मोहरली लेखणी साहित्य समूह
आनंद कंद वृत्तात
दुनिया
आहेच हे खरे की, दुनियेत रीत न्यारी
जावे कुठे तरी ती, सोपी नसेच सारी
दुनियेत लोक नाना, सारे कसे शहाणे
वेडेपणाच दावी , होऊन ते दिवाणे
कोणास वेड भारी,कोणात ती धडाडी
काही उगाच भित्रे, काही करी लबाडी
होते असे कधी ते, सोडून चोरट्याला
शिक्षेस योग्य मानी , निष्कारणी जनाला
चाले असा निरंतर, दुनियेत खेळ सारा
वाटे मनी कधी हा , होईल नीट न्यारा.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा