रविवार, ५ जुलै, २०२०

निसर्गास पत्र

यारिया साहित्य  कला आयोजित पत्र  लेखन स्पर्धा
स्पर्धे साठी
विषय  ...निसर्गास पत्र 

माननिय निसर्ग 
      हो  !  तुला माननीय म्हटलेच पाहिजे बाबा. ..तूच तर खरा देव... मित्र  आणि हो गुरु.. किती रुपात पहायचे रे तुला.तू आहेसच रूपवान गुणवान   .खरच तुझी कृपा असेल तर  काय विचारायचे. तुझ्यावरच जीव सृष्टी  जगातील जल चर सृष्टी  आवलंबित असते. तुझी रुपे जल, तेज, वायु ,आकाश, भुमी .ही तुझी रुपे ज्यावर तु बहरतोस . तेजाने दिन चक्र चालवितो. तुझ्या सूर्य तेजाने अमृत रुपी धारा बरसतात. व सर्वत्र हिरवळ वा सुजलाम सुफलाम अवनी होते. पृथ्वी पण तिच्या गर्भातून खनीजे देते. ती पण तुझेच रुप . असे निसर्गा तू प्राणीमात्रावर प्रेम करतोस .
      पण कधी तरी पाऊस वेळेत न येवून वा अतिवृष्टीने पीक पाण्याची हानी करतोस . वा घरदार वाहून नेतो. तेव्हा तुझे रुद्र रुप दाखवितो. 
       आम्ही मानव पण प्रगतीच्या नावाखाली तुझ्या  विरुध्द जाऊन वागतोय ..चुका करत आहोत .त्यामुळे  त्याचे परिणाम पण आम्हास  दिसत आहे. 
पण , हे पण नक्कीच.  तूच खरा गुरु आहेस .काट्यात राहून फुले फुलतात हसतात व मानवास शिकवतात की,संकट आली तरी हसत मुखे सामोरे जावे तसेच  तुझी सुंदर  बहरलेली सृष्टी  पाहून चित्र कारांचे कुंचले...
लेखकांच्या लेखण्या स्फुरतात. 
       असो. तुझी सदैव कृपादृष्टी ठेव व सदैव कृपा ठेव .जेणे करुन मानव.. प्राणीमात्र सुखी रहातील . 
जसा तू आहेस आम्हास प्रियच आहे. पुन्हा अशीच गप्पा करावयास येईन.
तोवर बाय. 
काही कमी जास्त बोलली असेन तर क्षमा कर .

तुझी कृपाभिलाषी

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...