बुधवार, ८ जानेवारी, २०२०

निरोप सरत्या वर्षाला/ (लेख) कविता


निरोप सरत्या वर्षाला

                   कोणाचे कोणा वाचून अडे,
                  सारखा काळ चालला पुढे
  अगदी खर कथित आहे .वर्षा मागून वर्ष सरतात ,आणि सरत्या  वर्षा दिवशी , म्हणजे

निरोप सरत्या वर्षाला
   चालू वर्षाला निरोप देण्याच्या दिवसाचा क्षण येऊन ठेपतो. क्षण भर मन मागे डोकावून पहाते. आठवणी वर्षभराच्या डोळ्यासमोर  दोरीचे रीळ उलगडावे तशा उलगडल्या जातात.
      आज पण आपल्या सा-यांचे तसेच झाले असणार .वर्ष भराच्या वाईट गोष्टींना विसरुन चांगल्या गोष्टी मनी स्मरुन मन सकारात्मक विचारांनी भरुन घ्यावे जेणे करुन मन प्रफुल्लित होईल व नव उत्साहाने  आनंदित होईल .
     तसेच माझ्या आठवणी प्रमाणे अथवा मी तरी "मोहरलेली लेखणी" हा समुहा याच वर्षात सहभागी झाले. .समुहाने बरेच नवीन उपक्रम  व स्पर्धा  घेतल्या गेल्या की जेणे कारणाने लेखणीस घार देण्यात खूप  मदत झाली .त्यामुळे आयोजक, संयोजकांचे, आभार व ग्राफिक्स यांनी प्रमाणपत्र  (सुंदर ) देउन प्रोत्साहित केले  सर्वांचे आभार  
    हे झाले लिखाण  संबंधित ,आता आपल्या देशाने चंद्रावर  जाण्याचा (विक्रम )यानने प्रयत्न  करुन जगात नाव मिळविले .कौतुकाची बाब .
     निसर्गाने म्हणजे वरुण राजाने मात्र  हताशा केली .सर्चव  सण गणपती,   नवरात्री, दिवाळी  आणि आता वर्षा अखेर म्हणजे  नाताळ ला पण हजरी लावत आहे. त्यामुळे
बळीराजाच्या महेनतीची परीक्षा  घेत आहे
     असो अशा चांगल्या  वाईट घडामोडी चालत 2019 आता सरत आहे. नवीन
वर्षात चांगल्या  गोष्टी होतील अशी आशा करुया. तसेच सर्वाना शुभेच्छा. आणि
 मी म्हणीन

        देऊया हर्षाने ऊत्साहाने
       निरोप सरत्या वर्षाला
      क्षण आनंदाचे आठवूया
      उधाण येईल जगाण्याला

     
      लावूनिया उत्साहाचे अत्तर
        नव वर्षाच्या आगमनाला
       येउ द्या  संकल्पनाना उधाण
        दूर सारूनिया नैराश्याला

म्हणत पुन्हा  एकदा  सर्वांना नूतन वर्षाभिनंदन

वैशाली वर्तक 








शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

निरोप सरत्या वर्षाला

काव्य आराधना स्पर्धा समूह  आयोजित  राज्य स्तरीय  स्पर्धा 
विषय - निरोप सरत्या वर्षाला
      *दृढ निश्चयाची पावले*

उत्साहाचे लाऊनी अत्तर
केले होते स्वागत हास्यमुखाने
पण काय झाले कोण न जाणे
सारे वर्ष ग्रासले महामारीने

किती जन पडले मृत्यू मुखी
भेट नाही आप्त व स्वजनांची
सारे सणवार गेले असेच
विठुची वारी पण चुकली यंदाची

किती दिवस काढले बंदिस्तात
रोज कमवणारे काय खाणार
काम नाही  तर पैसा नाही
कशी भाकरी बालकास देणार

खूप शिकविले सरत्या वर्षाने
राहिले जन माणुसकीला धरुनी
आता राहिले थोडेची दिन
जातील  तेही बंधने पाळूनी

स्वदेशीचा नारा लावूनिया
देश होईलच  आत्म निर्भर
पुन्हा  नव्याने वाहूद्या झरे
देशभराते भरभर निर्झर

नव्या वर्षाच्या स्वागता
टाकूया दृढविश्वाचे पाऊल
पळून जातील सारी संकटे
सर्वत्र  दिसेल यशाची चाहुल

वैशाली वर्तक 5/12/20
अहमदाबाद 




*सर्व धर्म समभाव साहित्य मंच
आयोजित
उपक्रम काव्यलेखन
विषय . सरत्या वर्षाला
३०/१२/२२
सरत्या वर्षाला निरोप

होते आठवण सरता काळ
  वर्षाचा आढावा घेती मनी 
काही गोड तर कटु प्रसंग
सहजची येती नजरेला क्षणी

असेच चाले  सदा जीवनी
झाल्या चुकांना सुधारूनी
नव्या क्षणाला देत उजळा
अनुभवांची शाळा घेऊ स्मरणी

जरी लक्षण दिसती विषाणूंची
 अनुभवाचे  सांगू मनोगत
स्वच्छतेने सुंदर राखू पर्यावरण
करू नव्या वर्षाचे सहर्ष स्वागत 

देऊया हर्षाने ऊत्साहाने
निरोप सरत्या वर्षाला
क्षण आनंदाचे आठवूया
 उधाण येईल जगाण्याला

  लावूनिया उत्साहाचे अत्तर
 नव वर्षाच्या आगमनाला
 येउ द्या  संकल्पनाना उधाण
दूर सारूनिया नैराश्याला

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...