रविवार, १८ जून, २०२३

पश्चात्ताप

कल्याण डोंबिवली महानगर 2
उपक्रम 
विषय - पश्चाताप


व्हायचे ते तर होणार 
चिंता का करावी मनी
जायचे ते नक्की जाणार
 मग पश्चात्ताप  नको त्याक्षणी

नाही मिळाले  जर यश 
कमी पडले तेव्हा बळ
रडून काय उपयोग 
नशीबी नव्हते फळ

 निष्काळजीने होते चूक
लक्ष देता होत नाही भूल
हवी दक्षता कामात
मग मिळे यशाचे फूल


होते अलवार हलके
पश्चाताप होता मन
पुढच्या कामासाठी
तयार होतात क्षण

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...