सोमवार, १३ जानेवारी, २०२०

चारोळ्या...जेव्हा लेखणी बोलते

जेव्हा लेखणी बोलते    चारोळी

 1 लेखणी जेव्हा बोलते
     मनीचे गुज कळते
      शब्द न बोलता
      भाव अंतरीचे वदते

2 शब्दांना करिते बोलते
   भावना दाखविते सहज
    बोलता लेखणी तर
    उच्चाराची नसते गरज

3  लिखाणातून  जपते  संस्कृती
    घडविते  इतिहास  नवा
     लेखणी जेव्हा  बोलते
    लेखणीचा छंद सदा हवा

4   जेहा लेखणी बोलते
      वठविते दृश्य प्रसंग
     वाटे जणु आपणही
      आहोत तयांच्या संग

   वैशाली वर्तक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जेथे निषेध...