शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

संवाद. नदी व सागर. स




स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित उपक्रम दिनांक 29/11/23
संवाद लेखन
विषय ..नदी आणि सागर

      
सागर..  आलीस?.. ये ग ,सरिते.  मी तुझीच आतुरतेने वाट पाहत होतो. माझ्या लाटा पण उत्सुकतेने  
 उचंबळून...  उंच उंच होऊन तुझ्या वाटे -कडे  डोळे लावून तुझ्या येण्याची वाट पहात आहेत.
नदी ....   हो का रे सागरा. ..? खरच तुला पण इतकीच ओढ असते का मिलनाची ?  माझीही तिचं मनस्थिती
 होती.  कधी एकदा या पठार.. पर्वत रांगा पार करून सपाट भूमीतून  वेड्या वाकडा मार्ग आक्रमित. .... हिरव्यागार शिवारांना  ना टवटवीत करीत .. बळीराजाची खुषी मनी
 अनुभवित  आणि  माझ्या  तटावर  आनंदाने  बागडणारी  मुलं व  उद्याची  सुखस्वप्न रंगवत                                                                                                                                                                               बसलेली युगल पाहून ...मनात खुश होऊन माझ्या    वाटचालीची   मनात सार्थकता  अनुभवित.,संतुष्ट होऊन.... तुला सारे हे अनुभव  सांगण्यास आतुर उत्सुक होऊन ...तुझ्या भव्य  दिव्य  उदात्त विशाल  स्वरूपात  विलीन होऊन.. कधी तुला  अलिंगन देते  असे झाले होते.
सागर... .  हो ग पण . सरिते.  तू तुझे गोड पाणी मला समर्पित करते आणि माझे  खारे पाणी स्विकारते.
नदी..     अरे ,पण माझे बाष्प स्वरूपाचे अस्तित्व तुझ्या ख-या पाण्यातच तयार होते ना ! विसरलास का?
सागर....    पण असे तू किती दिवस करणार?
नदी.   अरे, सागरा  ,माझे गोड पाणी जसे मानवाला *जीवन* रूप आहे तसेच तुझ्या खा-या पाण्यातच रोजच्या 
   अन्नास रुचकर बनविणा पदार्थ... मीठ ...तू मानवास देतोस .  तो तुझ्यात सामावलेला आहे.एक दिवस अळणी जेवण... मीठा शिवाय 
 चालत नाही..शिवाय.  तुझ्या ह्रदयात किती मौल्यवान रत्ने, माणके. मोती आहेत व तूच तर 
 जलसृष्टीचे. संवर्धन करतोस ,. तूझे स्थान महत्त्वाचे आहे.
सागर...   हो ग पंचतत्वातील एक तत्त्व आहोत आपण.
 नदी...  अरे सागरा.. पुन्हा मी बाष्प रुपाने जलद होऊन वरती जाईन ... नाचत बागडत  वर्षा रूपाने  पर्वत  शिखरातून  मार्ग आक्रमत
अशीच तुला भेटायला येणार.  तू तुझा खारट पणा   सोडू नकोस मी माझा गोडवा टिकून ठेवणार. व असेच 
गोड पाणी तुला समर्पित करणार.



वैशाली वर्तक
अहमदाबाद

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

प्रणु शब्दावली.....4. .प्रवास \सावली कवित्व \लतादिदी/दादासाहेब फाळके.

स्वप्न गंध साहित्य समूह
आयोजित उपक्रम क्रमांक 165
प्रकार.. प्रणु शब्दावली 
 1 विषय...प्रवास 

  जीवनाचा प्रवास 
आनंदाचा हमखास 
असता समाधानाची आस
 विलसते हास्य मुखावर

प्रवास हिवाळ्यात
आतुरता मनात 
मजा येते करण्यात 
भटकंती आवडे  आयुष्यभर जगभर 

 येतात दूरवरून 
पक्षी परदेशातून
 थव्याने पक्षी निहाळून 
  आनंद  मावेना  क्षणभर

करावे देशाटन
 आनंदाचे क्षण
प्रफुल्लित रहाते मन
प्रवासी आनंदी जीवनभर

केल्याने अविरत
सांगते मनोगत          
ज्ञान वाढे हकीकत
प्रवास करा आयुष्यभर

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




स्वप्नगंध साहित्य समूह
प्रणू शब्दावली उपक्रम
2. विषय.. सावली 

राहते बरोबर 
साथ निरंतर 
न देता अंतर
आपली सावली छाया
           
छत्रछाया  मायबापाची
गोडी सहजीवनाची 
कृपादृष्टी होता देवाची
जीवन प्रेमळ माया


असे सदा संगती 
जीवनाची सोबती
सावलीत खेळ रंगती
सावली करी माया 
        
 वृक्षांची  सावली
  जनमने आनंदली 
  गाई गुरे विसावली 
 पथिकांना दिधली छाया


वैशाली वर्तक
अहमदाबाद


प्रकार ...प्रणु शब्दावली
   3 विषय. कवित्व

 करिता सराव 
 विचारांचा ठराव 
कल्पनांचा नसे अभाव 
साकारते रचना सहज

लेखणीचा संग
विचारात दंग
कवितेस चढे रंग
कवित्व जागणे गरज

कल्पना अवगत
विचार अविरत 
मनात वाहती खळाळत 
कवित्वाची दिसे उमज.


धार साहित्याला
  मनीच्छा कवित्वाला
स्वस्थ न बसण्याला 
लक्ष  जणु सावज

साकारण्या कविता
भावनांची सरिता
लेखणीची पहा अधीरता
नव काव्य प्रकारात सहज

वैशाली वर्तक
अहमदाबाद


स्वप्न गंध साहित्य समूह
जागतिक मराठी दिन विशेष उपक्रम
मराठी कलाकार वर्णन
गान कोकिळा लतादीदी 
******************************
4. शीर्षक...दुजी न होणे  लता    

 रहाणी सोज्वळ 
 जीवन निर्मळ
  यश प्राप्तीत प्रांजल
 लतादीदीचे ऐकू गायन       

  ऐकावी भुपाळी
  रोजच सकाळी 
  भावपूर्ण गाणी सदाकाळी
  आनंदमयी करी वातावरण   

  लतादीदी खरोखर 
  भासे क्षणभर
  साधना तितकीच बरोबर
  कर्तृत्वाला तियेच्या नमन

  गोडवा स्वरातला
  भाव  मनातला
 परिपूर्ण दिसे गीतातला
 होई भावनांचे दर्शन 

सुखाच्या स्वरांनी
तृप्त मनानी
ओंजळ नव रसांनी
भरूनी करूया सैवन 

ओठावरची  गाणी
अमृताची वाणी
ऐकता येई डोळापाणी
स्वरसम्राज्ञी वदती जन


वैशाली वर्तक 
अहमदाबाद







स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित जागतिक मराठी दिनानिमित्त विशेष उपक्रम
प्रणु शब्दावली काव्यलेखन
मराठी कलाकार वर्णन
5.  कलाकार.. दादासाहेब फाळके


चित्रपटाचे जनक
उत्तम दिग्दर्शक
तैलचित्र कलेचे उपासक
दादा साहेब होते खास 

कला अवगत
शिकण्याची शिकस्त
जेजे स्कूलचे पारंगत
चित्रपट व्यवसायाचा ध्यास 

नौकरी त्यजून
व्यवसाय धरून 
मुक चित्रपट बनवून
झाली पूर्ततेची  आस

वाढ रोपट्याची
पहिल्या लघुपटाची
राजा हरिश्चंद्र चलचित्राची
झाला शुभारंभ अभ्यास 


दाखविली जीवनाची 
 ओढ  अंतरीची
 चित्रपटात फॅक्टरी हरिश्चंद्राची 
सन्मानित कलावंत हमखास

वैशाली वर्तक
अहमदाबाद..











गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

लेख...ध्यास नवा आस नवी

सिद्ध साहित्यिक समूह
विषय .. ध्यास नवा आस नवी

सूर नवा ध्यास नवा कार्यक्रम ऐकत होते. सारे गायक नव्या नव्या( त्यांच्यासाठी )नव्या नव्या सूरांचा अभ्यास करुन संगीत  कला आत्मसात  करण्याचा व कला प्रदर्शित  करण्याचा जीवापाड प्रयत्न करत  होते. व जीवनात पुढे पुढे जाण्याचा... प्रगतीचा ध्यास मनी धरून पावले टाकीत होते.
   सहज मला विचार आला खरच जीवन पण गाणे आहे. त्यात सप्त सूर..इंद्रधनुचे सप्त रंग भरण्याचा ध्यास  मनी पाहिजे तर  जीवन सुखमय, तालमय, आनंदी ,सुखी , प्रगतीशील होईल.
       प्रत्येकाला जीवनी काही ना काही   विशेष करुन दाखवू. .. चार लोकांत उठून कसे दिसू याचा ध्यास असतोच.आणि असावाच. जो जरुरीच आहे.
         आता सरत्या वर्षाला   या वर्षात काय कमविले.. काय गमविले  यांचा आढावा घेत.नव्या वर्षात जुन्या चुका वा गडबडीने झाले ला गोंधळ होणार नाही याची दक्षता बाळगत नव्या वर्षाच्या स्वागताला सारे तयार होतील. गेल्या वर्षा पेक्षा काही नाविन्य घडवू अशा विचारात मनी बरेच संकल्प करत असतील.
तर देश धर्म  संस्कृती ह्याचा विचार माझ्या मनी सहज आला. आपल्याला देश आपला देव मानला पाहिजे.   आपण  सा-या नागरिकांनी आपला धर्म , संस्कृती ,कशी टिकेल.  त्यासाठी आपल्या येण्या-या पिढीला उत्तम संस्कार देत देशभक्ती ची भावना जागृत करूया.   परदेशाकडील हिरवळ सर्व
जनांना फार आकर्षक भासत असते.. तेथील भौतिक सुख मनाला भुरळ पाडते . खरं आहे ,परदेशातील 
 आधुनिक तंत्रज्ञानाने जीवन सुखकर होते.कमी महेनतीत कामे होतात. त्यामुळे परदेशात जाण्याचा ओध
वाढत आहे ,पण  आता आपला देश पण प्रगती पथावर आहे. सर्व भौतिक सुख येथे पण उपलब्ध होत आहेत. तिथल्या सुखसोयी आपल्या देशात सहज मिळत आहे. देशातील सर्व सामान्य माणसाचे रहाणीमान पण सुधारत आहे. वैज्ञानिक पण महेनत करून देशाला उच्च स्थान देण्यात झटत आहेत.
तर आपण पण सर्व नागरिकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यात एकजूटीने कार्यरत होऊया. आपला देश प्रगतीपथावर वर आहेच... तो असाच प्रगती पथावर चालत राहिल व विश्वात कसा शोभेल याचा ध्यास  मनी बाळगून....तीच आस पूर्णत्वास नेण्याची मनोकामना धरु. 
      पर्यावरण जतन करणे.... मुलगी वाचवा मुलगी शिकवा .या सर्व मोहिमीना जोमाने उत्साहाने उचलून त्या बाबतीत प्रत्येक नागरिकात जागृती निर्माण करू. पुन्हा नव्याने देश स्वावलंबी बनविण्याचा ध्यास असावा.
स्वदेशीचा लावुया नारा, देश होण्या आत्म निर्भर
 पुन्हा  नव्याने वाहुद्या झरे, स्वावलंबनाचे देशभर.

          तसेच दिपक अंधार दूर सारतो नवी आशा दाखवतो .तसे शिक्षणाच्या दिव्याची ज्योत लावून
मुलींना शिक्षित केल्याने .आज आपण पहात आहोत की सर्व क्षेत्रांत नारी आघाडीवर आहेत.तर
शिक्षणावर भर देऊन ज्ञानाची गंगा वाहती ठेवू. अंधश्रद्धेचे निर्मूलन करू.महत़्वाचे सकारात्मक भावना
अंगिकारू.

  दिवा  दूर करीतो तिमीर  ,दावितो नवी आशा  जीवाला 
 प्रतिक असे  सकारात्मकतेचा , सदैव तेजाळू दिपकाला.          

 अशा भावना मनी बाळगून सकारात्मक  विचार  ठेवू. भारत देशाला महान करण्याची आस धरू
तसेच
       विश्व शांतीची  मशाल, तेजाळू  द्या संस्कृती ची
      नांदावी सुखशांती  जगात, अशाच  उदात्त  भावनेची
 अशी उदात्त भावना मनी रहावी . त्यासाठी संतांची शिकवण आठवणी त घेऊ. जाती भेद दूर सारून
विश्व बंधुत्वाची.. हे विश्व माझे कुटुंब भावना मनी आणू.

दिवा लावू विश्व शांतीचा 
तेजाळूया समई संस्कृतीची
नांदेल सुखशांती  जगात
विशाल उदात्त  भावनेची.   

 विसरूनी  जाता जातीभेद ,
समजून घेऊ नव्याने समतेला,
ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा, 
दिलेला मंत्र  देऊ  जगताला.      
        असे काही विचार मनात आले . व त्या विचारात   नवा ध्यास नवी आस मनी दृढ झाली.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

भारतीय संस्कृती ... परंपरा



विषय - भारतीय संस्कृती

     *संस्कृती महान*

 भारतीय संस्कृती  आपुली
आहे   अति पुरातन
रुढी अन्  परंपरेची सदैव
  करतोय  आपण जतन

सारे मानव आहेत बांधव
माणुसकीची देत शिकवण
मानवता हाची  धर्म हीच
  उदात्त भावना करते साठवण 

 साजरे करिते सणवार उत्सव 
 दाविते तयातून रूढी परंपरा
उत्सवातून दिसे समाजप्रेम
 समतेची ध्वजा हाती धरा

 
 किती वर्णावी संस्कृती ची गाथा
येथेच जन्मले  संत, वीर महान
अन् अंतराळात जाणारे शास्त्रज्ञ 
काय सांगावी संस्कृतीची शान

अशी महान संस्कृती  भारतीय
असावा मनी सदा अभिमान
साहित्य , कला, क्रिडा ,संगीतात
एक एक चमकते तारे महान






आभा म सा प समूह2 
आयोजित 
विषय - परंपरा


  जुनी संस्कृती भारतीय
  चालवित आली परंपरा
पिढ्यान् पिढ्यांनी  घेत
पुढे चालतोय वारसा

जुने रिती रिवाजात
सामाजिक   करुन बदल
नव्या रितींचे अनुसरण
केले हे घडले नवल

सण वार पारंपारिक 
होतात देशभर साजरे
संस्कार  संस्कृती  चे जतन
दिसते सर्वत्र  हासरे

लाभलाय आपल्याला
भक्ती रस साहित्याचा 
 संत वाणीचा वारसा
तोची आमुल्य ठेवा परंपरेचा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

मी अजून हरलो नाही

स्वराज्य लेखणी मंच
आयोजित स्पर्धा
स्पर्धेसाठी
विषय.  मी अजून  हरलो नाही 


जीवन तरआहेच
तीन अंकांचा खेळ .
कसे जगावे त्यात आनंदाने
 जमवावा लागे मेळ

 संघर्षा शिवाय नसे जीवन
अन् तेव्हाच होते प्रगती 
महेनत करण्याची जिद्द मनी
जाणतो साधनेची महती

घेतो शिकवण निसर्गाची
कसा हसतोय तोही संघर्ष
करीतो सदैव यत्न
साधण्या जीवनी उत्कर्ष

मिळो यश अपयश
हार कधी नाही मानत
अपयश पायरी यशाची
हेच विचार मनी ठसवत

शिकवण साध्या कोळ्याची
कितीदा पडुन न हरतो
तसा मीही न करीता कसूर
आत्मविश्वासाने यत्न करतो

वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

शाळेतील फळा

कल्याण डोंबिवली महानगर 2
आयोजित उपक्रम
विषय... शाळेतील फळा


अक्षरे तयावर उमटतातच
कोरा काळा कुट्ट फळा
बोलतो कसा  धडाधडा
दावी आगळीच कळा

असो विषय कुठलाही
ज्ञान देतो मनोभावे
पहिले लिहिलेलं पुसता
मागचे न तया  ठावे

कधी विज्ञान तर गणित
 घडे तासा तासात बदल
 फिरता  हात गुरुंचा
 




वैशाली वर्तक
अहमदाबाद

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०२३

कुणी सांगाल का

 

कुणी सांगाल का?


विज्ञानाच्या प्रगतीने

 प्रश्न उकेल होतात सहज

गुगल महाराज असता हजर

कुणी सांगाल का ? ची नुरे गरज


प्रश्न असो  कुठल्याही विषयाचा

मिळते क्षणात उत्तर खचित

ज्ञान भरलेय जगभराचे

बटण दाबताच प्रश्नोत्तरे मिळे सदोदित


जरी होऊनी सारे ज्ञानी  , तज्ञ

काही प्रश्न मनाला पडे

जयांची उत्तरं न सापडे

जैसे, ऋतू चक्र कसे न सांगता घडे?


साधा प्रश्न पक्ष्याजवळी, कुठले घड्याळ

पण उठणे नित्याने सदा काळ

तयांच्या किलबिलाटाने

होते , आपली सुखद सकाळ.


नवजात  शिशुला पहा

कोण शिकवे स्तनपान

कसे न सांगता तेही 

सुरू करी छान दुग्धपान


असे काही नैसर्गिक प्रश्न

 मोराचे नाचणे, कोकिळ कुजन

कुणी सांगाल का उत्तर?

 जी देई  मानवास सहज शिकवण.




वैशाली वर्तक

अहमदाबाद ३०\९\२३


मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३

उत्सव नवरात्रीचा आणि जागर स्त्री शक्तीचा

नमस्कार
स्वप्नगंध समूह आणि प्रणू चाराक्षरी समूह विद्यमाने आयोजित "उत्सव नवरात्रीचा आवणि जागर स्त्री शक्तीचा" या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात मी - सौ वैशाली अविनाश वर्तक -आपले सहर्ष स्वागत करत आहे. नवरात्रीच्या या विशेष कार्यक्रमात मला आमंत्रित केल्याबद्दल समूह प्रशासिका सौ.प्रणाली म्हात्रे आणि समूह संचालिका सौ.अनिता गुजर यांचे मी मनःपूर्वक आभार मानते.

आज घटस्थापनेचा आठवा दिवस आज देवीच्या  महागौरी या रूपाचे  पूजन .  आजचा रंग मोरपिशी . देवीच्या ह्या रूपाच्या पूजनाबरोबर मी आपल्या घराघरातील स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आजची आठवी  स्त्री शक्ती म्हणजेच  ... *आजी* हिला माझी आठवी माळ अर्पण करून माझी रचना सादर करते
अर्थात माझी कविता माझ्या  आजीवर

कविता

स्त्री असे   दैवी शक्ती
पहा तिला विविध रुपात
जसे ममतेने भरले रुप आईचे
मिळे प्रेम  आजीच्या सहवासात

अशीच होती आजी माझी
जरी नव्हती ती साक्षर
केले तिने मला  या जगी व्यवहारी
देऊन उत्तम  संस्कार  मजवर

घेतली रोज म्हणूनी शुभंकरोति
रामरक्षा मनाच्या श्लोकांचे पठण
केले तिने जगी मजला सजाण
करुन घेतले नित्य  नाम स्मरण

दिली शिकवण उत्तम  गुणांची
नको राहू मोह मायात पळभर
सांगून रामायणाच्या गोष्टी 
घडविले जगण्यास आत्म निर्भर

ख-या अर्थाचे  अनुभवी बोल
नसता घड्याळ सांगे ,थांबवा खेळ
नसुनी शिकलेली सावरलेली
उन्हे पाहून सांगेअचूक शाळेचीवेळ

 आजी म्हणजे  असते जणू
दुधावराची मऊ मऊ साय
तिच्या स्पर्शात  भरली माया
तिच्या बद्दल कितीही बोलता उणेच हाय

बोला .... अंबे मातकी जय

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

क्षितीजाचा उंबरठा


 क्षितिजाचा उंबरठा


सहजच पूर्तता


अपेक्षांच्या क्षितीजाने पळविले आयुष्यभर

 क्षितीज पूर्तीची आस सदा मनी

पोहचता क्षितीजाच्या उंबरी

 मोदाने भारावले त्याच क्षणी


अथांग निलांबर ,  एका बाजूला      

दुजीकडे पसरलेली अवनी

मनोहर सुंदर रूप तियेचे

पाहूनिया  आनंदले  मनोमनी


 स्थितप्रज्ञ  भासती, ऊतुंग पहाड. 

शुभ्र दुग्ध जलांचे तयात  झरे. 

लहान मोठी तुडुंब जलाशये

अवर्णनीय रुप  वसुधेचे , हेच खरे


पृथ्वीच्या गोल आकाराने

भासे भेटली अवनी नभास 

क्षितीज  असे वदती जन तयास

 पण असतो ह्या रेषेचा अभास


होता अस्त - उदय रवीचा

रंग  सुंदर क्षितिजावर उमटती

तसेच चढ उतार येती जीवनी

 घेत भरारी चालावे जगती


तडजोड काही अपेक्षांची

 काहीची सहजच पूर्तता

मनी बाळगता समाधान

राखावी कुटुंबी कार्य दक्षता.


सांकेतिक कोड नं 101















गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

चित्र काव्य सावली सोबती




सावलीची सोबत

स्वच्छ निर्मल जलात
उभा राहिला  निश्चल विहंग
नजर  सर्वत्र फिरवित
 जलाशय पाहण्यात दंग

बाजुला दिसली  सावली
होती त्याचीच, तया  संगतीला
तसेच मागे जलात प्रतिबिंब
ते. S ही होतेच सोबतीला

जरा करिता हालचाल
बदले  छायेची आकृती
पण प्रतिबिंबित छबी दावी
हुबेहूब .स्व-रुपाची प्रतिकृती

जलातील स्वरुपाला निहाळता
विहंग करी विचार  मनात
जलातील बिंब आहे निरागस
 जैसे  दिसते  दर्पणात 

पण  ,उडून येथून जाता
सावली असेल सोबतीला जीवनी
राहिलं तिच सदैव जवळी
अगदी जीवनाच्या अंतिम क्षणी

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
२६\९\२३

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

लेख..गाय हंबरते

देवाने मानवाला विचार करण्यास आणि  त्या प्रमाणे वागण्यास मेंदू दिला आहे.ऐवढेच नव्हे तर वाच्यता करण्याची अद्भूत शक्ती दिलीआहे . त्यामुळे मानव काय हवे  नको ते   वा त्याचे विचार तो वाणीने संवादातून...वाच्यतेतून सांगू शकतो. .. विचार प्रगट करू शकतो. त्याच्या विचारांचे मंथन करून
एकमेकांत विचारांची देवाण-घेवाण करुन विषयाला पूर्णत्व देऊ शकतो.
     पण प्राण्यांचे तसे नाही. प्राण्यांना आपल्या सारखी वाच्यता करता येत नाही.  पण, प्रेम भावना तयांच्यात पण झरत असते. 
     गाई अथवा सारे प्राणी त्यांच्या हालचाली तून प्रेम व्यक्त करत असतात.ठराविक वेळेनुसार  गाय पिल्लाला चाटून मनुष्यप्राणी जसे बाळास कुरवाळतात ना तसे गाई  पिल्लांना प्रेम करतात. पिल्लास माया करतात.
    गोरज मुहूर्तावर म्हणजे राना वनातून चरून  जेव्हा गुराखी घराकडे परततो तेव्हा  गाय हंबरुन परतण्याची वेळ झाली हे पिलास सांगत असते. हे तिचे  हंबरणे म्हणजे काळजी करण्याचे वा  काळजी   करण्याची पावती असते वा गाईंची  पिल्लांशी सांकेतिक भाषा आहे . 
      माता  असो,  मानवाची  वा प्राण्यांची .... ती प्रेम करतेच. काळजी घेते, निगा घेते. जोवर पंखात  बळ येत नाही तोवर काळजी घेतेच , उगाच का म्हणतात, "घार उडे उंच आकाशी पण लक्ष तिचे असे पिल्लांशी".
   तसेच गाईचे असते. तिचे हंबरते वासराला कळते. हंबरणे ऐकून वासरू धावत गाई माये जवळ येते. तिची वासराला साद कळते.  जेव्हा  गाय व्याते  , पिलास जन्म  देते. जन्म दिल्यानंतर त्याला चाटून साफ करते. हंबरते.प्रेम व्यक्त करते.
        तेच प्रेम माणसात आपण पहातोच. आई बाळाचे प्रेम .मातेच्या प्रेमावर तर लिहावयास बसता
काव्य खंड तयार होतील.आईचे बालका प्रति प्रेम म्हणजे काळजाच्या तुकड्यासमान. यशोदा कन्हैया चे
राम कौसल्येचे प्रेम अजरामर आहेच
       आई मातीच्या गोळ्याला आकार द्यावा तसे संस्कार करून बालकांचे उज्वल भवितव्य घडव�

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

चित्र काव्य. ...रक्षण पर्यावरणचे

*स्पर्धेसाठी*
स्वप्नगंध स्पर्धा समूह आयोजित
स्पर्धा क्रमांक 35
चित्र आधारित
शीर्षक....रक्षण पर्यावरणाचे

येणार घरी माझा बंधुराया 
नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाला 
तयासाठी केले नारळी जिन्नस 
करवंटीचा उपयोग वृक्ष-संवर्धनाला

हृदयी  अनुराग  भरलेला
सांगे नसे तो धागा केवळ
मातीत जसे अंकुरले बीज
हृदयी जागा मायेची प्रेमळ


माती रुपी ताई करेल माया
बनुया रक्षक  रानावनाचे
बनवुया  हरित वसुधेला
सुटतील प्रश्न पर्यावरणाचे

सणवारात आणू आधुनिकता
परंपरेला करिता जतन
 मिळेल समाजास संदेश
पर्यावरणचे होईल रक्षण

वैशाली वर्तक
अहमदाबाद

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३

चंद्रयान पोहचले चंद्रावर 5कविता

[14/09, 8:42 am] Vaishali Vartak: DBAसाहित्यिक  नाशिक
आयोजित उपक्रम
विषय. चंद्रयान  पोहचले चंद्रावर

वेळेला पक्के होते चंद्रयान
वेध लागले प्रत्येक नागरिकास
त्याच्याच कडे नजर लावून
प्रतिक्षेत बसले तया पाहण्यास

सांजवेळी चांद्रयान चंद्रावरी
 निहाळती  तया जन  आनंदूनी
गौरवाने अभिमानाने गजर
भारत मातेचा करी आवर्जूनी

भुवरी टाळ्यांचा कडकडाट 
दिवा देवाजवळ यशाचा
तेजळती नारी आनंदाने
  विक्रम चंद्रयानच्या विजयाचा

उतरले चंद्रयान चंद्रावर
दिन ठरला सोनियाचा
विश्वात शोभून दिसला भारत
आत्म विश्वासाने काम केल्याचा

फडकला तिरंगा चंद्रावरं
वेळेवर टाकिले अचूक पाऊल
विजय पताका झळके जगावर
विक्रम घेतोय दक्षिण ध्रुवावर चाहुल 

वैशाली वर्तक
अहमदाबाद
[14/09, 8:43 am] Vaishali Vartak: स्वप्न गंध साहित्य समूह
आवली यमक

विषय..भारताचा तिरंगा चंद्रावर

उतरणार चंद्रयान चंद्रावर
दिन ठरणार सोनियाचा
विश्वात शोभून दिसणार भारत
आत्म विश्वासाने काम केल्याचा

फडकला तिरंगा चंद्रावर
वेळेवर टाकिले अचूक पाऊल
विजय पताका झळके जगावर
विक्रम घेतो दक्षिण ध्रुवावर चाहुल 

वैशाली वर्तक
अहमदाबाद
[14/09, 11:12 am] Vaishali Vartak: भारताचा तिरंगा चंद्रावर*

भारताच्या तिरंग्याने चंद्रावर
अधिराज्य गाजवले जगात
ध्रुवावर दक्षिण दिशेला
चांद्रयान   उतरले अवकाशात 

शास्त्रज्ञांच्या  बूध्दीचा अभिमान
भारतमातेचा मान राखलाच
बहूमान मिळवूनी साक्षीदार जाहले
भारताची शान, तिरंगा फडकलाच...!

भेटे चंदामामा  चांद्रयनाला
विसरून  असफलतेला वारंवार
आकाशाला  घालूनी गवसणी
विलक्षण मोहरला चंद्र एकवार...!

 उभे  रोमांच अंगावरती
जयजयकार  अवनीवरती  रंगला
चंद्रावरती विसावूच गौरवाने सारे
नव्या शोधावरती शास्त्रज्ञ दंगला...!

वैशाली वर्तक








काव्य निनाद साहित्य मच
*विषय - चंद्रावर तिरंगा.

चंद्र मोहीम केली यशस्वी 
मानकरी आहेत इस्रो वैज्ञानिक 
चांद्रयान-3 च्या साहाय्याने
जगी नाव झाले भारत आधुनिक

 प्रथम मान पटकविला
भारताचा ठरला अभिमान
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 
पोहचणारा रोव्हर 'प्रज्ञान'..

 स्वप्न  होते फार दिवसांचे
उतरले  प्रत्यक्षात इसरोनी 
भारताची ध्वजा फडकली
चंद्रावर आज तिरंग्यानी

 शास्त्रज्ञांनी दाविले तंत्रज्ञान 
नाही अशक्य काहीच जगात 
राहू स्पर्धेत  सदैव महासत्तेच्या 
 दाखविण्या पराक्रम नव्या युगात



DBAसाहित्यिक  मंच मुंबई आयोजित उपक्रम क्रमांक 85
विषय...चांद्रयान 3ने घडविला इतिहास

अगदी बरोबर आहे कथन
सांजवेळी चांद्रयान चंद्रावरी 
चांद्रयान 3ने घडविला इतिहास
गौरवशाली अभिमानाचा जगतावरी

 झाले सारे शास्त्रज्ञ सावध
चंद्रयान २ च्या अपयशाने
चार वर्षांच्या महेनतीने 
चमकले धव़धवीत यशाने

केले  प्रयत्न भगीरथ
इसरोच्या संपूर्ण पथकाने
जिद्दीने चिकाटीने टाकिता पावले
इतिहास घडविला नव्या जोशाने 

चंद्रभूमीवर  उमटविली 
प्रतिमा भारतमातेची 
अवघ्या जगात वाढविली शान 
देशाच्या आत्मनिर्भरतेची

प्रथम नंबर लागला  जगात
  दक्षिण ध्रुवावर आजवर
अभिमान भारत मातेचा
सांजवेळी चांद्रयान चंद्रावर

वैशाली वर्तक
अहमदाबाद




बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

करू शुभेच्छांचा वर्षाव


प्रथम वर्धापन दिनानिमित्त
विषय ...आज फुलला सोहळा
शीर्षक,....  *करु शुभेच्छांचा वर्षाव*


रोजच असे जीवनी सोहळा
तयात आज दिन  वर्धापन 
वर्ल्ड व्हिजन समूहाचे
झाले आनंदाने पुलकित  मन

न भेटता कोणी प्रत्यक्षात
लेखणीच्या साहाय्याने सारे
सहज सांगती, विचार मनीचे. 
जुळले नाते साहित्याचे न्यारे 

नवनवीन विषय मिळता
देवी सरस्वतीला स्मरती 
घेत तिचे आशीर्वाद सदा
माय मराठीची सेवा करती

गद्य ,पद्य, ललित लेखन
साहित्याची  उघडतात  दालन
स्फुर्ती मिळते सारस्वतांना
*वर्ल्ड व्हिजन समूह*  ठरे कारण

लेखणी सखी व शब्द सख्याने
आज समूहात फुलला सोहळा
शुभेच्छांचा करण्या वर्षाव
सारस्वत होणारच  ना गोळा?


वैशाली वर्तक
अहमदाबाद 
३०\८\२३

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

मी देव पाहिला

अभा म सा प डोंबिंवली समुह 02
उपक्रम 
विषय -- मी देव पाहीला

मी देव पाहिला


 हास्य  बाल्याचे निरागस 
 किती खळाळून हसे 
वाहे जसा झरा झुळुझुळु
वेगळे देवरुप काय असे

नित नियमित येता रवी
सुनील सुंदर  नभात
देव रुपाची देतो  सय
होते  रोजच प्रभात

सदा करावे सत्कर्म
देव वसतो कर्मात
तेथे पहिला देव मी
देव नसे देव्हा-यात


देता गरीबास अन्न ,
 दोन आपुलेच कवळ   
 हसताना पाहिला हसला 
 आला असता जवळ 

कळी पहा उमलली
   सुगंधाने गंधाळली
वा- यासंगे डौलताना 
उषा हसत लाजली   


सारी देवाची  करणी  
घडवितो दिनरात
देव पहाते मी फुलात
शोधा तया निसर्गात 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

विचारांचे झाड

 भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच जळगाव

आयोजित उपक्रम

२५\१\२३

विषय ..विचारांचे झाड



अंकुरावे  विचारांचे

झाड मम अंगणात

किती  होईल चांगलं

उपयोगी लिखणात


झाडांची तोडातो फुले

 तसे खुडेल मी विचार 

देता विषय समूही

क्षणात मम कविता तयार



मुलांना हवे झाड खाऊचे 

हवा तो खाऊ मिळण्या आशेवर

तसे नको कष्ट विचारांचे

विचार दिसतील झाडावर


असे गंमतीचे विचार

आले माझिया मनात

पण रचली  ना कविता

काही तरी विचारात


वैशाली वर्तक

 अहमदाबाद

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

पंचाक्षरी शब्द ... शब्दाविष्कार



शब्द

पंचाक्षरी


शब्दा वाचुनी

साहित्य  नसे 

मनोरंजन

होणार कसे          1


शब्द गुंफता

होते कविता

सदा वहावी

शब्द सरिता         2


जपा शब्दांना

नको ते व्यर्थ 

उचित हवे

तयांचे अर्थ         3


झरता शब्द

मिळते ज्ञान

दूर सारिते

सदा अज्ञान         4

     


स्तुती  करण्या

शब्दची कामी

काम साधण्या 

युक्ती  ती नामी       5


 न लागे पैका 

 गोड शब्दाला

 नका कंजुस

 त्या वचनाला         6


कटु शब्दांनी

मन दुःखते

गोड वाणीने

ते सुखावते               7


उमजे भाव

शब्दांनी असे

नसता शब्द

संवाद कसे             8


वैशाली वर्तक










आजचा शब्द

साहित्यात एकंदर

खेळ असे तो शब्दांचा

पूर येतो कल्पनेला

पसारा तो विचारांचा


शब्द भंडार हवाच

रचताना  काव्यओळी

छंद वृत्त यमक ही

हवे मनी सदाकाळी


गद्य पद्य वांडमयाचे

असं किती ते प्रकार

कोटी करिता शब्दांची

होई साहित्य साकार


जुळवूनी शब्द शब्द

होते तयार लिखाण

असो मग ते गद्य पद्य 

शब्दांचीच असे खाण


मुल्य सर्वदा शब्दांचे

जाणे शब्द शिल्पकार

शब्द ओविता उचित

करी तो शब्दाविष्कार


भाषा नटविण्या हवे

शब्दांवर ते प्रभुत्व

खेळ शब्दांचा मांडता

कळे शब्दांचे महत्व






करु वर्षाव शुभेच्छांचा

वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई, आयोजित शिवशक्ती काव्यलेखन स्पर्धा
स्पर्धेसाठी
प्रथम वर्धापन दिनानिमित्त
विषय ...आज फुलला सोहळा
शीर्षक,....  *करु शुभेच्छांचा वर्षाव*


रोजच असे जीवनी सोहळा
तयात आज दिन  वर्धापन 
वर्ल्ड व्हिजन समूहाचे
झाले आनंदाने पुलकित  मन

न भेटता कोणी प्रत्यक्षात
लेखणीच्या साहाय्याने सारे
सहज सांगती, विचार मनीचे. 
जुळले नाते साहित्याचे न्यारे 

नवनवीन विषय मिळता
देवी सरस्वतीला स्मरती 
घेत तिचे आशीर्वाद सदा
माय मराठीची सेवा करती

गद्य ,पद्य, ललित लेखन
साहित्याची  उघडतात  दालन
स्फुर्ती मिळते सारस्वतांना
*वर्ल्ड व्हिजन समूह*  ठरे कारण

लेखणी सखी व शब्द सख्याने
आज समूहात फुलला सोहळा
शुभेच्छांचा करण्या वर्षाव
सारस्वत होणारच  ना गोळा?


वैशाली वर्तक
अहमदाबाद 
३०\८\२३

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

सांजवेळी चांद्रयान चंद्रावरी

अखंडित कल्याणकारी काव्य समूह आयोजित उपक्रम क्रमांक 42
काव्यलेखन
विषय ..सांजवेळी चंद्रयान चंद्रावरी

वेळेला पक्के होते चंद्रयान
वेध लागले प्रत्येक नागरिकास
त्याच्याच कडे नजर लावून
प्रतिक्षेत बसले तया पाहण्यास

सांजवेळी चांद्रयान चंद्रावरी
 निहाळती  तुज जन  आनंदूनी
गौरवाने अभिमानाने गजर
भारत मातेचा करी आवर्जूनी

भुवरी टाळ्यांचा कडकडाट 
दिवा देवाजवळ यशाचा
तेजाळती नारी आनंदाने
  विक्रम चंद्रयानच्या विजयाचा

उतरणार चंद्रयान चंद्रावर
दिन ठरणार सोनियाचा
विश्वात शोभून दिसणार भारत
आत्म विश्वासाने केलेल्या कामाचा

 आणि,फडकला तिरंगा चंद्रावर
वेळेवर टाकिले अचूक पाऊल
विजय पताका झळके जगावर
विक्रम घेतोय दक्षिण ध्रुवावर चाहुल 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

ओघळ. शब्द गंध सिंगापूर

 ओघळ 

दि 23-8-23

बालकाचे रडणे पाहून

मातेच्या मनी उठे खळबळ

हुंदके देत देत रडताना 

गालावर चे पुसते ओघळ


पापण्यांच्या कडा वर 

अडलेला अश्रुंचा ओघळ.       

हळुच गालावर घसरता

चेहरा लपविता उडे गोंधळ


निसर्ग निर्मित ओधळ

दिसती सदैव विलोभनीय 

कडे कपारीतून वर्षा धारांचे

भासे शुभ्र दुग्ध धारा रमणीय


संपता लग्न सोहळा आनंदात

येता प्रसंग  वधू पाठवणी

येती डोळा अश्रूंचे ओघळ

अनावर होती मनी साठवणी


काळ्या मातीला कसून

बळी  गाळीतो घामाचे ओघळ

येता दिन सुगीचे शिवारी

भरतो सुख समृद्धीची ओंजळ


सुख दुःख  भावनांचे

वाहती जीवनी ओघळ

जीवन असे जणु कविता 

शब्दांनी भरते ओंजळ .

सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३

अवखळ मोहक ( फुल पाखरु)


दि.20\8\23
... फुलपाखरू
शीर्षक..*अवखळ मोहक*

भिरभिरते फुलपाखरू
बसले क्षणी फुलावर 
अलवार स्पर्शे फुलास
लगेच उडाले दुजावर.       1

रंग तयांचे किती सुंदर
जणु पाकळ्याच मोहक
कोणते पाखरु ?, कुठलं फुल?
दोघेही चित्ताला वेधक.         2

 करी  हितगुज फुलांशी
थांबण्या नसे वेळ पळभरी
झुळूके सरशी फुल डौलता
उडून गेले की  क्षणभरी    3

किती प्रकार किती जाती
लहान मोठी विविध रंगात
काहीं वर  ठिपके बारीक
पंख हलवते क्षणा क्षणात.        4

अंडी ,अळी, कोष, पाखरू
चार अवस्था करुन पार
घेते  अवखळ मोहक रूप. 
भिरभिरण्या झाले तयार.         5

वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात)

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

भाकर चटणी

भाकर चटणी*

गोल चंद्रा समान
ताजी पाहून भाकरी
भुक माझी चाळवली
आनंद भाव मुखावरी

त्यावर चविष्ट चटणी
कुटलेली खलबत्त्यात
वाट पहाती हात
 कधी जाईल मुखात

किती असो पंच पक्वान्ने
सजलेली  ती ताटात
भाकर चटणी समोर
भासती फिकी भोजनात

 अशा भोजनाची मजा
घ्यावी  जाऊन शिवारी
 देत तृप्तीची ढेकर 
मजा येते लई भारी. 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

श्रम अनुभव श्रम

अभा ठाणे जिल्हा समूह १
उपक्रम 202
विषय - श्रम

श्रम करावे जीवनी
हवे जर यश पदरी
नसे उध्दार जगती
श्रम महिमा अधरी

सर्व  थोर सांगताती
विना श्रम नसे फळ
होण्या यशस्वी  जगी
श्रमाचेच हवे बळ

किटक मुंगी करी श्रम
जगण्याचा आहे  मंत्र 
परिश्रमा विणा नसे
संपतच नसे तंत्र 

पक्षी करिती गोळा
श्रम करिती बांधण्या घर
बळीराज करे श्रम
आपणा मिळण्या भाकर


हातावर हात ठेवूनी
बसत नसे कोणी
प्रत्येकाला  हवे काम
तरच मिळे खाण्या लोणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

श्रम

अभा ठाणे जिल्हा समूह १
उपक्रम 202
विषय - श्रम

श्रम करावे जीवनी
हवे जर यश पदरी
नसे उध्दार जगती
श्रम महिमा अधरी

सर्व  थोर सांगताती
विना श्रम नसे फळ
होण्या यशस्वी  जगी
श्रमाचेच हवे बळ

किटक मुंगी करी श्रम
जगण्याचा आहे  मंत्र 
परिश्रमा विणा नसे
संपतच नसे तंत्र 

पक्षी करिती गोळा
श्रम करिती बांधण्या घर
बळीराज करे श्रम
आपणा मिळण्या भाकर


हातावर हात ठेवूनी
बसत नसे कोणी
प्रत्येकाला  हवे काम
तरच मिळे खाण्या लोणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

मोल स्वातंत्र्याचे

उपक्रमासाठी...
काव्य निनाद साहित्य मंच,पुणे.
आयोजित 
साहित्यिक उपक्रम - ३४२
दिनांक - १४ व १५ ऑगस्ट २०२३
विषय - मोल स्वातंत्र्याचे..

 होत होते अत्याचार  अमाप
 सहावेना  जनतेला पारतंत्र्य
आपल्याच देशात  नव्हते
 आपणास   कसलेच स्वातंत्र्य 

पेटून उठले भारतीय
पेटविण्या मशाल स्वातंत्र्याची
हसतमुखे झाले उदार  जीवावर
दिली  क्रांती वीरांनी आहुती प्राणांची 

आज आपण आहोत स्वतंत्र
पण मोल जाणा त्या स्वातंत्र्याचे
सदा राहू एकजूटीने 
न विसरता ऋण क्रांती वीरांचे

आठवा त्या शहीदांना
वंदे मातरम् म्हणत चढले फाशी
व्यर्थ न जावो त्यांचे बलिदान
तिरंगा सदैव फडकत राहो आकाशी

देशप्रेम देशभक्ती ची मशाल
तेवत राहो सदा अंतरी 
स्वातंत्र्याचे  मोल जाणता
अभिमानाने मान उंचावते खरोखरी 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

काव्य बत्तीशी\ हल्ली मन फार दाटते \मने झालीत दूर

 मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित उपक्रम

काव्य लेखन

विषय .. हल्ली मन फार दाटले

     7/9/7/9


झालंय खरं असे

हल्ली मन फार दाटते

जसे वाढले वय

मन उगाच घाबरते.  1


 मुले घेण्या भरारी 

 गेली दूर परदेशात

सणवार येताची

भेटणे नाही प्रत्यक्षात.  2


नुरला साधेपणा 

दिखावा मात्र अतिशय

जन झाले नाटकी

 तीळमात्र नसे संशय. 3


 पूर्वी घरे लहान 

बदलले रहाणीमान 

आता जन दोनच

घर असते आलिशान. 4


संस्कार संस्कृतीचा

पडत चालला विसर

दाटते सारे मनी

  हे चालणार कुठवर.   5


वैशाली वर्तक

अहमदाबाद




मोहरली लेखणी साहित्य समूह 

काव्य बत्तीशी प्रकार 

विषय.. मने झालीत दूर

२७\६\२४ 

 ७\९\७\९

आहे खरे कथन.         

लोप पावला  आता काळ 

मने झालीत दूर 

स्नेह  भावनेचा दुष्काळ 


 आपापल्यात व्यस्त 

कुटुंब दिसती विभक्त 

संवाद  संपुष्टात 

होत नाही बोलून व्यक्त 


भौतिक साधनांचा 

आलाय सर्वत्रची  पूर

 हवी  जवळी सदा 

 संवादातून  केले दूर


 येता सण उत्सव 

 जमून सारे आप्त जन

भेटी गाठी घडती

 आनंदाचे  तेची ते क्षण


वैशाली वर्तक 

अहमदाबाद


दरवळणारा स्वप्नगंध


चतुर्थ वर्धापनाचा दिन
आज  करुया साजरा
दरवळणारा स्वप्नगंध
सारस्वतांना ठेवी हासरा


हाताळले समूहाने सहज
अगणित साहित्य प्रकार
प्रशासक  हे चोखंदळ
दिधले ज्ञान आम्हा अपार

देऊन विविध विषय 
संधी दिधली दावण्या चुणुक
सारस्वतांना मिळता खाद्य
सरसावती होऊनी उत्सुक 

दरवळणारा स्वप्नगंध
सेवा माय मराठीची करितो
नको नुसते बोलणे मुखाने
प्रत्यक्षात मायभाषा वाढवितो

किती वर्णू , गावू गुणगान
असाच चालो  समूह सदैव
दरवळती अनेक समूह गंध
पण स्वप्नगंध असे एकमेव

वैशाली वर्तक
अहमदाबाद

आयुष्य तेच आहे



विषय.. आयुष्य तेच आहे


नित्य नेमाने करितो उषा 
रवी येऊनी  गगनी
यामिनीचा तोच शशी
रास खेळतो तारांगणी

रोजची तीच ती सकाळ
न घडता  तयात बदल 
ओघाने येतेच , तेच जगणे
 न वाटे मनाला नवल

नव्या आशेच्या किरणांनी
मानवच शोधतो नावीन्य
करण्या आनंद सोहळा
मिळवितो जीवनी प्राविण्य 

 नदी  आक्रमिते मार्ग
 वाट खडतर , वाहे अविरत
सागर लहरी येती उचंबळुनी
भेटती  किना-यास उसळत

सर्व सर्वची,  असे तेची
 जन्म ते  मृत्यूच्या अवधीत
 आयुष्य आहे, तेच ss तेच 
अबाधित राखावे सदोदित 

 तेच ते  असता आयुष्य
संगीताच्या  सप्त सुरात
इंद्रधनुच्या सप्त रंगाने
जगू आयुष्य, घेत हाती हात


 वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

लेख. चित्रावरून ललित लेखन

कल्पतरू जागतिक साहित्य मंच
आयोजित उपक्रम
ललित लेखन चित्रावरून 
         सहजीवन

"ये ग जवळ अशी, .देतो ना मी तुला फुल माळून.  छान जमत मला."
कधीचा प्रयत्न करीत असलेल्या स्नेहाला जवळ बोलवत  रविंद्र  उद्गारला.
व शेवटी  न राहवून जवळ ओढून फुल  माळण्यात मदत रुप झालाच .
 आहेच  हे जोडपे असे.   म्हणतात ना काय ते ..made for each other.
या मनीचे त्या मनी अगदी सहजची उमजते दोघांना.
थोडक्यात काय लग्न समारंभात आप्त जनांनी व आईबाबा नी दिलेल्या शुभेच्छा.
*नांदा सौख्यभरे* अगदी तंतोतंत फळल्या आहेत असेच म्हणायचं.
किंवा दोघेही समजुतदार आहेत. एकमेकांना समजून उमजून राहणं
वागणं आहे तयांचे. रविंद्रचे तिच्या भावनांचा पूर्ण विचार करूनच   वागणे असते.
त्यात आज त्यांच्या काॅलेज च्या  मित्र मैत्रिणींचे reunion चे गेट टुगेदर होते.
कॉलेज काळात त्यांची जोडी गाजलेली होती. तेव्हा पासून मन एकमेकांना दिली होती.
रविंद्र फार विनयशील व त्याचा हाच स्वभाव स्नेहाला आवडायचा. किती हुशार आहे पण,जरा अभिमान नाही, नेहमी त्याच्या स्वभावाचे कौतुक करत असायची.
सहजीवन छान चालले होते.
रविंद्र तिच्या आवडी निवडी सतत जपायचा. तिची बॅकेत सर्विस व त्याची corporate कंपनीत चांगल्या पदावर नोकरी.त्यात त्याचे कालच pramotion झाल्याने दोघेही खुशीत होते.
तर अशा सुखी समाधानी जोडप्याचे सुखी सहजीवन होते.
दोघं तयार झाले काय योगायोग पहा किती मन जुळलेली ...दोघे तयार झाली तर मन तर जुळलेली च पण रंग संगतीत पण एकरुपता दिसली.. त्यावर स्नेहा हसून म्हणाली  
अरे,तुला कसे कळले मी लव्हेडर रंगाची साडी नेसणार. .तुझा पण रंग तोच आला.
रविंद्र हसत बोलला ,"उगा का जन म्हणतात ,"दोन तने  एक मन." आहेत आपली.
त्याने फुल माळत असता, स्नेहाने त्याला संसाराच्या वेलीवर वर फूल उमलणार आहे ही
गोड बातमी त्याला हळूच  कानात दिली. त्यामुळे दोघे अजूनही खुशीत होते.
 तेवढ्यात  गीताचे स्वर कानी आले     

  देवा दया तुझी  ही
की शुध्द दैवलीला              
लाखो न दृष्ट माझी 
माझ्याच वैभवाला

   वैशाली वर्तक
अहमदाबाद.

ऋण तयांचे

घेता जन्म मानवाने
नाते जडते कुटुंबाशी
माता पिता कुटुंब जन
मातृभूमी मातृभाषेशी

 ऋणी मी पण  सा-यांचा
 देणे लागतो गुरु जनांचे
माता पितांनी केले मोठे
सारे श्रेय कुटुंबियांचे

समाजाचे पण असती ऋण
ज्या लोकांत वावरलो
समाजाच्या गरजा पुरविण्या
त्यांचा मी ऋणी लागतो

मातृभूमी कुशीत जियेच्या
वाढलो घडलो कर्तृत्ववान
राहणार सदैव ऋणी तीयेचे
पूर्ण करू  स्वच्छतेचे अभियान 


फेडणे असेची अशक्य 
ऋण  माता पिताचे मजवर
 ईश्वराने दिधला मानव जन्म
ऋण तयाचे.  जन्मभर

वैशाली वर्तक
अहमदाबाद 



निवांत

 साकव्य काव्य स्पर्धा 26

स्पर्धेसाठी

विषय ... निवांत 


शांत शांत अगदी निशांत

क्षण फिरुनी यावे निवांत


 सुख, शांति  अन् आनंद ,

  मिळविण्याचा असे छंद

  सारे वसती  आपुल्याच  मनात

  क्षण फिरुनी यावे निवांत.            1


मन शोधी सदैव शांती                

जीवाला न कदापि भ्रांती 

वाटे मनाला हवा एकांत

क्षण फिरुनी यावे निवांत                 2             

                    

 मजेत  विहरती पहा विहंग

 गुरे  निवांतात  करीती रवंथ

कसा मिळतो क्षण तया शांत

 क्षण फिरुनी यावे निवांत.                3

                                                  .      

तप्त किरणांना  शमवून

जातो धरेच्या कुशीत लपून

येतो गगनी शशीकांत

क्षण फिरुनी यावे निवांत.                 4


वैशाली वर्तक

अहमदाबाद

सोमवार, ३१ जुलै, २०२३

म्हणीवरुन ......अती तेथे माती

 अ भा म सा पण ठाणे जिल्हा 2

आयोजित उपक्रम

विषय.  अती तेथे माती


सर्वच  हवे आटोक्यात

अती होता घडे विनाश

जलधारा जरी गरजेच्या

 जास्त होता दिसे सर्वनाश


सकस आहार असे जरुरी

सेवन करता नको अधाशी

बिघडते स्वास्थ अती प्रमाणात 

रहा मग दोन दिवस उपाशी


संयम हवाच मनाला

उठता बसता सदा पाळावा

जगणे करण्या आनंददायी

कटाक्षाने अती लोभ टाळावा


 विज्ञानाने जीवन सुखी

पण नका होऊ अहारी

दुष्परिणाम त्यांचे होता

जीवनात  संकटे भारी


वैशाली वर्तक

अहमदाबाद

मोरपंखी स्पर्श

  प डोंबिवली समूह 2

विषय - मोरपंखी स्पर्श 


होता सुखद पहाट

रवी येताच नभात

रम्य सोनेरी  शलाका

उजळती गगनात


सोनसळी किरणांचा

स्पर्श होता वसुधेला

कशी लाजते हासूनी

पाहताच आदित्याला


मोरपंखी स्पर्श होता

दल पुष्पांचे खुलले

मंद सुगंध पसरे

दाही दिशा  दरवळे


मंद झुळुक वा- याची

करी गंधित सकाळ

अलवार पानावरी

शोभे दवांची ही माळ


वाटे सुंदर  दृश्याने

मोरपंखी अलवार

स्पर्श  किरणांचे सदा

जग  उजळले हळुवार



किलबिल येते कानी

गोड   तो  किलबिलाट

मंद स्वर भुपाळीचे

किती रम्य ती पहाट


वैशाली

रविवार, ३० जुलै, २०२३

धबधबा. जलप्रपात

आधी रिमझिम जलधारा
पसरला पाचूचा रंग हिरवा
खळ खळ वाहती नद्या नाले
जनांना आवडे ऋतु बरवा

ढोल ताशांच्या गर्जना
धुवादार   बरसात
भासे फाटले आभाळ
वारा वाहे जोशात 

जलाशय तुडुंब भरली सारी
दिसे टेकड्या डोंगर नितळ
 दुग्ध रुपी पडे हा जल प्रपात
 तर कुठे शुभ्र जलाचे ओहळ.


 जल तत्व पंचत्वातील
मुक्त हस्ते वरूणाचे दान
जलचर सृष्टीची गरज
जलप्रपात निसर्ग किमया महान.

..सहाक्षरी..पावसाळी सुट्टी .../आर्त विनवणी

 आ भा म सा पण  मध्य मुंबई समूह क्रमांक २

आयोजित उपक्रम

षडाक्षरी रचना

विषय..पावसाळी सुट्टी



सुट्टी ती शाळेला

आनंद दायक

अती वृष्टी होता 

मिळे अचानक


मन आनंदले

सोबती जमले

मनात देवाचे

आभार  मानले


केले नियोजन

 कुठे  जमायचे

 खेळत खेळत 

कसे भिजायचे


होती छत्री हाती 

अंगा झोंबे वारा 

मजेच झेलल्या 

पावसाच्या धारा


पागोळया झरती 

दाराच्या समोर

पिसारा फूलता

पाहिला तो मोर


अवचित सुट्टी

दिली पावसाने 

रोज  असे यावे

खेळु आनंदाने 



वैशाली वर्तक

अहमदाबाद






कल्याण डोंबिवली महानगर 1

आयोजित उपक्रम

विषय ..येरे येरे पावसा

शीर्षक.. आर्त विनवणी 


येणार तू नक्की 

केली बी पेरणी

 बरस ना आता

 किती विनवणी           1


कष्ट करुनिया

घाम तो गाळून

केली मेहनत 

शिवारी कसून             2


ऐनवेळी आता

का रे तू रूसला

कुठे गेले मेघ   

 लपून   बसला           3



मृगाच्या पाण्याने

जीवा लागे आस

फुटतील बीजे

धरिला तो ध्यास         4


बरस रे मेघा

नको पाहू अंत

बळीची वाढवू

नकोस तू खंत             5


नेहमीच तुझे

दाखवितो खेळ

वेळेत न येणे

जमव तू मेळ                6


वैशाली वर्तक

अहमदाबाद



शुक्रवार, २८ जुलै, २०२३

हसले मनी चांदणे

 कल्याण डोंबिवली महानगर 2 

आयोजित उपक्रम 

विषय.हसलेमनी चांदणे 









मना जोगते  होता काम 

आनंदले माझे मन

चकाकत्या उन्हात पण

भासे फुलले नंदनवन


भाव मम अंतरीचे

तयाने सदैव जाणिले

सहज देत हात हाती

सप्त रंगी रंगविले


सहवास त्याचा माझा

प्रीत गंध पसरला

एकमेका देत साथ

संसार ही फुलवला


देवाने.  सारे दिले

महत्वाचे दिले समाधान

भरुन पावले जीवनी

तेच ठरले सर्वोत्तम दान


झाले मनाने संतृप्त

काही न उरे मागणे

हसले मनी चांदणे 

हेची देवास सांगणे




वैशाली वर्तक 

अहमदाबाद





मंगळवार, २५ जुलै, २०२३

करू वन संवर्धन \ वृक्षारोपण

अखंडित कल्याणकारी काव्य
आयोजित उपक्रम
विषय..करू वन संवर्धन
   *वृक्ष सोयरे साथी*
वेळ आली आहे आता
वनांकडे देणे लक्ष
राने वने केली नाश
 वृक्षारोपण   दुर्लक्ष 

करा लगबग आता
लावा आपापल्या अंगणी
पुष्प भाज्यांची रोपे  
पहा हिरवी धरणी

लावू वृक्ष  सभोवती
निसर्गाचे संवर्धन 
शुध्द हवेचे योजन
आरोग्यासाठी वर्धन

वृक्ष असती सोबती
देती अन्न न  निवारा
करी माया देत छाया
जीवनासाठी सहारा 

वृक्ष संवर्धन करा
 -हास थांबवा वनांचा
येता संपुष्टात वायु
टाळा प्रसंग धोक्याचा

वैशाली वर्तक
अहमदाबाद




आ भा म भा प शब्दभाव
आयोजित उपक्रम
विषय.. वृक्षारोपण 


बरसत आहे सरीवर सरी
अलवार जणू रेशीम धारा
दिसतेय हिरवळ सर्वत्र
 जणू पाचूचा पसरला पसारा

करा लगबग आता
लावा आपापल्या अंगणी
पुष्प भाज्यांची रोपे  
पहा हिरवी धरणी
 
लावता वृक्ष  सभोवती
वाढेल सुंदर पर्यावरण
शुध्द हवेचे  नियोजन
आरोग्याचे करेल वर्धन

वृक्षारोपण केल्याने 
मिळेल प्राणवायू  आपणाला
प्रगतीच्या नावे केलीय वृक्ष तोड 
 आता दुःख  होतय मनाला

वैशाली वर्तक
अहमदाबाद

शनिवार, २२ जुलै, २०२३

पत्र लिहिण्यास कारण की...... आठवणी मनीच्या

 भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच बुलढाणा आयोजित उपक्रम

राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा

विषय..पत्र लिहिण्यास कारण की,

शीर्षक...*आठवणी मनीच्या*


दिन हरपले राहिल्या फक्त आठवणी

वाट पहात बसणे  वाटे भारी

कधी येईल पोस्टमन 

पत्र देण्या आपल्या दारी


विचार पूस होई एकमेकांना

आला का ग पोस्ट मन 

पत्र नाही मुलांचे कधीचे

काळजीत जातात एक एक क्षण


आता नाही मजा पत्राची

तेच तेच पत्र वाचण्याची

वाचून घडी करुन जपून 

ठेवलेल्या  अनेक पत्रांची


आता केले विज्ञानाने

जग अतिशय सुलभ

प्रत्यक्ष पहाणे होते क्षणात

काळजी , चिंतेचे नुरे मळभ


वैशाली वर्तक

अहमदाबाद

शुक्रवार, २१ जुलै, २०२३

पावसाच्या कविता बरसला घननिळा! हिरवळ दाटे चोहीकडे !लपंडाव हाहाकार खेळपावसाचा त पाव. साचा


 अ भा म सा परिषद शब्दभाव

आयोजित

काव्यलेखन

विषय..बरसला घननिळा

शीर्षक...ऋतू हिरवा*


झाली मृगाची बरसात

तप्त  अवनी तृप्त जाहली

दरवळला मृद्गंध आसमंती

वृक्ष  लता फोफावली


गरजत बरसत या मेघांनो

नको नुसती गर्दी गगनात

गडगड करित बरसा रे

पेरणीची झाली वेळ शिवारात


वाहतील झरे खळखळ

भासतील शुभ्र दुग्ध धारा

हास्य लोभस ते निसर्गाचे

गीत गाईल थंड मंद वारा


 बळीराजा खुश होईल

 काम करेल  शिवारी

 स्वप्न रंगवेल मनी

 गोड लागेल भाकरी


वाहता जल कडे कपारीतून

होईल रंग धरेचा हिरवा

रानमाळ डोंगर सजतील

करु साजरा ऋतू बरवा

झाकोळते आकाश मेघांनी
 भासे  भर दिवसा  सांज
जल बरसूनी जाता पुन्हा 
दर्शन देतात रवी राज

बरसला घन निळा 

 वाटे समाधान मना

दूर केली मरगळ सृष्टीची

सृजनता दिसे क्षणा


वैशाली वर्तक 

अहमदाबाद


हिरवळ चोहीकडे 

===============

रुक्ष धरा येता वर्षा

पहा कशी बहरली

ओली चिंब झाली धरा

तृणांकुरे अंकुरित


रूप पहा वसुधेचे

किती भासे मनोहर

जणु हिरवे गालिचे

भासे सर्वत्र सुंदर


चिंब भिजली अवनी

हिरवळ चहुकडे

मोह न आवरे मनी

वाटे पाहू कुणीकडे


 रानमाळ हिरवट

वृक्ष वेली बहरल्या

रंग एकच धरेच्या

भासे पाचू पसरला


झरे वाही खळखळ

भासे शुभ्र दुग्ध धारा

हास्य लोभस निसर्ग

गीत गाई थंड वारा


वाटे पहात रहावे

किती पाहू कुठवर

दृश्य पहाण्या मोहक

जन उभी  क्षणभर




लपंडाव खेळत पावसाचा




येता श्रावण महिना
हिरवळ दिसे चोहीकडे
क्षणात चमके  ऊन
दुस-या क्षणी सर पडे

हिरवी झाडे हिरव्या वेली
हरित रंगच दिसे सर्वत्र 
पांधरुन शाल हिरवी
अवघ्या धरेचा रंग एकमात्र

आभाळात ढगांचा गडगडाट
दामिनी चमके काळ्या ढगात
सर पडूनी जाता पुन्हा 
सूर्य   ढगातून डोकवे नभात

लंपडाव ऊन पावसाचा
पडे सरीवर सरी तालात
धरेला चिंब भिजवूनी
उन्ह कोवळे पडे क्षणात

झाकोळते आकाश मेघांनी
 भासे  भर दिवसा  सांज
जल बरसूनी जाता पुन्हा 
दर्शन देतात रवी राज

लपंडावाच्या या खेळातून
मधेच दिसे इंद्रधनु शानदार      
लोभस रुप  पहा निसर्गाचे       
श्रावण मास असे बहारदार       


वैशाली वर्तक.
अहमदाबाद 

कल्याण डोंबिवली महानगर 1
आयोजित उपक्रम
विषय ..येरे येरे पावसा
शीर्षक.. आर्त विनवणी 

येणार तू नक्की 
केली बी पेरणी
 बरस ना आता
 किती विनवणी           1

कष्ट करुनिया
घाम तो गाळून
केली मेहनत 
शिवारी कसून             2

ऐनवेळी आता
का रे तू रूसला
कुठे गेले मेघ   
 लपून   बसला           3


मृगाच्या पाण्याने
जीवा लागे आस
फुटतील बीजे
धरिला तो ध्यास         4

बरस रे मेघा
नको पाहू अंत
बळीची वाढवू
नकोस तू खंत             5

नेहमीच तुझे
दाखवितो खेळ
वेळेत न येणे
जमव तू मेळ                6

वैशाली वर्तक
अहमदाबाद






ओला दुष्काळ 

हाहाःकार पावसाचा
***************
असूनही आवडता
जलचर ह्या सृष्टी चा
किती रे तू माजविला
हाहाःकार पावसाचा

असा कसा तू पर्जन्या
गरजेला  नसतोस
आली आता दिपावली
परतणे टाळतोस

सहवेना तुझा त्रास 
किती अंत पहायाचा
कसे म्हणू तुला त्राता
हाहाःकार पावसाचा

बस कर तुझा खेळ
परतीची झाली वेळ
तुझ्या  अशा वागण्याने
कधी होई सुखी मेळ

उभे पीक शिवारात
आहे पहा डौलदार 
नको आता बरसणे
ओल्या दुष्काळाचा भार

गेला संसार वाहूनी
मेहनत गेली वाया     
मूर्ती पण न राहिली
कसे पडू देवा पाया

ऐक विनवणी आता
हेच एकची मागणे
संयमाने वाग जरा
करा सुखाचे जगणे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


ओला दुष्काळ 

हाहाःकार पावसाचा

असूनही आवडता
जलचर ह्या सृष्टी चा
किती रे तू माजविला
हाहाःकार पावसाचा

असा कसा तू पर्जन्या
गरजेला  नसतोस
आली आता दिपावली
परतणे टाळतोस

सहवेना तुझा त्रास 
किती अंत पहायाचा
कसे म्हणू तुला त्राता
हाहाःकार पावसाचा

बस कर तुझा खेळ
परतीची झाली वेळ
तुझ्या  अशा वागण्याने
कधी होई सुखी मेळ

उभे पीक शिवारात
आहे पहा डौलदार 
नको आता बरसणे
ओल्या दुष्काळाचा भार

गेला संसार वाहूनी
मेहनत गेली वाया     
मूर्ती पण न राहिली
कसे पडू देवा पाया

ऐक विनवणी आता
हेच एकची मागणे
संयमाने वाग जरा
करा सुखाचे जगणे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित उपक्रम क्रमांक १०२०
हायकू काव्य प्रकार 
विषय.  श्रावण सरी 

रेशीम धारा 
पडती रिमझिम
 झोंबतो वारा

खळाळणारे
 कड्यावरुनी प्रपात
 वारा जोरात

 सरी पडता 
भिजण्याची ती हौस
  भावे   पाऊस

मधेच ऊन
सूर्य मेघांचा खेळ 
मजेचा वेळ 

धरा सजली
नटूनिया बैसली 
  तृप्त जाहली 

शालू हिरवा
नेसलेली वसुधा 
दिसे बरवा

श्रावण सरी
गाऊ पाऊस गाणी.                                                                      
सर्वत्र पाणी 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद






विषय - पर्जन्यवृष्टी

     सजली सृष्टी 

होता आगमन पर्जन्याचे
 तप्त धरणी न्हाली जलाने
भरले सारे खाच खळगे
पांघरिला हिरवा शालु  वसुधाने

तृप्त  झाले कण-कण मातीचे
हिरवळ पसरली चोहीकडे
एकच रंग झाला धरेचा
वाटे कितीदा पाहू  रूप गडे

लता वृक्ष वेली बहरल्या
सजली धरा नव वधू परि
पानोपानी दव बिंदु चमकून
आभुषणांचा भास  करि

उजाड रानमाळ झाले हिरवे
मयूर मनोहर नृत्य करी
आनंदे डोलती तरु लता
लाजूनी  वसुंधरा पाही तरी

डोंगर कपारी तून वाही
शुभ्रजल धारा ओढ्यांच्या
भासती जणू   ल्याला भर-जरी
 हिरव्या गार  शालू  काठाच्या 


वैशाली वर्तक
अहमदाबाद




DBAसाहित्यिक नाशिक 
क्रमांक 229
विषय ..   डोंगर द-याखो-या फुलले निसर्ग सौंदर्य 



बरसत आल्या वर्षाधारा
तप्त अवनी तृप्त जाहली
ओला सुगंध पसरे आसमंती
 वृक्ष वल्लरी   रानी फोफावली



वाहताती झरे खळखळ
भासती शुभ्र दुग्धची  धारा
 लोभस हास्य ते निसर्गाचे" 
गीत गात वाहे थंड वारा



वाहता जल कडे कपारीतूनी
झाला धरेचा  पहा रंग हिरवा
रानमाळ डोंगर सारे सजले
दिसे मीहक ऋतू  तो बरवा



पावसाने केली जादु खरी
उधळून अवघा एकची रंग
भिजली पाने भिजली राने
दशदिशा जणुआनंदात  दंग



तृप्त जाहले कणकण मातीचे
हिरवळ पसरली चोहीकडे
लाल पिवळी इवली रान फुले
जणु बुट्टे रेखाटले कुणी गडे    



वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अष्टपैलू कला आकादमी मुंबई
विषय - खट्याळ पावसा

शीर्षक -  *खट्याळा कधी रे कळेल तुला*
अष्टाक्षरी रचना

 तुजवरी च पावसा
आधारित सारी सृष्टी
तरी का तू न ठेविशी
तीजवरी कृपादृष्टी            1

सुधा भ्रमण करिते
नित्य नेहमी नेमाने
म्हणूनच येती जगी
ऋतू चक्र हे क्रमाने

पण पावसा तूझाच
दिसे तो चुकारपणा
राही अडूनी वेळेला
दावी सदाची मी पणा

 येता कधी न वेळेत
करी कधी तो उशीर
पाण्या विना भुकेलेली
पहा दिसती शिवार


विना पाणी जीव सृष्टी
कशी  सांग बहरेल
प्राणी मात्र  तुजविण
कसे काय वाचतील

कधी येशी अवचित
कष्टी होई बळी मनी
जाते वाहूनी हातचे
दुःखी होई क्षणोक्षणी

अती वृष्टी करुनीया
नेतो वाहूनी शिवार
बळी होतसे हताश
सर्व परीने बेजार

उभे पीक मोत्यासम
पाहुनिया सुख वाटे
नको तेव्हा बरसणे
मनातूनी दुःख दाटे.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद (गुजरात)
मो नं 8141427430


सिद्ध साहित्यिक समूह 
आयोजित उपक्रम क्रमांक 567
29/8/24
विषय... पाऊसधारा
आठोळी रचना

  *बळीची मनीच्या*

गर्जत बरसत या मेघांनो
नको नुसती गर्दी *गगनात*
गडगड करित बरसा रे
पेरणीची झाली वेळ *शिवारात*
 वर्षा धारा झरझर बरसता 
खूष होईल बळी *मनामनात*
 काळी माय पहा अंकुरेल 
सुगीचे दिन पाहील तो *स्वप्नात*

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

प्रवासी


मिळेल  आनंद मनोमनीमोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित उपक्रम ८२२
काव्यलेखन
विषय.. प्रवासी 

आपण सारे प्रवासी
आलो या भू तलावरी 
कोण कुठला कोठूनही आला
आहे का जाण  कुणा तरी?

जीवन असे प्रवास एक
असती तयाते टप्पे तीन
बाल्य ,तारुण्य ,वार्धक्य
आनंदाने जगू न होता दीन

लेकरे सारी आपण ईश्वराची
नाते जडले विश्व बंधुत्वाचे
मानवता हाची धर्म आपुला
सहप्रवासी सारे जीवन यात्रेचे

कुणास नसतेची ठाव
कोण केंव्हा उतरणार
गुण्या गोविंदाने चालता
कोणाची यात्रा संपणार

जीवन यात्रेत नक्की करू
 भार देऊन सत्कर्मावर
 मदतीचा हात देता
जीवन प्रवास होईल सुखकर 


वैशाली वर्तक
अहमदाबाद

गुरुवार, २० जुलै, २०२३

आयुष्याच्या पानावर


अभा ठाणे जिल्हा समूह १
उपक्रम 
विषय - आयुष्याच्या पानावर

      रंगीत पाने

पाने उलगडली आयुची
प्रत्येक  पान  होते सुंदर 
एक एक करीता सरली
अनुभवली ती मनोहर

बालपणीचे निरागस
होते पान आनंदित
नव्हते त्यात हेवेदावे
चिंता क्लेश विरहीत

यौवनाचे होते गुलाबी
रंगविली स्वप्ने मनी
कधी बागेत समुद्र  किनारी
आता आठवणी, या क्षणी

 आले कर्तव्य  कर्तृत्वाचे 
 नजरे समोर  ते पान
 स्फुरण चढले मनात
कसा मिळविला जगी मान

रंगलेल्या, आनंदल्या जीवनी
पान आले समाधानाचे
दिधले सारेची विधात्याने
मानते आभार देवाचे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

वरची कविता अष्टाक्षरी त



रंगीत पाने


पाने चाळली आयुची
पान  प्रत्येक सुंदर 
निहाळली सरलेली
होती सारी मनोहर 


बाल्यातले निरागस
होते पान आनंदित
नाही त्यात हेवेदावे
चिंता क्लेश विरहीत


यौवनाचे  ते गुलाबी
रंगविली स्वप्ने मनी
 कधी वनीं उपवनी
ताज्या झाल्या आठवणी 

  कर्तव्याचे ,कर्तृत्वाचे 
 नजरेत आले  पान
  आले स्फुरण मनात 
 मिळविला जगी मान
  
 दंग सुखाच्या जीवनी
पान आले समाधानाचे. 
दिले सारे विधात्याने
ऋण मानीते देवाचे


वैशाली वर्तक 
अहमदाबाद




अजून प्रश्न बाकी आहेत

 भारतीय साहित्य वसआंमंच नाशिक

आयोजित उपक्रम

विषय...प्रश्न अजूनही बाकी आहे


 आहे जो पर्यंत जीवन

 प्रश्न येणार मनात

विचारांची प्रश्न मालिका

सदैव राहणार विचारात


कामच आहे मेंदूचे

विचार करी क्षणा क्षणाला 

विचारात सदैव दंग

प्रश्न विचारी मनाला 


जीवन आहे प्रश्न मालिका

एका नंतर एक सोडवावे

तरी न संपेल कधीही

दूस-या प्रश्ना तयार रहावे 


वैशाली वर्तक

अहमदाबाद

मंगळवार, १८ जुलै, २०२३

नदी.

शब्दसेतू साहित्य  मंच पूणे
साप्ताहिक उपक्रम क्रमांक  3/22
विषय - नदी
जोडाक्षर   व जोड शब्द सहित पाच चारोळ्या

1
असो   ऋतू ग्रीष्म वा शरद
झर - झर वहाणे हेची कर्म
देणे जीवन जल -चर प्राण्यास
हेच तिच्या  जीवनाचे  असे मर्म

2

भरोत कुणी घागर वा पखाली
पहाण्यास तिज नसे उसंत
कधी शांत तर रौद्र रुपात
 धावता   सरितेस नसे मनी खंत


3
करोत विसर्जन  ताबुत वा गजानन
वा करा आस्थि विसर्जन  जलात
स्विकारते मोठ्या मनाने सरिता
सदा प्रेमळ भाव  मनात

4

जीवन  सरितेचे असे संतान् सम
न करिता उच- नीच भेद भाव
सज्जन , दुर्जन तिजसी समान
संजीवन देणे एकची ठाव

5

पाहूनी हिरवळ मनी संतुष्ट 
वाहे कधी कधी सरिता संथ
येते धावत कडे- कपारीतुनी
 आक्रमिते  सतत निज पंथ

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 

रविवार, १६ जुलै, २०२३

भक्षक नाही रक्षक हवा

क्षमतेने आपल्या नजरेच्या
दूरवर दृष्टीला   रेषेचा आभास 
अन पृथ्वीचा गोलाकाराने
भासे भेटली अवनी नभास

याची आभासी रेषेला
क्षितीज  असेची वदती
 होता अस्त उदय रवीचा
सुंदर रंग क्षितीजा वरती


 बसता समुद्राच्या किनारी
भासे भेटले नभ सागरास
 परि  दिसते  तसे नसते
 असे  काल्पनिक विचारास

रंग उमटती क्षितिजावर
निसर्गाची पहा किमया
विश्वंभर निर्मिली सृष्टी
त्याच्याच कृपेची माया



क्षितीज

क्षमतेने आपल्या नजरेच्या
दूरवर दृष्टीला   रेषेचा आभास 
अन पृथ्वीचा गोलाकाराने
भासे भेटली अवनी नभास

याची आभासी रेषेला
क्षितीज  असेची वदती
 होता अस्त उदय रवीचा
सुंदर रंग क्षितीजा वरती


 बसता समुद्राच्या किनारी
भासे भेटले नभ सागरास
 परि  दिसते  तसे नसते
 असे  काल्पनिक विचारास

रंग उमटती क्षितिजावर
निसर्गाची पहा किमया
विश्वंभर निर्मिली सृष्टी
त्याच्याच कृपेची माया



गुरुवार, १३ जुलै, २०२३

उन्हाचे चांदणे व्हावे.. कष्टाचे मोल


 स्वराज्य लेखणी मंच

आयोजित उपक्रम

विषय.. उन्हाचे चांदणे व्हावे


        **कष्टाचे मोल*


काळ्या मातीला कसून

घाम गाळीतो शिवारी

परिश्रम घेतो सदा

पहाण्यास राशी दारी


वाट पाहतो जलाची

बरसण्या मृग धारा

करण्यास पेरणीला

सोसतो गर्म वारा


येता वेळेवर वर्षां 

पहा  माती अंकुरली

पाहुनीया  बीजांकुरे

बळी मने संतोषली


जसा पडता पाऊस

रोपे वाढली जोमाने

झाले उन्हाचे चांदणे

मन डोले आनंदाने


येता दिन ते सुगीचे

भासे उन्हाचे चांदणे

कष्ट आलेत फळाला

हेची देवास सांगणे


वैशाली वर्तक

अहमदाबाद

बुधवार, १२ जुलै, २०२३

म्हणीवरून. खाण तशी माती

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच
धुळे जिल्हा
आयोजित उपक्रम क्रमांक १६७
चारोळी लेखन
विषय. ...खाण तशी माती

खाण तशी माती
कथन असे उचित 
जे पेराल तेच उगवेल
त्यात बदल नसे खचित

चांगले संस्कार देता
 घडे उज्वल भाग्य पाल्याचे
होई. मोठा कर्तबगार 
नशीब उजळे माता पित्याचे

तसेच असे कर्माचे
जैसे करु कर्म जीवनी
मिळे फळ आपणासी
मर्म जाणा मनोमनी

लाविता रोप मधूर फळांचे
वृक्ष वाढिता देई फळ
कधीच न मिळती काटे
कितीही येता. संकट रुपी  वादळ

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सोमवार, १० जुलै, २०२३

नाते युगायुगाचे

 



नाते युगायुगांचे


धुंद  एकांत या क्षणी

नको दावुस बहाणे

तुला समजण्या मीही

आता झालीय शहाणे


बघ सांजवेळ झाली

घेते हाती तव हात

तुझी माझी राहो सदा

नित्य प्रेमळ  ती साथ


स्मृती अजुनी आहेत

ताज्या  समुद्र  तटीच्या

गाज तयाची सांगते

आठवणी अंतरीच्या



     नाते हे युगायुगांचे

      ऋणानुबंधाच्या गाठी.  

   ओढ राहील सदैव

   स्नेह भाव सदासाठी.


हेच मागणे देवास

अशा एकांत क्षणाला

मार्ग सुखाचा चालूया

मिळो स्वर्ग सुख तुला


वैशाली वर्तक

शनिवार, १ जुलै, २०२३

चौपदी काव्य रचना

 स्वप्नगंध स्पर्धा  समूह

स्पर्धा क्र.३२
चौपदी काव्यलेखन
विषय.. विठ्ठल
शीर्षक,...  वारी विठ्ठलाची


चला चला विठू दर्शनाला 
मेळा वैष्णवांचा आला दर्शनाला 
एकमुखाने करती विठ्ठल गजर
आतुरले भक्तगण दर्शनाला

 वारीत जाण्याची  मनातून आस
 माऊलींच्या चरण स्पर्शाची आस
 विठ्ठल नाम राही सदैव अधरी
 पाऊलांना लागली पंढरीची आस

ध्यानी मनी स्वप्नी विठ्ठलाचे रूप 
अंतरात भरले माऊलींचे रुप
कधी न चुकली वारीतली सकाळ 
जळी स्थळी पाही श्रीहरीचे रुप

रमतो भजनी वैष्णवांचा  मेळा  
रिंगण  घालती   वारकरी मेळा
खेळ फुगडीचा, धरुनीया फेर
टाळ चिपळ्यात रंगला मेळा

विठ्ठल पाहता दुःखाचा विसर          
मी तू पणाचा, होतअसे विसरत
विठ्ठल नामात, सारेची दंग .           
 राग द्वेषाचा पडला विसर 


वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, २१ जून, २०२३

हारजीत

 काव्य निनाद साहित्य मंच पुणे

आयोजित उपक्रम क्रमांक 319

विषय...हारजीत

   


चाले जीवनात खेळ

कधी जय तर पराजयाचा

जसा श्रावण मासी चाले

ऊन तर  मधेच पावसाचा


पर म्हणजे दुजांचा

होतो जेव्हा विजय

हसत मुखे स्विकारा

अपयशात शब्द वसे यश


ठेवा घ्यावी अपयश हीच

असे पायरी यशाची

 स्विकारावी हार पण

करीता वाटचाल जीवनाची


निसर्गात पण दिसे हारजीत

येता ओहटी सागरास

होतो तो कधी  न उदास

वाट पाही भरतीची  खास 


 होता न अपयशी  खच्ची

हवी अभिलाषा विकासाची 

 पहा साधा कीटक कोळी

 राखतो मनी आशा यशाची


वैशाली वर्तक

अहमदाबाद

देहबोली


देहबोली 

अव्यक्त भाषा

सहजची उमजती
उठता भावना मनी
 एक शब्द न वदता
देहबोली बोले क्षणी. 

तीची असेची किमया
अव्यक्त भाव सहज
शब्दाविणा कळताती
 नसे वदणे गरज

अभिनय कलेतही
तिला प्राधान्य मिळते
रंगमंचावर कलाकार
 नाटय कला रंगवते

देहबोलीतून पहा
कळे. व्यक्तीचा स्वभाव
सहज घडे दर्शन
गुण दोष होती ठाव


देहबोली 

सहजची उमजती
उठता भावना मनी
 एक शब्द न वदता
देहबोली बोले क्षणी. 

तीची असेची किमया
अव्यक्त भाव सहज
शब्दाविणा कळताती
 नसे वदणे गरज

अभिनय कलेतही
तिला प्राधान्य मिळते
रंगमंचावर कलाकार
 नाटय कला रंगवते

देहबोलीतून पहा
कळे व्यक्तीचा स्वभाव
सहज घडे दर्शन
गुण दोष होती ठाव

 भाव असता उत्कट
नसे गरज बोलणे
माझे प्रेम तुझ्यावरी
शब्दा शिवाय कळणे


आहे माध्यमे प्रेमाची
स्पर्श , संकेत , कटाक्ष
भाव दावी अंतरीचे
प्रेम भाषेत चाणाक्ष

रविवार, १८ जून, २०२३

पश्चात्ताप

कल्याण डोंबिवली महानगर 2
उपक्रम 
विषय - पश्चाताप


व्हायचे ते तर होणार 
चिंता का करावी मनी
जायचे ते नक्की जाणार
 मग पश्चात्ताप  नको त्याक्षणी

नाही मिळाले  जर यश 
कमी पडले तेव्हा बळ
रडून काय उपयोग 
नशीबी नव्हते फळ

 निष्काळजीने होते चूक
लक्ष देता होत नाही भूल
हवी दक्षता कामात
मग मिळे यशाचे फूल


होते अलवार हलके
पश्चाताप होता मन
पुढच्या कामासाठी
तयार होतात क्षण

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, १३ जून, २०२३

चित्र काव्य......

सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम
चित्र काव्य लेखन
   *लगबग परतणीची*

नभ दाटले कृष्ण मेघांनी  
तयांना बरसण्याची घाई
गडगडता  ते डोंगर माथ्याशी
घरी जाण्यास अधीर बाई

दोर गाईचा एक हाती
दुजा हाती वासरांचा
घेऊन चाले भरभर
खटाटोप घरी पोहचण्याचा.

गेली होती गुरे चरायला
अचानक दाटले नभी मेघ
वारा सुटलाय जोरात
चमके नभी दामिनीची रेघ

मुखाने वदे वासराला
अनवाणी चालता भरभर
बिगी बिगी पाय उचला
येईल  पावसाची सर.
 
आता थंड खट्याळ वारा
झोंबता अंगाला उठे शहारा
पहा आता बरसणार धारा
काळोखी  आसमंत सारा

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सोमवार, १२ जून, २०२३

चित्र काव्य.......काव्य प्रणाली रचना असामान्य दर्पण. | मनाचा आरसा



स्वप्नगंध स्पर्धा समूह
चित्रा धारित रचना
स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित
काव्य प्रणाली चित्र काव्यलेखन स्पर्धा
10/8/8/10
काव्य प्रणाली  रचना
 १०\८\८\१० ओळी शब्द 
शीर्षक...  *असामान्य दर्पण*


रूप निरखण्या उभी बाळी. 
बाळीला भासे आगळे 
आगळेची प्रतिबिंब 
प्रतिबिंबाचे रुप वेगळे

वेगळे  पाहुनीया   स्वरूप    
स्वरुपाने भयभीत 
भयभीतीने निरखे 
निरखून झालीय चकित 

चकित होऊनिया पाहता
पाहताच   वाटतसे 
वाटे स्वरूप वृद्धेचे
 वृध्द काळी दिसेल असे

असेची काही  विचार मनी
मनातून   उद्भवले
उद्भवलेले विचार 
विचारांचे मंथन  संपले

संपले जरी वाटे मनाला
मनाला शांतता नाही 
नसे दर्पण सामान्य
असामान्यता शोधीत राही. 

वैशाली वर्तक
अहमदाबाद



मनाचा आरसा

काव्य निनाद साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम क्रमांक ४४३
विषय ..मनाचा आरसा


दिसे क्षणात स्व रूप 
पाहताच दर्पणात
जसे आहे तसे दिसे
नसे बदल रुपात 

सत्य वचनी आरसा 
दावी  बाह्यच रूपाला
पण डोकवा अंतरी 
जाणा त्या अंर्तमनाला

बोट  इतरा दाविता
प्रश्न विचारा मनात 
सांगे बाकीची ती बोटे 
 मिळे उत्तर क्षणात 

हेच प्रात्यक्षिक असे 
साधे होते परिक्षण
 खेळ उमजे  मनाचे 
स्वच्छ दिसे अंतर्मऩ

निराकार तो आरसा
पहा कसा तो मनाचा
सदा दावी गुणदोष
आपुल्याच अंतरंगाचा 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...