बुधवार, १९ जानेवारी, २०२२

बदल परिवर्तन


 कल्याण डोंबिवली महानगर

आयोजित  उपक्रम काव्य लेखन

विषय - परिवर्तन 


नवा बदल


काळा प्रमाणे चालणे

असे सदैव गरज

येता वेळ प्रसंग 

बदल करावा सहज


नव नवीन विचार 

 त्याचे करावे स्वागत

करु सणात परिवर्तन 

ऐका मनाचे स्वगत


 

फटाक्यांच्या आवाजाने

हवेचे ध्वनीचे प्रदुषण

नको -हास  पर्यावरणचा

कमी करूया दुषण


आणू मातीचे दीपक

खुश होईल  कामगार 

काम करणारे हात

मिळे तयांना आधार


दुःख मय तो तिमीर

लावुनिया दीप ओळी

घर अनाथांचे उजळवु

काढु सुंदर  रांगोळी 



देता  फराळ अनाथांना

विलसेल हास्य मुखी

 आनंदाने प्रफुल्लित

दिसतील सारे सुखी


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...