शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

... लेख बळ हवे पंखात

अ.भा म सा प  स्वप्नगंध  समूह 
उपक्रम लेख लेखन

**बळ पंखात हवे*
       मानवास देवाने मेंदू बहाल करुन खूप  उपकार केले आहेत . त्या मेंदुला विचार  शक्ती चे बळ दिले आहे. त्या बळावर तो आज चंद्रावर  पोहचत आहे ..
तर सांगायचे हेच की .....मनात इच्छा शक्ती असेल तर मानव काही करु शकतो उगाचच का म्हटले आहे .?.जगात अशक्य असे काही नाही ..प्रयत्न  व जिद्द  , इच्छा शक्ती हवी.  हे सारे असले की पंखात बळ येतेच. 
       साधे पहा जनावर पिल्लास जन्म देतात. त्यांचे ते पिल्लास पुसतात त्यांच्या त्यांच्या बळाने.. ते पिल्लू पायावर उभे रहाते व चालत पुढे  जाते.  त्यांच्या मेंदूच्या आकलना प्रमाणे..
        मग आपण तर मानव.. आई वडील बालपणात त्यांच्या संस्कार  व संगोपनात कमी न पडू देता मनाची उभारी देण्याचे काम करतच असतात...पंखात बळ भरतच असतात. हे सारे थोर पुरुष त्यांनी जिद्दीने  महेनत करुन कोणी... शास्त्रज्ञ  तर कोणी उत्तम  खेळाडू .... तर  कोणी स्वातंत्र्य  सेनानी.. तर काही समाज सुधारक .....मग किती संकटे आली तरी पर्वा न करता अंगातील बळाचा उपयोग करुन मोठे झालेच ना. !
तर पंखातील बळाचा योग्य  उपयोग करून मानव आपले ध्येय साध्य करु शकतो.
त्या साठी आधी केलेची पाहिजे. अंगी बळ मनोवृत्तीने एकवटले पाहिजे. 
       थाॕमस एल्वा एडीसन जगात बल्बचा शोध लावणारा..  मनात ध्येयवृत्तीने झपाटलेला....  बळ त्याच्या अंगात ,पंखात भरलेले म्हणून पूर्तता  मिळवू शकला. 
शिवाजी राजे...  हिंदवी स्वराज्य  स्थापन करायचे ह्या ध्येयाने झपाटलेले..बळ अंगात साठवून  कामास लागता  यश पदरी आलेच. 
       तर प्रत्येकाने आपल्या शक्ती नुसार   ध्येय पूर्ती साठी  बळ हवे तसे पंखात भरले तर इच्छा पूर्ती होतेच

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
गुजरात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...