बुधवार, ८ जानेवारी, २०२०

तृतीयपंथी

उपक्रम नं55
तृतीयपंथी

असतील जरी तृतीय पंथी
माणूस आहेत ते याची  सदा
ठेवू आपुल्या मनी जाण
 हिणवू नये  तयांना कदा

तयांचा काय दोष त्यात
त्यांना आहे मन भावना
करा त्याच्या  मनाचा विचार
नको सदा ची अव्हेलना

सारा हा नशीबाचा दोष
 दाखविणे स्त्री त्व पुरुषत्व
यात नसतो मोठेपणा
  समाजात मान देणे यातच श्रेष्ठत्व

कुटुंबाने जरी झिडकारले
करा त्यांच्यातील  गुणांची कदर
सर्व  गुण संपन्न  नसतो कोणी
पसरवा तयांना मदतीचा पदर

आहेत आता ब-याच संस्था
देतात तयांना सम वागणूक
नको तयांना  दयेची भीक
करुया  माणुसकीची जपणूक

वैशाली वर्तक......8/1/2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वप्न नव भारताचे

स्वप्न नव भारताचे      काल पाहिले सुंदर स्वप्न   मन माझे  आनंदले केले वंदन देवाला  अन् काव्यातून रेखाटले.           स्वप्नी होता  सुंदर स्वच...