बुधवार, ८ जानेवारी, २०२०

चाराक्षरी (कबीरच्या दोह्या वरुन)

चाराक्षरी
(कबीरच्या  दोह्या वरुन)

बोला सदा        
असे गोड
 वाणीनेच
मित्र जोड

गोड वाणी
बोला सदा
वर्मी शब्द
नको कदा

बोलताच
गोड वाणी
आनंदाची
ऐका गाणी

मी पणा हा
त्यजा खास
मोद मिळे
हमखास

ज्या बोलीत
असे गोडी
तीच वाणी
जग जोडी

 साखर  ही
ज्याच्या मुखी
जगता ते
तोच सुखी

 वाणीचाच
असे मान
स्वभावाची
दिसे शान

वैशाली वर्तक




     







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...