झाले.कुठल्या शंका कुशंकेला मनी थारा दिला नाही.
आणि हो ....नेहमी निशा नसतेच... निशे नंतर उषा पण येते ...असे समजवित गुरू ची प्रेरणा, वेळोवळी कौतुकाची थाप ,हे सारे गुरूंचे मनी भाव अजूनही स्मरणात आहे.
जीवनात गुरू शिष्य नाते चालूच रहाते. ज्याच्या पासून ज्ञान मिळते तो गुरू..
मग तो आपल्या हून लहान पण असू शकतो.
साधा किटक कोळी पहा.. पण जिद्द असावी मनी तरच यश मिळेल ,काम पूर्णत्वास जाईल . हे शिकवितोच ना!
तो कोळी चिकाटीने शंभरदा पडून जाळे पूर्ण करतोच ना.? तर असे गुरू चे भाव मनी असावेत. निसर्ग पण गुरू शिकवितो कसे जगावे. तर
जीवनी शिकणे हे गरजेचे
तर वाढे आपले ज्ञान .
विद्यार्थी अवस्था महत्त्वाची
ठेवा सदा त्याची जाण.
असे म्हटले तर चुकीचं ठरणार नाही.
जाणूनी महिमा गुरूचा
मिळण्या जीवनास आकार
विद्यार्थीनी मी रहाते सदैव
आयुला भक्कम आधार .
तर गुरू विणा नसे उध्दार हे सदा भाव मनी ठेवावे .
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा