सोमवार, ३१ जुलै, २०२३

म्हणीवरुन ......अती तेथे माती


 अ भा म सा पण ठाणे जिल्हा 2

आयोजित उपक्रम

विषय.  अती तेथे माती


सर्वच  हवे आटोक्यात

अती होता घडे विनाश

जलधारा जरी गरजेच्या

 जास्त होता दिसे सर्वनाश


सकस आहार असे जरुरी

सेवन करता नको अधाशी

बिघडते स्वास्थ अती प्रमाणात 

रहा मग दोन दिवस उपाशी


संयम हवाच मनाला

उठता बसता सदा पाळावा

जगणे करण्या आनंददायी

कटाक्षाने अती लोभ टाळावा


 विज्ञानाने जीवन सुखी

पण नका होऊ अहारी

दुष्परिणाम त्यांचे होता

जीवनात  संकटे भारी


वैशाली वर्तक

अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...