रविवार, २८ जुलै, २०२४

अष्टाक्षरी. कटु सत्य अनुभव


*स्पर्धेसाठी* 
मोरणा कवी कट्टा समूह सांगली, पश्चिम महाराष्ट्र 
आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धा.
दि २८\७\२४
विषय ..कटु सत्य अनुभव 
शीर्षक..  सद्य जीवनशैली 

जग झालय प्रगत
एक फोन केला तर
 मिळे सारेची सहज
हवी ती वस्तू  हजर

सध्या मित्रांची गणना
किती करावी, ती कमी 
पण गरजेच्या वेळी 
कामी येण्याची न हमी

बोलण्यास भेटण्यास 
वेळ नसे कोणालाही 
फोनवरच्या संवादी
आनंदाची मजा नाही

दोन शब्द बोलायला 
आजी आजोबा तृषित
एका घरात  राहून 
सदासाठी उपेक्षित 

पुढे मागे मोठी  बाग
असे  घर शानदार 
 सुख उपभोग घेण्या 
वेळ कोणा नाही फार

येती मनात विचार 
असे आहे हेची सारे
कटु आहे पण सत्य
वरवर दिसे न्यारे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
८१४१४२७४३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जेथे निषेध...