बुधवार, ८ जानेवारी, २०२०

चाराक्षरी (कबीरच्या दोह्या वरुन)

चाराक्षरी
(कबीरच्या  दोह्या वरुन)

बोला सदा        
असे गोड
 वाणीनेच
मित्र जोड

गोड वाणी
बोला सदा
वर्मी शब्द
नको कदा

बोलताच
गोड वाणी
आनंदाची
ऐका गाणी

मी पणा हा
त्यजा खास
मोद मिळे
हमखास

ज्या बोलीत
असे गोडी
तीच वाणी
जग जोडी

 साखर  ही
ज्याच्या मुखी
जगता ते
तोच सुखी

 वाणीचाच
असे मान
स्वभावाची
दिसे शान

वैशाली वर्तक




     







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...