शनिवार, ४ एप्रिल, २०२०

स्वच्छतेकडून समृद्धी कडे!

उपक्रम
 स्वच्छतेकडून समृध्दीकडे.....
       जेथे स्वच्छता  असते तेथेच लक्ष्मी वास करते,रहाते   असे म्हणतात . म्हणून तर आपल्या संस्कृतीत केरसुणीला लक्ष्मी मानतात. पाय लावत नाही व चुकून  लागला तर लगेच तिजला नमस्कार  करतात. कारण स्वच्छता  करण्याचे वा राखण्याचे एकमेव  तीच साधन आहे. ती घरभर फिरविली की घर कसे स्वच्छ  होते. तर स्वच्छता  करणारी ती लक्ष्मी आहे.
     या  स्वच्छतेचे जीवनात फारच  महत्त्व  आहे.स्वच्छता नसेल तर निरोगी  आरोग्य  रहात नाही. निरोगी  आरोग्य  ही खरी संपदा. व निरोगी  आरोग्यासाठी स्वच्छता राखणे. आपण जेथे रहातो  ते ठिकाण स्वच्छ  असणे अत्यंत  गरजेचे आहे.स्वच्छता असेल तर निरोगी आयुष्य  व निरोगी  सुदृढ  शरीर , तर च माणूस काम करुन धन दौलत  ऐश्वर्य  मिळवू शकतो. तेव्हा स्वच्छता ही लक्ष्मी तसेच सरस्वती संपादन करण्यात महत्त्वाचे पैलू आहेत
        उगीचच का स्वच्छ  भारत सुंदर भारत चे न्यारे लावले जातात. गांधीजीं पण स्वच्छता प्रेमी होते. ते स्वच्छतेचे पुजारी होते. तेच सुत्र सध्या आपले पंत प्रधान नरेंद्रभाई यांनी उचलून घेतले आहे. स्वच्छतेकडे विशेष  लक्ष देत आहेत.
      आपण पहातो परदेशात स्वच्छता ही घराघरातून शिकवली जाते. तेथे शिस्त ता पण असल्याने सार्वजनिक  ठिकाणे  पण स्वच्छ असतात.
   आता आपल्याकडे पण तो कल येत आहे. रेल्वे  स्टेशन सारखी ठिकाण  स्वच्छ ठेवत आहे.  अशी स्वच्छता  असली की निरोगी  निकोप आयुष्य मिळते
मग माणसे धन दौलत कमवून  स्वतः स्वतःची आवक वाढवू शकतात. व जसे प्रत्येकाची income वाढली तर देशाची वाढते व समृद्धी कडे आपोआप पावले पडतात . म्हणून स्वच्छता ही समृध्दी ची आवश्यकता आहे

वेशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...