रविवार, १८ जून, २०२३

पश्चात्ताप

कल्याण डोंबिवली महानगर 2
उपक्रम 
विषय - पश्चाताप


व्हायचे ते तर होणार 
चिंता का करावी मनी
जायचे ते नक्की जाणार
 मग पश्चात्ताप  नको त्याक्षणी

नाही मिळाले  जर यश 
कमी पडले तेव्हा बळ
रडून काय उपयोग 
नशीबी नव्हते फळ

 निष्काळजीने होते चूक
लक्ष देता होत नाही भूल
हवी दक्षता कामात
मग मिळे यशाचे फूल


होते अलवार हलके
पश्चाताप होता मन
पुढच्या कामासाठी
तयार होतात क्षण

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...